शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
3
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
4
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
5
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
6
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
7
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
8
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
9
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
10
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
11
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
12
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
13
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
14
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
15
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
16
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
17
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
18
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळालं; उपपंतप्रधान तावातावाने म्हणाले...
19
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
20
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई

Ganesh Chaturthi 2022: गणेशोत्सव: गणेश चतुर्थीला गणपती बाप्पाची ‘श्रीगणेश चालीसा’ म्हणा; सुख-समृद्धी, शुभलाभ मिळवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2022 10:20 IST

Ganesh Chaturthi 2022: गणपती बाप्पाचे अथर्वशीर्ष, मंत्र, स्तोत्र यांप्रमाणे श्रीगणेश चालीसाही अनन्य महत्त्व असून, पठणाचे नियम माहिती असणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले जाते. जाणून घ्या...

गणपती बाप्पाचे केवळ नाव उच्चारताच मन अगदी चैतन्यमय होऊन जाते. चातुर्मासातील श्रावण सरत आला की, सर्वांना वेध लागतात, ते लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाचे. चातुर्मासातील सर्वांत महत्त्वाचे आणि मुख्य आकर्षण म्हणजे गणेश चतुर्थी किंवा गणेशोत्सव. महाराष्ट्रात गणेशोत्सवाला अनन्य साधारण महत्त्व आहे. बुद्धीची देवता, विघ्नहर्ता, सुखकर्ता, १४ विद्या आणि ६४ कला अधिपती असलेल्या गणेशाचे पूजन या महिन्यात केले जाते. महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी घराघरात पार्थिव गणेशाची स्थापना केली जाते. यंदा, बुधवार, ३१ ऑगस्ट २०२२ रोजी श्रीगणेश चतुर्थी आहे. (Ganesh Chaturthi 2022)

मराठी वर्षात लाडक्या गणेशाचे तीन जन्म मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. विविध स्वरुपात गणपती पूजन केले जाते. महादेव शिवशंकर, भगवान विष्णू यांच्याप्रमाणे गणपतीनेही विविध अवतार धारण केल्याच्या कथा पुराणांमध्ये आढळतात. गणेशविषयक विशेष दिवस वैशाख पौर्णिमेपासून सुरू होतात, अशी मान्यता आहे. गणपतीच्या वेगवेगळ्या अवतारांपैकी तीन जन्मदिवस अत्यंत महत्त्वाचे मानले आहेत. यापैकी एक वैशाख पौर्णिमेला पुष्टिपती विनायक जन्म, भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजचे गणेश चतुर्थी आणि माघ महिन्यातील चतुर्थी म्हणजेच गणेश जयंती. पैकी भाद्रपद चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थीपासून पुढे १० दिवस गणेशोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. (Shree Ganesh Chalisa)

गणेश चालीसा स्तोत्राचे पठण शुभपुण्यदायक 

गणेश चतुर्थीपासून गणेशोत्सवाच्या दिवसांत गणपती बाप्पाचे मंत्र, श्लोक, स्तोत्रे यांचे पठण केले जाते. गणपती अथर्वशीर्षाप्रमाणे गणेश चालीसाला तितकेच महत्त्व असल्याचे सांगितले जाते. कोणतेही शुभ व मंगल कार्य सुरू करण्यापूर्वी श्रीगणेशाची पूजा करणे हा नियम आहे, जेणेकरून सर्व कार्य निर्विघ्न पार पडतात. श्रीगणेशाची मनोभावे पूजा केल्याने घरात समृद्धी, व्यवसायात समृद्धी आणि प्रत्येक कामात यश मिळते. गणेश चालीसा स्तोत्राचे पठण शुभपुण्यदायक मानले गेले असून, यामुळे जीवनात सुख-समृद्धी मिळू शकते, असेही सांगितले जाते. मात्र, गणेश चालीसा पठणाचे काही नियम आवर्जुन पाळावे, असा सल्ला दिला जातो. 

गणेश चालीसाचे अनन्य साधारण महत्त्व

गणेश चालीसा स्तोत्राचे प्रामाणिक अंतःकरणाने पठण केल्याने व्यक्तीच्या जीवनातील दुःख दूर होते आणि त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. श्रीगणेशाची आराधना केल्याने कुटुंबातील सर्व समस्या दूर होतात. गणेश चालीसा स्तोत्राचे नियमित पठण करणाऱ्या भक्तांना आयुष्यभर कशाचीही कमतरता भासत नाही आणि कुटुंबात सदैव सुख-शांती नांदते, अशी मान्यता आहे. 

गणेश चालीसा पठणाचे नियम

- दररोज सकाळी आपापले कुळधर्म, कुळाचार याप्रमाणे गणपती बाप्पाची पूजा झाल्यानंतर गणेश चालीसा पठण केले तरी चालते. 

- बसण्याची जागा आणि वस्त्र स्वच्छ असावे

- गणेश चालिसाचे पठण करताना कोणतेही वाईट विचार मनात येऊ देऊ नये. 

- पाठ करताना नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करावे.

- भगवान गणेशाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी भगवान शिव आणि माता पार्वतीचेही ध्यान करावे. 

- पठण करताना किंवा पठण झाल्यानंतर गणपतीच्या मूर्तीवर दूर्वा अर्पण करायला विसरू नये.

- गणेश चालीसा पठण करताना शक्य असल्यास तुपाचा दिवा देवासमोर लावावा

- नित्यनेमाने गणपतीची आराधना करणाऱ्या भक्तांच्या जीवनातून दु:खाची छाया दूर होते. श्रीगणेश चालीसाचे यथायोग्य पठण केल्याने गणपती बाप्पा लवकर प्रसन्न होतो आणि व्यक्तीला अपेक्षित फळ मिळू शकते, अशीही मान्यता असल्याचे सांगितले जाते.  

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवGanesh Festival Ritualsगणेशोत्सव विधीGanpati Festivalगणेशोत्सव