शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

Gemology: ज्योतिषांच्या सल्ल्याशिवाय पुष्कराज घालताय? सर्वांनाच तो लाभतो असे नाही; वाचा हा किस्सा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2022 11:43 IST

Gemology: भाग्योदयासाठी विविध रत्नांचा वापर केला जातो, मात्र तो ज्योतिष सल्ल्याशिवाय केला असेल तर कसे नुकसान होते बघा!

>> ज्योतिषी सोनाली लिखितकर

 पुष्कराज रत्न सर्वांनी घातले तर चालेल का ?अशी  विचारणा मला काही जणांनी केली होती आणि त्यावरचे माझे काही अनुभव आपल्यासमोर मांडत  आहे.  मे २००८ ची गोष्ट .एक तरुण , वय वर्षे ३२ .माझ्या कडे आला होता. त्यांचा प्रश्न होता ,मी गेले ७ वर्ष लग्न होण्याकरता प्रयत्न करतोय पण जमत नाहीय. आमच्या समाजात लवकर लग्ने केली जातात . पण माझे दर वेळी काही ना काही होऊन लग्न मोडते .कधी मुलगी पसंत पडत नाही .तर कधी मी  मुलीला पसंत पडत नाही. दोघे पसंत झालो तर घरच्यांना स्थळ पसंत पडत नाही .एकदा तर बस्ता बांधायला गेलो आणि तेथे भांडणे होऊन लग्न  मोडले .वास्तविक आम्ही दोघे लग्न करायला तयार होतो, पण घरच्या लोकांसमोर  काय करणार? शेवटी अजूनही मी अविवाहित आहे .आता माझी पत्रिका पाहून सांगा काय प्रोब्लेम आहे? मी पत्रिका पाहीली.

आता थोडे विवाह योगाविषयी सांगावे लागेल. कुंडलीतील १२ स्थानांपैकी १ आणि ६ ही स्थाने विवाहास प्रखर विरोध करतात .आता त्याची कुंडली नीट अभ्यासली. पण मला थोडासा त्रास वगळता कोणताही मोठे कारण दिसेना की ज्यामुळे लग्नच होणार नाही. मग सहज लक्ष गेले  की पत्रिकेत १ आणि ६ या स्थानाचा एकमेव कार्येश ग्रह गुरु आहे .तेवढ्यात तो म्हणाला अहो ताई, हा बघा पुष्कराज चांगला ७ कॅरटचा आहे. आमच्या गावातल्या गुरुजींनी सांगितला होता घालायला. चांगला असतो ना तो लग्नाकरता म्हणून! मी तर हादरलेच .अरे बापरे, हे कारण आहे की काय याच्या लग्न ना होण्याचे? 

मग त्याला विचारले कीती वर्षापासून घातला आहे ? तो म्हणला ५ वर्षे झाली. आता तुम्ही अजून काही खडा किंवा पूजा असेल तर सांगा मी करतो. कितीही खर्च होऊ द्या. मी आणि माझे आई वडील फार वैतागलो आहे .मी पुन्हा कुंडलीवर नजर टाकली. त्याच्या कुंडलीत बुध ग्रह विवाहाच्या दृष्टीने उत्तम वाटत होता आणि त्याची दशा म्हणजेच त्यांचा काल सुरु होणार होता नोव्हेम्बरमध्ये आणि आता तर मे महिना  होता. पण तरीही खूप काही लांब नव्हता. म्हणुन त्याला म्हणाले, "हे बघ बुध ग्रह म्हणजेच पाचू हे बुधाचे रत्न तुला फायदेशीर आहे ,पण त्याचा काल अगदी ५,६ महिन्यातच सुरु होणार असल्याने तू पाचू घातला नाहीस तरी चालेल. आपोआपच तेव्हा लग्न होईल. पण महत्वाचे म्हणजे हा पुष्कराज अगदी लगेच काढ ". तर तो म्हणाला ,"पण ताई तो तर मला लग्नाकरिताच सांगितला होता". मग मी त्याला गुरूच्या रत्नाचे त्याच्या कुंडलीत काय परिणाम आहेत ते सांगितले . आणि म्हणले ,जसे  सर्दीताप  बरा  होण्याकरिता आपण औषध घेतो पण त्याबरोबरच थंड पदार्थ ,दही इत्यादी न खाणे हे पथ्य पाळावे लागते, तसेच तुझे झाले आहे तुझा विवाह योग असून सुद्धा तू त्याला अपथ्यकर असा पुष्कराज त्यातून ७ कॅरटचा  घातलास. म्हणूनच विवाह योग असून लग्न ठरत नव्हते आणि अजून एक सोपा उपाय सांगते तो कर. असे सांगून त्याला एक उपाय सांगितला. हा उपाय तुला दर बुधवारी ७ आठवडे करावा लागेल हे पण सांगितले.

"ठीक  आहे. काढतो ताई खडा .असे म्हणुन त्याने पुष्कराज  काढला.  ताई आता तुम्ही सांगितलेले बाकी  उपाय पण करून पाहतो" असे म्हणुन तो गेला. बरोबर ३ आठवड्या नंतरच्या बुधवारी रात्री ९ वाजता त्यांचा फोन आला. अतिशय आनंदाने त्याने सांगितले.२ दिवसापूर्वी त्याने एक मुलगी पाहीली आणि दोन्ही कड्च्याना पसंत पडून लग्न ठरले आहे. मग ३,४ दिवसात पुन्हा मुहूर्त काढून द्या जुलै महिन्यातला असे म्हणुन आला. पण मी म्हणाले तुझा योग तर नोव्हेंबर मध्ये आहे .पण ताई आता घरच्यांनी या सिझनच्या शेवटचा मुहूर्त जुलै १४ आहे. त्याच्या अगोदरच लग्न करायचे ठरवले आहे .मग मी नाईलाजास्तव मुहूर्त काढून दिला .मग पुन्हा महिन्याभराने त्यांचा फोन आला .मग मी चेष्टेने  म्हणले काय रे लग्नाला बोलावले नाही का? तर म्हणाला आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरलो लग्नाच्या हॉल करिता पण कुठेच मिळेना .सर्व चांगले हॉल बुक झाले होते .शेवटी हॉलवालाच म्हणला ,"अहो तुम्हाला नोव्हेम्बर मध्ये हवा असेल तर भरपूर तारखा आहेत शिल्लक आणि मध्ये तर चातुर्मास आहे त्यात करत नाहीत ना .म्हणुन आम्ही शेवटी आता नोव्हेम्बर मध्येच ठरवलंय .आता तुम्ही नोव्हेम्बरचा मुहूर्त काढून द्या.'' मी मनातच हसले. माझ्या गुरुवर्यांना आणि कृष्णमुर्ती  पद्धत ज्यांनी तयार केली त्या कृष्ण मूर्तींना  मनोमन वंदन केले. आता त्याचे लग्न होऊन त्याला एक छान मुलगी पण झालीय ......

संपर्क व्हाट्स अप 98090447025

टॅग्स :Astrologyफलज्योतिष