शहरं
Join us  
Trending Stories
1
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; उपराज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
2
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
3
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
4
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
5
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
6
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
7
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
8
मुंबई इंडियन्सच्या संघात अंशुल कंबोजची एन्ट्री! टॉस जिंकून २३ वर्षीय ऑल राऊंडरला दिली संधी, जाणून घ्या कोण आहे तो
9
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
10
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
11
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
12
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
13
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
14
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
15
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
16
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
17
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
18
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
19
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
20
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"

देव तर आपल्यातच आहे; फक्त विकारविवशतेमुळे त्याची जाणीव नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2021 1:42 PM

देव हा माणसांपासून दूर राहू नये आणि माणसं देवाजवळ जावीत असं वाटत असेल तर माणसाच्या मनातील  विकारनिर्मूलन हे झालंच पाहिजे..! फुले उमलतात, बहरतात, सुगंधाची उधळण करतात व वातावरणांत परिमळ ठेवून जातात तशीच विकाररहित माणसं सर्वांनाच प्रिय होतात..!

- युवा कीर्तनकार, ह.भ.प. ऋतुपर्ण भरतबुवा रामदासी ( बीड, महाराष्ट्र. ८७ ९३ ०३ ०३ ०३ )

अध्यात्मशास्त्रांत विकारांवर नियंत्रण ठेवण्याला खूप महत्व आहे. खरं तर माणसाचे मन हे एक कुरुक्षेत्र आहे. त्यात विचारांचा आणि विकारांचा सतत संघर्ष चालू असतो. त्यातच विकार अधिक प्रमाणात उचल खातात आणि माणसाचा पशू होतो. ज्ञानराज माऊली म्हणतात -

रुणू झुणू रुणू झुणू रे भ्रमरा ।सांडि तूं अवगुणूं रे भ्रमरा ॥

कधी कधी विकार हे माणसाचे जीवन उद्ध्वस्त करतात. प्रश्न असा पडतो की, हे विकार कमी करण्याचा काही उपाय नाही का..? तर भगवान रामकृष्ण परमहंस सुंदर दृष्टांत देत असत.

लोखंडाची वस्तू जर खूप गंजलेली असेल तर लोहचुंबक तिला आकर्षित करुं शकत नाही. वरचा गंज जर खरवडून काढला तरच ती लोखंडी वस्तू लोहचुंबकाकडे आकर्षित होते.

ही विकारविवशता कमी करण्याचे एकमेव साधन म्हणजे मनुष्याने ईश्वरपरायण होणे. विकार कमी करण्याचे एकमेव साधन म्हणजे ईश्वरभक्ती आहे. आज विकार विकारविवशतेने ग्रासलेल्या या जगाला अवकळा आली आहे.

एखाद्या शेताकडे दुर्लक्ष व्हावे, पेरणीचा विसर पडावा, शेताची मशागत राहून जावी व काटेरी कुंपणाने शेत व्यापारी तसाच प्रकार आज समाजाचा झाला आहे. आज आपणांस जितकी प्रगती दिसत आहे तितकीच दिसणारी अधोगती खरी नाही कां..? याचे कारण माणसांत बळावलेली विकारविवशता हेच आहे.

गोकुळातील एक गोपिका भगवंताला आतुरतेने हाक मारीत असे. देवा..! एकदा माझ्या ह्रदयमंदिरांत ये ना..! तुला पाहण्यास मी खूप आतुर आहे रे..! देव रोज तिला येण्याचे आश्वासन देत होते पण येत काही नव्हते. एकदिवस ती गोपबाला देवाला म्हणाली, देवा..! तुझ्या न येण्यामागे कारण तरी मला सांग..? तेव्हा देव म्हणाले, प्रथम तूं तुझे ह्रदयाच्या स्वच्छ कर आणि मगच मी येईन..! ती गोपिका आपला स्वानुभव कथन करते -

हरि या हो चला मंदिर । कुणी नाही दुसरे घरी ।काम दादला गेला बाहेरी । क्रोध सासू ती नाही घरी ॥

देव हा माणसांपासून दूर राहू नये आणि माणसं देवाजवळ जावीत असं वाटत असेल तर हे विकारनिर्मूलन झालंच पाहिजे.

फुले उमलतात, बहरतात, सुगंधाची उधळण करतात व वातावरणांत परिमळ ठेवून जातात तशीच विकाररहित माणसं सर्वांनाच प्रिय होतात..!

ही विकारविवशता कमी करण्यासाठीच संतांनी भक्तीमार्गाचा पुरस्कार केला. देव तर आपल्यातच आहे, फक्त विकारविवशतेमुळे त्याची जाणीव होत नाही..!

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक