शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

देव तर आपल्यातच आहे; फक्त विकारविवशतेमुळे त्याची जाणीव नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 13:43 IST

देव हा माणसांपासून दूर राहू नये आणि माणसं देवाजवळ जावीत असं वाटत असेल तर माणसाच्या मनातील  विकारनिर्मूलन हे झालंच पाहिजे..! फुले उमलतात, बहरतात, सुगंधाची उधळण करतात व वातावरणांत परिमळ ठेवून जातात तशीच विकाररहित माणसं सर्वांनाच प्रिय होतात..!

- युवा कीर्तनकार, ह.भ.प. ऋतुपर्ण भरतबुवा रामदासी ( बीड, महाराष्ट्र. ८७ ९३ ०३ ०३ ०३ )

अध्यात्मशास्त्रांत विकारांवर नियंत्रण ठेवण्याला खूप महत्व आहे. खरं तर माणसाचे मन हे एक कुरुक्षेत्र आहे. त्यात विचारांचा आणि विकारांचा सतत संघर्ष चालू असतो. त्यातच विकार अधिक प्रमाणात उचल खातात आणि माणसाचा पशू होतो. ज्ञानराज माऊली म्हणतात -

रुणू झुणू रुणू झुणू रे भ्रमरा ।सांडि तूं अवगुणूं रे भ्रमरा ॥

कधी कधी विकार हे माणसाचे जीवन उद्ध्वस्त करतात. प्रश्न असा पडतो की, हे विकार कमी करण्याचा काही उपाय नाही का..? तर भगवान रामकृष्ण परमहंस सुंदर दृष्टांत देत असत.

लोखंडाची वस्तू जर खूप गंजलेली असेल तर लोहचुंबक तिला आकर्षित करुं शकत नाही. वरचा गंज जर खरवडून काढला तरच ती लोखंडी वस्तू लोहचुंबकाकडे आकर्षित होते.

ही विकारविवशता कमी करण्याचे एकमेव साधन म्हणजे मनुष्याने ईश्वरपरायण होणे. विकार कमी करण्याचे एकमेव साधन म्हणजे ईश्वरभक्ती आहे. आज विकार विकारविवशतेने ग्रासलेल्या या जगाला अवकळा आली आहे.

एखाद्या शेताकडे दुर्लक्ष व्हावे, पेरणीचा विसर पडावा, शेताची मशागत राहून जावी व काटेरी कुंपणाने शेत व्यापारी तसाच प्रकार आज समाजाचा झाला आहे. आज आपणांस जितकी प्रगती दिसत आहे तितकीच दिसणारी अधोगती खरी नाही कां..? याचे कारण माणसांत बळावलेली विकारविवशता हेच आहे.

गोकुळातील एक गोपिका भगवंताला आतुरतेने हाक मारीत असे. देवा..! एकदा माझ्या ह्रदयमंदिरांत ये ना..! तुला पाहण्यास मी खूप आतुर आहे रे..! देव रोज तिला येण्याचे आश्वासन देत होते पण येत काही नव्हते. एकदिवस ती गोपबाला देवाला म्हणाली, देवा..! तुझ्या न येण्यामागे कारण तरी मला सांग..? तेव्हा देव म्हणाले, प्रथम तूं तुझे ह्रदयाच्या स्वच्छ कर आणि मगच मी येईन..! ती गोपिका आपला स्वानुभव कथन करते -

हरि या हो चला मंदिर । कुणी नाही दुसरे घरी ।काम दादला गेला बाहेरी । क्रोध सासू ती नाही घरी ॥

देव हा माणसांपासून दूर राहू नये आणि माणसं देवाजवळ जावीत असं वाटत असेल तर हे विकारनिर्मूलन झालंच पाहिजे.

फुले उमलतात, बहरतात, सुगंधाची उधळण करतात व वातावरणांत परिमळ ठेवून जातात तशीच विकाररहित माणसं सर्वांनाच प्रिय होतात..!

ही विकारविवशता कमी करण्यासाठीच संतांनी भक्तीमार्गाचा पुरस्कार केला. देव तर आपल्यातच आहे, फक्त विकारविवशतेमुळे त्याची जाणीव होत नाही..!

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक