शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

देव तर आपल्यातच आहे; फक्त विकारविवशतेमुळे त्याची जाणीव नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 13:43 IST

देव हा माणसांपासून दूर राहू नये आणि माणसं देवाजवळ जावीत असं वाटत असेल तर माणसाच्या मनातील  विकारनिर्मूलन हे झालंच पाहिजे..! फुले उमलतात, बहरतात, सुगंधाची उधळण करतात व वातावरणांत परिमळ ठेवून जातात तशीच विकाररहित माणसं सर्वांनाच प्रिय होतात..!

- युवा कीर्तनकार, ह.भ.प. ऋतुपर्ण भरतबुवा रामदासी ( बीड, महाराष्ट्र. ८७ ९३ ०३ ०३ ०३ )

अध्यात्मशास्त्रांत विकारांवर नियंत्रण ठेवण्याला खूप महत्व आहे. खरं तर माणसाचे मन हे एक कुरुक्षेत्र आहे. त्यात विचारांचा आणि विकारांचा सतत संघर्ष चालू असतो. त्यातच विकार अधिक प्रमाणात उचल खातात आणि माणसाचा पशू होतो. ज्ञानराज माऊली म्हणतात -

रुणू झुणू रुणू झुणू रे भ्रमरा ।सांडि तूं अवगुणूं रे भ्रमरा ॥

कधी कधी विकार हे माणसाचे जीवन उद्ध्वस्त करतात. प्रश्न असा पडतो की, हे विकार कमी करण्याचा काही उपाय नाही का..? तर भगवान रामकृष्ण परमहंस सुंदर दृष्टांत देत असत.

लोखंडाची वस्तू जर खूप गंजलेली असेल तर लोहचुंबक तिला आकर्षित करुं शकत नाही. वरचा गंज जर खरवडून काढला तरच ती लोखंडी वस्तू लोहचुंबकाकडे आकर्षित होते.

ही विकारविवशता कमी करण्याचे एकमेव साधन म्हणजे मनुष्याने ईश्वरपरायण होणे. विकार कमी करण्याचे एकमेव साधन म्हणजे ईश्वरभक्ती आहे. आज विकार विकारविवशतेने ग्रासलेल्या या जगाला अवकळा आली आहे.

एखाद्या शेताकडे दुर्लक्ष व्हावे, पेरणीचा विसर पडावा, शेताची मशागत राहून जावी व काटेरी कुंपणाने शेत व्यापारी तसाच प्रकार आज समाजाचा झाला आहे. आज आपणांस जितकी प्रगती दिसत आहे तितकीच दिसणारी अधोगती खरी नाही कां..? याचे कारण माणसांत बळावलेली विकारविवशता हेच आहे.

गोकुळातील एक गोपिका भगवंताला आतुरतेने हाक मारीत असे. देवा..! एकदा माझ्या ह्रदयमंदिरांत ये ना..! तुला पाहण्यास मी खूप आतुर आहे रे..! देव रोज तिला येण्याचे आश्वासन देत होते पण येत काही नव्हते. एकदिवस ती गोपबाला देवाला म्हणाली, देवा..! तुझ्या न येण्यामागे कारण तरी मला सांग..? तेव्हा देव म्हणाले, प्रथम तूं तुझे ह्रदयाच्या स्वच्छ कर आणि मगच मी येईन..! ती गोपिका आपला स्वानुभव कथन करते -

हरि या हो चला मंदिर । कुणी नाही दुसरे घरी ।काम दादला गेला बाहेरी । क्रोध सासू ती नाही घरी ॥

देव हा माणसांपासून दूर राहू नये आणि माणसं देवाजवळ जावीत असं वाटत असेल तर हे विकारनिर्मूलन झालंच पाहिजे.

फुले उमलतात, बहरतात, सुगंधाची उधळण करतात व वातावरणांत परिमळ ठेवून जातात तशीच विकाररहित माणसं सर्वांनाच प्रिय होतात..!

ही विकारविवशता कमी करण्यासाठीच संतांनी भक्तीमार्गाचा पुरस्कार केला. देव तर आपल्यातच आहे, फक्त विकारविवशतेमुळे त्याची जाणीव होत नाही..!

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक