शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

'सगळ्या वाईट गोष्टी माझ्याबरोबरच का घडतात?' या प्रश्नाचे उत्तर देताहेत गौर गोपाल दास!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2021 13:57 IST

कोणाच्या वाट्याला कशी परिस्थिती येऊ शकते यावर कोणीच भाष्य करू शकत नाही. मात्र आलेल्या परिस्थितीला तोंड कसे द्यायचे हा प्रत्येकाचा सरावाचा भाग असतो आणि त्यावर त्याचे सुख दुःखं अवलंबून असते.

दुसऱ्यांच्या तुलनेत देवाने सगळी दुःखं माझ्या एकट्याच्याच पदरात का टाकली, असा प्रश्न प्रत्येकाला पडतो. दुसऱ्याच्या लेखी आपण सुखी तर आपल्या लेखी तो सुखी आहे असे आपल्याला वाटत असते. वास्तवात प्रत्येकाच्या वाट्याला सुख आहे आणि दुखं आहे. सुखी तोच बनू शकतो जो दुःखावर मात करतो किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. म्हणून देवाने माझ्याच वाट्याला सगळी दुःखं का दिली, याचा विचार सोडा आहे आणि माझ्या वाट्याला आलेल्या समस्यांना मी सामोरा कसा जाऊ शकतो यादृष्टीने विचार आणि कृती सुरू करा, सांगताहेत प्रख्यात व्याख्याते गौर गोपाल दास प्रभू!

कोणाच्या वाट्याला कशी परिस्थिती येऊ शकते यावर कोणीच भाष्य करू शकत नाही. मात्र आलेल्या परिस्थितीला तोंड कसे द्यायचे हा प्रत्येकाचा सरावाचा भाग असतो आणि त्यावर त्याचे सुख दुःखं अवलंबून असते. सामान्य लोक कठीण प्रसंगी भांबावून जातात, गोंधळतात तर असामान्य लोक कठीण प्रसंगातही शांत असतात. ते समस्येचा विचार न करता उकल शोधण्याचा विचार सुरू करतात. 

असे असामान्य लोक जन्माला येत नाहीत. तर जन्मानंतर ते स्वतःची घडण अशी करतात की ते असामान्य पदाला जाऊन पोहोचतात. यासाठी ते प्रत्येक परिस्थितीत शांत राहण्याचा पर्याय निवडतात. याचे स्पष्टीकरण देताना गौर गोपाल दास सोड्याची बाटली आणि पाण्याची बाटली याचे उदाहरण देतात. सोड्याची सीलबंद बाटली वर खाली केली, तर झाकण उघडताच क्षणी त्यातून फेसाळ द्रव्य बाहेर येते. तेच पाण्याची सील बंद बाटली कितीही हलवली तरी त्याचे सील उघडल्यावर न फेसाळता ते शांतपणे बाहेर येते. आपण सगळे त्या सोड्याच्या बाटलीसारखे फसफसणारे आहोत. लोक आपल्याला राग देतात, उकसवतात, भांडायला फूस लावतात, अशा वेळी फसफसून बाहेर यायचं की शांतपणे कोणतीही प्रतिक्रिया न देता पाण्यासारखं थंड प्रवाही राहायचं यावर आपला सामान्यांकडून असामान्यत्त्वाचा प्रवास घडतो. 

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर त्याच्या उत्तम खेळीसाठी जाणला जातोच शिवाय त्याच्या शांत एकाग्र चित्तासाठी देखील त्याचे उदाहरण दिले जाते. साध्या क्रिकेट ग्राउंडवर किंवा अगदी गल्ली क्रिकेट खेळताना मुलं शिव्यांची लाखोली वाहतात, परंतु आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रिकेट खेळूनही सचिनने आजवर एकाही मॅच मध्ये अपशब्द काढला नाही, हे त्याचे असामान्यत्व आहे. ते आपण शिकले पाहिजे. 

अनेकदा परिस्थिती आपल्या हाताबाहेर जाते, समोरची व्यक्ती मनाविरुद्ध वागते, अशा वेळी सोडा बॉटलसारखे फसफसून व्यक्त होऊ नका. त्यावेळी पाण्याची बाटली आठवा आणि स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. जेवढं शांत राहाल तेवढ्या लवकर तुम्हाला परिस्थितीतून मार्ग सापडेल. हे जेव्हा सवयीने तुम्हाला जमू लागेल, तेव्हा तुम्ही आपणहून कुरकुरणे बंद कराल आणि देवाकडे आपल्यावर आलेल्या परिस्थितीची तक्रार न करता त्याच्याकडे त्या परिस्थितीतून बाहेर पडण्याचे बळ मागाल...!

टॅग्स :Mental Health Tipsमानसिक आरोग्य