शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

'सगळ्या वाईट गोष्टी माझ्याबरोबरच का घडतात?' या प्रश्नाचे उत्तर देताहेत गौर गोपाल दास!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2021 13:57 IST

कोणाच्या वाट्याला कशी परिस्थिती येऊ शकते यावर कोणीच भाष्य करू शकत नाही. मात्र आलेल्या परिस्थितीला तोंड कसे द्यायचे हा प्रत्येकाचा सरावाचा भाग असतो आणि त्यावर त्याचे सुख दुःखं अवलंबून असते.

दुसऱ्यांच्या तुलनेत देवाने सगळी दुःखं माझ्या एकट्याच्याच पदरात का टाकली, असा प्रश्न प्रत्येकाला पडतो. दुसऱ्याच्या लेखी आपण सुखी तर आपल्या लेखी तो सुखी आहे असे आपल्याला वाटत असते. वास्तवात प्रत्येकाच्या वाट्याला सुख आहे आणि दुखं आहे. सुखी तोच बनू शकतो जो दुःखावर मात करतो किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. म्हणून देवाने माझ्याच वाट्याला सगळी दुःखं का दिली, याचा विचार सोडा आहे आणि माझ्या वाट्याला आलेल्या समस्यांना मी सामोरा कसा जाऊ शकतो यादृष्टीने विचार आणि कृती सुरू करा, सांगताहेत प्रख्यात व्याख्याते गौर गोपाल दास प्रभू!

कोणाच्या वाट्याला कशी परिस्थिती येऊ शकते यावर कोणीच भाष्य करू शकत नाही. मात्र आलेल्या परिस्थितीला तोंड कसे द्यायचे हा प्रत्येकाचा सरावाचा भाग असतो आणि त्यावर त्याचे सुख दुःखं अवलंबून असते. सामान्य लोक कठीण प्रसंगी भांबावून जातात, गोंधळतात तर असामान्य लोक कठीण प्रसंगातही शांत असतात. ते समस्येचा विचार न करता उकल शोधण्याचा विचार सुरू करतात. 

असे असामान्य लोक जन्माला येत नाहीत. तर जन्मानंतर ते स्वतःची घडण अशी करतात की ते असामान्य पदाला जाऊन पोहोचतात. यासाठी ते प्रत्येक परिस्थितीत शांत राहण्याचा पर्याय निवडतात. याचे स्पष्टीकरण देताना गौर गोपाल दास सोड्याची बाटली आणि पाण्याची बाटली याचे उदाहरण देतात. सोड्याची सीलबंद बाटली वर खाली केली, तर झाकण उघडताच क्षणी त्यातून फेसाळ द्रव्य बाहेर येते. तेच पाण्याची सील बंद बाटली कितीही हलवली तरी त्याचे सील उघडल्यावर न फेसाळता ते शांतपणे बाहेर येते. आपण सगळे त्या सोड्याच्या बाटलीसारखे फसफसणारे आहोत. लोक आपल्याला राग देतात, उकसवतात, भांडायला फूस लावतात, अशा वेळी फसफसून बाहेर यायचं की शांतपणे कोणतीही प्रतिक्रिया न देता पाण्यासारखं थंड प्रवाही राहायचं यावर आपला सामान्यांकडून असामान्यत्त्वाचा प्रवास घडतो. 

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर त्याच्या उत्तम खेळीसाठी जाणला जातोच शिवाय त्याच्या शांत एकाग्र चित्तासाठी देखील त्याचे उदाहरण दिले जाते. साध्या क्रिकेट ग्राउंडवर किंवा अगदी गल्ली क्रिकेट खेळताना मुलं शिव्यांची लाखोली वाहतात, परंतु आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रिकेट खेळूनही सचिनने आजवर एकाही मॅच मध्ये अपशब्द काढला नाही, हे त्याचे असामान्यत्व आहे. ते आपण शिकले पाहिजे. 

अनेकदा परिस्थिती आपल्या हाताबाहेर जाते, समोरची व्यक्ती मनाविरुद्ध वागते, अशा वेळी सोडा बॉटलसारखे फसफसून व्यक्त होऊ नका. त्यावेळी पाण्याची बाटली आठवा आणि स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. जेवढं शांत राहाल तेवढ्या लवकर तुम्हाला परिस्थितीतून मार्ग सापडेल. हे जेव्हा सवयीने तुम्हाला जमू लागेल, तेव्हा तुम्ही आपणहून कुरकुरणे बंद कराल आणि देवाकडे आपल्यावर आलेल्या परिस्थितीची तक्रार न करता त्याच्याकडे त्या परिस्थितीतून बाहेर पडण्याचे बळ मागाल...!

टॅग्स :Mental Health Tipsमानसिक आरोग्य