शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

Geeta Jayanti 2021 : भगवान श्रीकृष्णाने ज्या कुरुक्षेत्रावर उभे राहून अर्जुनाला गीता सांगितली त्या कुरुक्षेत्राची सद्यस्थिती जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2021 13:06 IST

Geeta Jayanti 2021 : साडेपाच हजार वर्षांपूर्वीचे कुरुक्षेत्र आजच्या हरियाणाचा काही भाग आणि पश्चिमी उत्तर प्रदेशाचा काही भागात व्यापला आहे. जाणून घेऊया सद्यस्थिती!

१४ डिसेंबर रोजी गीता जयंती आहे. गीता जयंती म्हणजे तोच दिवस, जेव्हा भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला कुरुक्षेत्रावर भगवद्गीता सांगितली होती. त्या अर्थाने गीतेचा जन्म या दिवशी झाला, म्हणून त्या दिवसाला गीता जयंती म्हटले जाते. 

महाभारताच्या वेळी ऐन युद्धभूमीवर आपल्याच नातलगांविरूध्द शस्त्र उगारताना अर्जुन वैफल्याने ग्रासून गेला होता. या महायुद्धात होणारी प्रचंड जिवीतहानी आणि त्याचे दूरगामी परिणाम त्याला दिसत होते. एका क्षणाला त्याने युद्ध करणार नाही म्हणत हातातील शस्त्रे टाकून दिली. अर्जुनासाठी तो आयुष्यातला सर्वात मोठा नैराश्याचा क्षण होता. त्यावेळेस भगवान श्रीकृष्णांनी त्याला आयुष्याचे तत्वज्ञान गीतामृत स्वरूपात पाजले. त्याचे शंका निरसन केले आणि अर्जुनाच्या विनंतीवरून आपल्या विराट रूपात दर्शन दिले. युद्ध पार पडले. प्रेतांचा खच पडला, रक्ताचे चिखल झाले, मात्र सत्याने असत्यावर विजय मिळवला. अर्थात पांडवांचा विजय झाला. हे सर्व वाचून आपल्याही डोळ्यासमोर तो युद्धभूमीचा प्रसंग उभा राहिला असेल. ती भूमी प्रत्यक्ष पहावी, असेही वाटत असेल किंवा तिथे आता काय परिस्थिती असेल, याबद्दल कुतुहलही निर्माण होत असेल. हे जाणून घेण्यासाठी आपणही साडे पाच हजार वर्षांपूर्वीच्या युद्धभूमीवर सद्यस्थिती काय आहे, याचा आढावा घेऊया.

साडेपाच हजार वर्षांपूर्वीचे कुरुक्षेत्र आजच्या हरियाणाचा काही भाग आणि पश्चिमी उत्तर प्रदेशाचा काही भागात व्यापला आहे. पूर्वीच्या भाषेत सांगायचे तर कुरुक्षेत्र ४८ कोस दूर पसरले होते. आजतागायत त्या परिसरात इतिहास संशोधक उत्खनन करत आहेत. त्यात अनेक प्राचीन संदर्भ, पुरावे, अवशेष सापडत आहेत. असे म्हणतात, की आजही तिथल्या मातीचा रंग रक्तासारखा लाल आहे.

ज्याठिकाणी अर्जुनाच्या रथावर स्वार होऊन भगवान श्रीकृष्णांनी गीता सांगितली होती, त्या ठिकाणी एक प्राचीन वटवृक्ष आहे. तज्ज्ञांच्या मते, हा वृक्ष साडे पाच हजार वर्षे जुना वटवृक्ष आहे. त्याचठिकाणी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला आपल्या विराट रूपात दर्शन दिले होते. त्यामुळे ऐतिहासिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या त्या वटवृक्षाला अतिशय महत्त्व प्राप्त झाले आहे. तो वृक्ष ज्योतीसार नावाने ओळखला जातो. 

कुरुक्षेत्राच्या दर्शनाइतकेच दर्शनीय आहे, तिथले ब्रह्मसरोवर. या सरोवराचा उल्लेख वामन पुराणातही पाहायला मिळतो. हे सरोवर महाभारत काळापासून स्थित असल्याचे म्हटले जाते. शिवाय असेही म्हणतात, की मृत्यूच्या भीतीने दूर्योधन याच सरोवरात जाऊन लपला होता. तसेच ब्रह्मदेवांचाही या सरोवराशी पौराणिक संदर्भ जोडला जातो. सूर्यग्रहण काळात तिथे मोठी जत्रा भरते. तसेच डिसेंबर महिन्यात गीता जयंतीला तिथे मोठा उत्सवही साजरा केला जातो. 

कुरुक्षेत्राच्या भूमीवर देवीच्या ५२ शक्तीपीठांपैकी एक शक्तीपीठ म्हणजे भद्रकाली देवीचे मंदिर स्थित आहे. महाभारताचे युद्ध सुरू होण्यापूर्वी पांडवांनी या मंदिरात जाऊन देवीचा आशीर्वाद घेतला होता, असे म्हणतात. तसेच युद्धात विजयी झाल्यानंतर पांडवांनी आपले घोडे इथे दान दिले होते, असेही सांगितले जाते. या मान्यतेनुसार इच्छापूर्ती, नवसपूर्ती झाल्यावर घोडा दान करण्याची प्रथा तिथे रूढ झाली. 

याशिवाय तिथे श्रीकृष्ण संग्रहालय आहे. जिथे महाभारतातील कथांवर आधारित, तसेच संशोधनात सापडलेल्या अवशेषांवर आधारित गोष्टींचे संग्रहीकरण केले आहे. तिथे पुराण आणि विज्ञान यांचा सुरेख संगम पहायला मिळतो. पर्यटक तिथे मोठ्या प्रमाणावर भेट देतात. म्हणून, आपणही कधी संधी मिळाली, तर कुरुक्षेत्राचे दर्शन अवश्य घ्या.

टॅग्स :Mahabharatमहाभारत