शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

देव तर आपल्यातच आहे; फक्त विकारविवशतेमुळे त्याची जाणीव नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 13:43 IST

देव हा माणसांपासून दूर राहू नये आणि माणसं देवाजवळ जावीत असं वाटत असेल तर माणसाच्या मनातील  विकारनिर्मूलन हे झालंच पाहिजे..! फुले उमलतात, बहरतात, सुगंधाची उधळण करतात व वातावरणांत परिमळ ठेवून जातात तशीच विकाररहित माणसं सर्वांनाच प्रिय होतात..!

- युवा कीर्तनकार, ह.भ.प. ऋतुपर्ण भरतबुवा रामदासी ( बीड, महाराष्ट्र. ८७ ९३ ०३ ०३ ०३ )

अध्यात्मशास्त्रांत विकारांवर नियंत्रण ठेवण्याला खूप महत्व आहे. खरं तर माणसाचे मन हे एक कुरुक्षेत्र आहे. त्यात विचारांचा आणि विकारांचा सतत संघर्ष चालू असतो. त्यातच विकार अधिक प्रमाणात उचल खातात आणि माणसाचा पशू होतो. ज्ञानराज माऊली म्हणतात -

रुणू झुणू रुणू झुणू रे भ्रमरा ।सांडि तूं अवगुणूं रे भ्रमरा ॥

कधी कधी विकार हे माणसाचे जीवन उद्ध्वस्त करतात. प्रश्न असा पडतो की, हे विकार कमी करण्याचा काही उपाय नाही का..? तर भगवान रामकृष्ण परमहंस सुंदर दृष्टांत देत असत.

लोखंडाची वस्तू जर खूप गंजलेली असेल तर लोहचुंबक तिला आकर्षित करुं शकत नाही. वरचा गंज जर खरवडून काढला तरच ती लोखंडी वस्तू लोहचुंबकाकडे आकर्षित होते.

ही विकारविवशता कमी करण्याचे एकमेव साधन म्हणजे मनुष्याने ईश्वरपरायण होणे. विकार कमी करण्याचे एकमेव साधन म्हणजे ईश्वरभक्ती आहे. आज विकार विकारविवशतेने ग्रासलेल्या या जगाला अवकळा आली आहे.

एखाद्या शेताकडे दुर्लक्ष व्हावे, पेरणीचा विसर पडावा, शेताची मशागत राहून जावी व काटेरी कुंपणाने शेत व्यापारी तसाच प्रकार आज समाजाचा झाला आहे. आज आपणांस जितकी प्रगती दिसत आहे तितकीच दिसणारी अधोगती खरी नाही कां..? याचे कारण माणसांत बळावलेली विकारविवशता हेच आहे.

गोकुळातील एक गोपिका भगवंताला आतुरतेने हाक मारीत असे. देवा..! एकदा माझ्या ह्रदयमंदिरांत ये ना..! तुला पाहण्यास मी खूप आतुर आहे रे..! देव रोज तिला येण्याचे आश्वासन देत होते पण येत काही नव्हते. एकदिवस ती गोपबाला देवाला म्हणाली, देवा..! तुझ्या न येण्यामागे कारण तरी मला सांग..? तेव्हा देव म्हणाले, प्रथम तूं तुझे ह्रदयाच्या स्वच्छ कर आणि मगच मी येईन..! ती गोपिका आपला स्वानुभव कथन करते -

हरि या हो चला मंदिर । कुणी नाही दुसरे घरी ।काम दादला गेला बाहेरी । क्रोध सासू ती नाही घरी ॥

देव हा माणसांपासून दूर राहू नये आणि माणसं देवाजवळ जावीत असं वाटत असेल तर हे विकारनिर्मूलन झालंच पाहिजे.

फुले उमलतात, बहरतात, सुगंधाची उधळण करतात व वातावरणांत परिमळ ठेवून जातात तशीच विकाररहित माणसं सर्वांनाच प्रिय होतात..!

ही विकारविवशता कमी करण्यासाठीच संतांनी भक्तीमार्गाचा पुरस्कार केला. देव तर आपल्यातच आहे, फक्त विकारविवशतेमुळे त्याची जाणीव होत नाही..!

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक