शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
7
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
8
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
9
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
10
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
11
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
12
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
13
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
14
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
15
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
16
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
17
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
18
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
19
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
20
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले

गणेशोत्सव : आधी मन घेई हाती, तोची गणराजा गणपती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2020 06:12 IST

सद्गुरु वामनराव पै यांनी एका भाषणामध्ये गणपतीची महती स्पष्ट केली होती. सध्या सुरू असलेल्या गणेशोत्सवानिमित्त त्यांच्या भाषणाचा हा सारांश.

- सद्गुरुवामनराव पै(जीवनविद्या मिशनचे संस्थापक)आपल्या देशात गणेशोत्सव आपण सर्व आनंदाने साजरा करत असतो. यावेळी लोक आपापली दु:खे विसरून जातात, या दृष्टीने या उत्सवाचे महत्त्व आहेच. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला त्यामागे समाजप्रबोधन हा खरा आणि एकमेव हेतू आहे. हा हेतू लक्षात घेऊन गणेशोत्सव साजरा केला गेला तर त्याचे मांगल्य टिकून राहील. गणेशोत्सवातील कार्यक्रमांना समाजप्रबोधन ही एकच दिशा असली पाहिजे. गणपती हे विद्येचे, ज्ञानाचे, शौर्याचे, चातुर्याचे, बुद्धीचे, सामर्थ्याचे दैवत असल्यामुळे लोकमान्य टिळकांनी समाजप्रबोधनासाठी हे दैवत निवडले. पारतंत्र्य काळात धार्मिक उत्सवांच्या निमित्ताने लोक एकत्रित येतील, राष्ट्रकार्यासाठी त्यांना संघटित करता येईल यासाठी लोकमान्य टिळकांनी या उत्सवाचा चंग बांधला. लोकांना आज समाजप्रबोधनाचे महत्त्व वाटत नसल्यामुळे हा हेतू बाजूला होत असलेला दिसत आहे.आपल्या साधुसंतांनी, ऋषिमुनींनी खरा गणपती कोण ते आधीच सांगून ठेवलेले आहे. खऱ्या गणपतीची उपासना करता यावी यासाठी या गणेशाची आपण उपासना करायची असते. ‘आधी मन घेई हाती, तोची गणराजा गणपती’ असे म्हटलेले आहे. तुमचे मन हेच खरा गणपती आहे.या मनरूपी गणपतीला प्रसन्न करून घ्यायचे आहे. यासाठी तुकाराम महाराज असेही सांगतात की ‘मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण’. या मनाला प्रसन्न करून घेतले तरच तुमच्या जीवनातील सर्व प्रश्न सुटतील आणि जीवनात सुखच सुख असेल. भगवतगीतेत, उपनिषदांत या मनरूपी गणपतीचे महत्त्व सांगितलेले आहे. गणपती म्हणजे गणांचा पती, गुणांचा पती. आपल्या ठिकाणी असणारी कर्मेंद्रिये, ज्ञानेंद्रिये या सर्वांचा स्वामी गणपती आहे.आपले जे स्वरूप आहे ते प्राप्त करून घेण्यासाठी मनरूपी गणपतीला प्रसन्न करून घेतले पाहिजे. आपल्या गणपतीच्या हातात शस्रे आहेत. त्यातून तुम्ही शूरवीर व्हा, असा संदेश तो देतो आहे. ज्याची तुम्ही भक्ती करता ते तुम्ही झाले पाहिजे याला सायुज्यता मुक्ती असे म्हणतात. गणपती बुद्धीची देवता आहे याचा अर्थ तुम्ही बुद्धिमान व्हा, ज्ञानी व्हा. गणपतीच्या चातुर्याची कथा तुम्हाला ठाऊकच आहे, त्यातून तो आपल्याला चतुर व्हा असे सांगत आहे. गणपती हे मातृभक्त होते, त्याप्रमाणे आपणही मातृभक्त असले पाहिजे.मनरूपी गणपतीला प्रसन्न करून घेण्यासाठी स्थैर्य, शांतीचे मोदक दिले तरच हा गणपती प्रसन्न होतो. ‘शांतीपरते नाही सुख.’ शांतीरूपी मोदक मनाला मिळाला की हे प्रसन्न झालेले मन तुम्हाला तुम्ही मागाल ते देते. आज आपण मनाला काळजी, चिंता, द्वेष यांचा मोदक देत असतो. मनरूपी गणपतीचा अभ्यास केला पाहिजे.मनरूपी गणपतीला अनिष्ट गोष्टी दिल्या की त्याचा तुमच्यावर कोप होतो. पवित्र, मंगल विचारांचा मोदक तुम्ही त्याला दिलात तर तुमच्यावर त्याच्या कृपेचा वर्षाव होतो. हे सर्व मंगल विचार आमच्या विश्वप्रार्थनेत आहे. मनरूपी गणपतीला विश्वप्रार्थनेचा मोदक द्या.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव