शहरं
Join us  
Trending Stories
1
'बापजाद्यांची पायवाट मोडू नका!'; मनोज जरांगेंचा पंकजा मुंडे,अजित पवारांना आपुलकीचा सल्ला!
2
दिवाळीसाठी गावी निघाले अन् एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! 'थार'च्या धडकेत पती-पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू
3
Bihar Election 2025 India Alliance: हेमंत सोरेन यांचा इंडिया आघाडीला 'टाटा', 'या' जागा स्वबळावर लढणार
4
'अदीना मशीद नाही, आदिनाथ मंदिर', खासदार युसूफ पठाणच्या पोस्टवर भाजपचा निशाणा; प्रकरण काय?
5
Bihar Election: ती चूक  भोवली, मतदानापूर्वीच एक जागा गमावली, बिहारमध्ये NDA ला मोठा धक्का
6
Gold News: भारतीय महिला आहेत हजारो टन सोन्याच्या 'मालक', अमेरिकेसह पाच देशांकडेही नाही इतका साठा
7
भाजपाने देव आणि महापुरुषांचा मांडला बाजार, मेट्रो स्टेशनच्या नावांवरून काँग्रेसची बोचरी टीका
8
Kalyan Crime: गर्लफ्रेंडचा मोबाईल हॅक केला, अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार
9
कोर्टाची नोटीस नाकारणे भोवले! IAS सुजाता सौनिक यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट; २६ नोव्हेंबरला हजर राहण्याचे आदेश
10
Bigg Boss 19: क्रिकेटपटू दीपक चहरच्या बहिणीवर संतापला सलमान खान, सारेच झाले अवाक्, कारण काय? 
11
Diwali Sale: ७०००mAh बॅटरी आणि ३ कॅमेरे असलेला फोन ६७९ रुपयांच्या ईएमआयमध्ये उपलब्ध
12
Viral Video: "दात आहेत की वेटलिफ्टिंग मशीन?" तरुणाचा व्हिडीओ पाहून नेटकरी शॉक!
13
२७ महिन्यांपासून पगार नाही, सुट्टी मागितल्यास..., वैतागलेल्या कर्मचाऱ्याने सरकारी ऑफिससमोरच संपवलं जीवन 
14
संसदेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ब्रह्मपुत्र अपार्टमेंटला भीषण आग, इथेच आहेत अनेक खासदारांची निवासस्थाने
15
सोमवती अमावस्या आणि लक्ष्मी पूजनाचा दुर्मिळ योग; 'या' ७ राशींच्या आयुष्याला मिळणार कलाटणी
16
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर हा फक्त ट्रेलर, आता पाकिस्तानची एक-एक इंच जमीन ब्रह्मोसच्या रेंजमध्ये..."
17
Mohammed Shami: शमीनं निवड समितीची केली बोलती बंद, रणजी स्पर्धेत ७ विकेट्स घेऊन दिला फिटनेसचा पुरावा!
18
"अफगाणिस्तानकडून राष्ट्रप्रेमाचे धडे घ्या": पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार, चतुर्वेदींचा BCCI-सरकारला टोला
19
'मिआ बाय तनिष्क'ची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून अनीत पड्डाची निवड, 'प्रेशियस, एव्हरी डे' या फेस्टिव्ह मोहिमेतून केले पदार्पण
20
IAS Ankita Chaudhary : "कधीही हार मानू नका, कारण..."; आईचं स्वप्न हेच आयुष्याचं ध्येय, IAS अंकिताचा मोलाचा सल्ला

Guru Purnima 2025: गुरु शोधायला जाऊ नका, तेच आपल्या आयुष्यात येतात; पण कधी? ते जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 11:16 IST

How to Find a Guru: आपल्या आयुष्याला योग्य वळण देण्यासाठी गुरु मिळावे लागतात; मुख्य म्हणजे त्यांना शोधावे लागत नाही तर ते आपणहून येतात...पण कधी ते जाणून घ्या!

Guru Purnima 2025:  'समय से पहले और भाग्य से अधिक किसी को कुछ नही मिलने वाला' हे वाक्य तुम्ही वाचले असेल. गुरु कृपा होण्यासाठीदेखील योग्य वेळ यावी लागते. ती कधी येते? कशी येते आणि आलेली वेळ, त्याबरोबर गुरु म्हणून आपल्या आयुष्यात आलेली व्यक्ती कशी ओळखावी ते येत्या गुरु पौर्णिमेनिमित्त(Guru Purnima 2025) जाणून घेऊ. 

आपण गुरु म्हणून दत्त गुरु, स्वामी समर्थ, गजानन महाराज, गगनगिरी महाराज, शंकर महाराज, गोंदवलेकर महाराज अशा दैवी गुरूंची उपासना करतोच. ते आपल्याला आयुष्याचा मार्ग दाखवतात, अध्यात्माचा मार्ग दाखवतात आणि जीवन मृत्यूच्या पलीकडच्या प्रवासाला घेऊन जातात. त्यांची उपासना केल्यामुळे न सुटणारे प्रश्नही आपोआप सुटत जातात. मात्र ही गुरुकृपा होण्यासाठी वेळ लागू शकतो. मात्र त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी जे गुरु मदत करतात ते आपल्या आयुष्यात कधी येतात? तर त्याची सुंदर व्याख्या वाचायला मिळते... 

गुरू केव्हा भेटतो?

शिष्याची अध्यात्मिक तयारी पुरेशी झाली की गुरूच त्याचा शोध घेत त्याच्याकडे येतो. रामकृष्ण परमहंस नेहमी म्हणत, कमळ फुलले की भुग्यांना आमंत्रण द्यावे लागत नाही. पाणी शंभर अंश तापले की त्याची आपोआप वाफ होतेच. हा नियम जितका खरा तितकाच हाही नियम खरा : आहे, परंतु कोणताही संत आपला गुरू होऊ शकत नाही. गुरू शिष्य हे ही ठरलेले असतात. इतर मार्गदर्शन करतील, सूचना करतील; पण त्यांचे गुरू होऊ शंकणार नाहीत. कारण प्रत्येकाचाच गुरू ठरलेला असतो. शिष्याच्या अंगी योग्यता आली की गुरूच त्याचा शोध घेत येतो. जोपर्यंत मानवी गुरू भेटत नाही तोपर्यंत ग्रंथांनाच आपले गुरू मानावे.

संत कबीर म्हणतात -

गुरु गोविंद दोऊ खडे, का के लागो पाय? बलिहारी गुरु आपने गोविंद धियो बताय!

अर्थ : आपल्यासमोर देव येऊन उभा राहिला तरी त्याला ओळखण्याची आपल्याकडे पात्रता नाही, कारण आपण आपल्या आयुष्यात देव प्रत्यक्ष पाहिलेलाच नाही. म्हणून कबीर म्हणतात, आधी गुरूंना वंदन करा, कारण त्यांनी देव पाहिला आहे आणि ते आपल्याला त्याची ओळख करणार आहेत. म्हणून देवाआधी जवळ कोण तर गुरु! जे आपल्याला सन्मार्ग दाखवतात, ध्येयाचा मार्ग दाखवतात आणि आपल्या आयुष्याला वळण देतात. म्हणून गुरूंचा शोध घ्यायला जाऊ नका, तेच तुमच्या भेटीला येतील, फक्त ते आपल्या आयुष्यात येण्याइतकी स्वतःची पात्रता तयार करा. 

टॅग्स :Guru Purnimaगुरु पौर्णिमाshree datta guruदत्तगुरुshree swami samarthश्री स्वामी समर्थspiritualअध्यात्मिकIndian Festivalsभारतीय उत्सव-सण