शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Gudi Padwa 2021: चैत्रांगण! ६४ शुभचिन्हे असलेले भारतीय सांस्कृतीच्या समृद्धतेचे प्रतीक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2021 19:59 IST

रांगोळीतील खास महाराष्ट्रीय प्रकार म्हणजे चैत्रांगण. महाराष्ट्रात या रांगोळीला विशेष महत्त्व आहे. जाणून घेऊया... (Gudi Padwa 2021 Chaitrangan Rangoli)

अवघ्या काही दिवसांनी मराठी नवीन वर्षाचा आरंभ होणार आहे. यंदाचे मराठी वर्षाचे शालिवाहन शके १९४३ असून, प्लवसंवत्सरारंभ होणार आहे. देशभरात गुढीपाडवा वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. केवळ महाराष्ट्रात नाही, तर विविध राज्यांमध्ये गुढीपाडवा साजरा करण्यात येतो. भारतीय संस्कृतीत अनेक समृद्धी गोष्टींचा अगदी भरणा आहे. रांगोळी हा त्यातीलच एक प्रकार. रांगोळी मांगल्याचे प्रतिक मानले जाते. गावाकडे किंवा शहरातही अगदी दररोज घराबाहेर रांगोळी काढली जाते. रांगोळीतील खास महाराष्ट्रीय प्रकार म्हणजे चैत्रांगण. महाराष्ट्रात या रांगोळीला विशेष महत्त्व आहे. जाणून घेऊया... (Gudi Padwa 2021 Chaitrangan Rangoli)

Chaitra Navratri 2021 Date: कधीपासून होतोय चैत्र नवरात्रारंभ? 'या' वाहनावरून होणार देवीचे आगमन

चैत्र महिना म्हणजे मराठी नववर्षाची सुरुवात. मात्र, गुढीपाडवा हा विविध कारणांसाठी साजरा केला जातो. गुढीपाडव्याला घरोघरी रांगोळ्या काढल्या जातात. चैत्र नवरात्र साजरे करताना माहेरवाशीण चैत्रागौरीचे आवाहन करून तिच्या स्वागतासाठीही रांगोळ्या काढल्या जातात. निसर्गाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी चैत्रांगण काढले जाते. चैत्रांगणात ६४ चिन्हे काढली जात असत. मात्र, आता कालानुरूप त्यात बदल होत गेले आणि सध्या  या रांगोळीत ५१ शुभचिन्हे काढली जातात. या चिन्हांमागे खास कारणे आहेत. (symbol of indian cultural prosperity chaitrangan rangoli)

Gudi Padwa 2021 : गोड वर्षाची कडू सुरुवात कडुलिंबाने का करतात, याचे धार्मिक आणि शास्त्रीयदृष्ट्या महत्त्व!

घरासमोरील अंगण स्वच्छ केले जाते. गोरूच्या साहाय्याने एक चौकोन तयार केला जातो आणि त्यावर चैत्रांगण काढले जाते. रांगोळीच्या सर्वात वरच्या बाजूला आंब्याचे तोरण काढले जाते. यानंतर त्याखाली देवघर काढले जाते. या देवघरात काढण्यात आलेली दोन प्रतिके शिव-पार्वती किंवा लक्ष्मी-नारायण वा चैत्रागौरी किंवा अनुराधा व स्वाती ही दोन सृजनाची नक्षत्रे असल्याचे मानले जाते. गणपती आणि सरस्वती साकारली जाते. (Chaitrangan Rangoli)

Gudi Padwa 2021 : गुढी उभारण्यामागे वसू नामक राजाची अशी आहे पौराणिक कथा!

भारतीय संस्कृतीत अनेक समृद्धीची प्रतीके सांगितली आहेत. हत्ती, घोडा, नागयुगुल, गरुड अशी समृद्धीची प्रतिके चिन्हांच्या स्वरुपात काढली जातात. याशिवाय कासव, बासरी, स्वस्तिक, त्रिशूळ, धनुष्यबाण, तुळशी वृदांवन, मोरपीस, कमळ, कलश, आंबा, केळी, सनई चौघडा, डमरू यांची प्रतिकात्मक चिन्हे काढली जातात. अक्षय मानले जाणारे सूर्य आणि चंद्र, यशाचे प्रतीक असलेला ध्वज,नववर्षाची सुरुवात म्हणून गुढी, शंख, पद्म, गदा, चक्र, गोपद्म, ओम, सौभाग्य लेणी म्हणजेच हळदी कुंकवाचा करंडा, फणी, पणती, सवाष्णीची ओटी म्हणजे खण-नारळ, रुद्राक्ष, सृजनाचे प्रतीक म्हणून पाळणा, कामधेनूसह वासरू, ऐश्वर्याचे प्रतीक म्हणून अंबारी अशी विविध चिन्हे काढली जातात. चैत्रांगणातून समृद्ध भारतीय संस्कृती प्रतिकात्मकरित्या दाखवली जाते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. 

Gudi Padwa 2021 : गुढी पाडव्याच्या दिवशी पंचांग वाचन का केले पाहिजे? 

टॅग्स :gudhi padwaगुढीपाडवाrangoliरांगोळी