शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
3
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
4
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
5
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
6
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
7
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
8
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
9
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
10
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
11
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
12
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
13
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
14
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
15
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
16
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
17
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
18
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
19
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
20
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज

गणेशोत्सव : आधी मन घेई हाती, तोची गणराजा गणपती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2020 06:12 IST

सद्गुरु वामनराव पै यांनी एका भाषणामध्ये गणपतीची महती स्पष्ट केली होती. सध्या सुरू असलेल्या गणेशोत्सवानिमित्त त्यांच्या भाषणाचा हा सारांश.

- सद्गुरुवामनराव पै(जीवनविद्या मिशनचे संस्थापक)आपल्या देशात गणेशोत्सव आपण सर्व आनंदाने साजरा करत असतो. यावेळी लोक आपापली दु:खे विसरून जातात, या दृष्टीने या उत्सवाचे महत्त्व आहेच. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला त्यामागे समाजप्रबोधन हा खरा आणि एकमेव हेतू आहे. हा हेतू लक्षात घेऊन गणेशोत्सव साजरा केला गेला तर त्याचे मांगल्य टिकून राहील. गणेशोत्सवातील कार्यक्रमांना समाजप्रबोधन ही एकच दिशा असली पाहिजे. गणपती हे विद्येचे, ज्ञानाचे, शौर्याचे, चातुर्याचे, बुद्धीचे, सामर्थ्याचे दैवत असल्यामुळे लोकमान्य टिळकांनी समाजप्रबोधनासाठी हे दैवत निवडले. पारतंत्र्य काळात धार्मिक उत्सवांच्या निमित्ताने लोक एकत्रित येतील, राष्ट्रकार्यासाठी त्यांना संघटित करता येईल यासाठी लोकमान्य टिळकांनी या उत्सवाचा चंग बांधला. लोकांना आज समाजप्रबोधनाचे महत्त्व वाटत नसल्यामुळे हा हेतू बाजूला होत असलेला दिसत आहे.आपल्या साधुसंतांनी, ऋषिमुनींनी खरा गणपती कोण ते आधीच सांगून ठेवलेले आहे. खऱ्या गणपतीची उपासना करता यावी यासाठी या गणेशाची आपण उपासना करायची असते. ‘आधी मन घेई हाती, तोची गणराजा गणपती’ असे म्हटलेले आहे. तुमचे मन हेच खरा गणपती आहे.या मनरूपी गणपतीला प्रसन्न करून घ्यायचे आहे. यासाठी तुकाराम महाराज असेही सांगतात की ‘मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण’. या मनाला प्रसन्न करून घेतले तरच तुमच्या जीवनातील सर्व प्रश्न सुटतील आणि जीवनात सुखच सुख असेल. भगवतगीतेत, उपनिषदांत या मनरूपी गणपतीचे महत्त्व सांगितलेले आहे. गणपती म्हणजे गणांचा पती, गुणांचा पती. आपल्या ठिकाणी असणारी कर्मेंद्रिये, ज्ञानेंद्रिये या सर्वांचा स्वामी गणपती आहे.आपले जे स्वरूप आहे ते प्राप्त करून घेण्यासाठी मनरूपी गणपतीला प्रसन्न करून घेतले पाहिजे. आपल्या गणपतीच्या हातात शस्रे आहेत. त्यातून तुम्ही शूरवीर व्हा, असा संदेश तो देतो आहे. ज्याची तुम्ही भक्ती करता ते तुम्ही झाले पाहिजे याला सायुज्यता मुक्ती असे म्हणतात. गणपती बुद्धीची देवता आहे याचा अर्थ तुम्ही बुद्धिमान व्हा, ज्ञानी व्हा. गणपतीच्या चातुर्याची कथा तुम्हाला ठाऊकच आहे, त्यातून तो आपल्याला चतुर व्हा असे सांगत आहे. गणपती हे मातृभक्त होते, त्याप्रमाणे आपणही मातृभक्त असले पाहिजे.मनरूपी गणपतीला प्रसन्न करून घेण्यासाठी स्थैर्य, शांतीचे मोदक दिले तरच हा गणपती प्रसन्न होतो. ‘शांतीपरते नाही सुख.’ शांतीरूपी मोदक मनाला मिळाला की हे प्रसन्न झालेले मन तुम्हाला तुम्ही मागाल ते देते. आज आपण मनाला काळजी, चिंता, द्वेष यांचा मोदक देत असतो. मनरूपी गणपतीचा अभ्यास केला पाहिजे.मनरूपी गणपतीला अनिष्ट गोष्टी दिल्या की त्याचा तुमच्यावर कोप होतो. पवित्र, मंगल विचारांचा मोदक तुम्ही त्याला दिलात तर तुमच्यावर त्याच्या कृपेचा वर्षाव होतो. हे सर्व मंगल विचार आमच्या विश्वप्रार्थनेत आहे. मनरूपी गणपतीला विश्वप्रार्थनेचा मोदक द्या.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव