शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
6
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
7
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
8
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
9
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
10
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
11
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
12
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
13
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
14
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
15
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
16
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
17
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
18
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
19
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
20
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा

Gajanan Maharaj: अन्न हे पूर्णब्रह्म: उष्ट्या पत्रावळीतले अन्न खाऊन गजानन महाराजांनी केला अन्न संस्कार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 11:22 IST

Gajanan Maharaj : आज अन्नाची नासाडी मोठ्या प्रमाणात होत आहे, गजानन महाराजांनी उष्ट्या पत्रावळीतले अन्न खाऊन त्याची किंमत करा ही शिकवण दिली, त्याबद्दल...!

>> सर्वेश फडणवीस 

वऱ्हाडातल्या खामगाव तालुक्यातील शेगाव हे एक गाव. आता शेगाव ही तालुका ठिकाण आहे. गाव लहान पण त्याचे भाग्य महान म्हणून या गावात श्रीगजानन महाराज प्रगट झाले.  आज माघ वद्य सप्तमी, अर्थात श्री गजानन महाराजांचा प्रगट दिवस. महाराज फार उच्च पदाला पोहोचलेले विदर्भातील प्रमुख संत होते. 

खरंतर गजानन महाराज म्हणजे विलक्षण कृपामुर्तीचे धनी आहे. आज त्यांच्या प्रगट दिवसाला अनेक जण घरोघरी श्री गजानन विजय ग्रंथाचे वाचन करतील. प्रसंगी महाप्रसाद होईल. झुणका, भाकर, कांदा म्हणजे महाराजांचे अत्यंत आवडते पदार्थ आहेत. आज  महाप्रसाद ग्रहण करताना अन्नाची नासाडी होणार नाही हा संकल्प घ्यायला हवा आहे. श्री गजानन महाराजांच्या जीवन चरित्रात पहिलाच विचार अन्न आणि अन्नाचं महत्व यावरून सिद्ध होतो,

श्रीगजानन विजय ग्रंथात दासगणू महाराज लिहितात ,ती समर्थाची स्वारी । बैसोनिया रस्त्यावरी ।।शोधन पत्रावळींचे करी । केवळ निजलीलेने ।।शीत पडल्या दृष्टिप्रत । ते मुखी उचलुनी घालीत ।।हे करण्या हाच हेत । 'अन्नपरब्रह्म' कळवावया ।।

महाराज पत्रावळीवरची शित उचलून मुखी घालत होते.आपल्याला या वरून अन्नाचं महत्व समजून येते. आम्ही पोथीचे पारायण करतोच पण आज त्या परायणाच्या माध्यमातून महाराजांचा एक विचार आचरण्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात यशस्वी होऊया. आज माणसं कुठेही आणि कुणाकडेही जेवायला-खायला गेली,की तिथल्या अन्नपदार्थांबद्दल बोलत असतात.पण आज या प्रगट दिवशी श्री महाराजांचे स्मरण करून पाळाव , की मी अन्नाची निंदा करणार नाही आणि हेळसांड ही करणार नाही. अनंतकोटी ब्रह्मांडनायक श्रीगजानन महाराज यांच्या प्रसंगी लहान लहान कृती आपल्याला खूप काही शिकवत आहेत. "सर्वे भवन्तु सुखिनः" "शिवभावें जीवसेवा" या व्रतांचा अंगीकार करून श्रीमहाराज आम्हा सर्वांना ते आचरणात आणण्यासाठी  सुख,शांती, समृद्धी व निरामय आरोग्य प्रदान करो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना आहे. 

आम्हा वैदर्भीय भक्तांचे हक्काचे श्रद्धा आणि विश्रांती स्थान आहे. मंगलकार्य असो, प्रसंगी कुठलीही आनंदाची बातमी असो आम्ही विदर्भातील मंडळी शेगावच्या गजानन महाराजांना कधी जाऊन सांगतो इतकी दर्शनाची आतुरता आमच्या प्रत्येकाच्या देहबोलीत महाराजांच्या प्रति कायमच जाणवते. शनिवार-रविवार आणि लागून सुट्या आल्या की सहज गाडी वळते ती थेट शेगावलाच. प्रसंगी संकल्प, अनुष्ठान त्याची सांगता हे ही सारे मनात असतेच. स्वच्छता, सुंदर रमणीय परिसर आणि शांतता ह्या साऱ्या गोष्टींसाठी शेगाव आज विश्वपटलावर स्थान मिळवण्यासाठी अग्रेसर आहेच. आज संपूर्ण महाराष्ट्र प्रसंगी देश-विदेशातील मंडळी सुद्धा महाराजांच्या दर्शनासाठी येतात आणि मनःशांतीची, अनुभवांची शिदोरी घेत माघारी परतण्याचा प्रवास करतात. संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या अवताराविषयी दासगणू महाराज गजानन विजय ग्रंथात लिहितात,

ऐन तरुण्याभीतरी । गजानन आले शेगावनगरी ।शके अठराशेभीतरी । माघ वद्य सप्तमीला ।।

आजच्या दिवशी शेगाव येथे लाखो भाविकांचा मेळा जमलेला असतो, पण श्री महाराज आपल्या अवतीभवती,आपल्या प्रत्येक कृतीतून आपल्यासोबत आहे हाच भाव निरंतर ठेवत सकारात्मक वाटचाल करूया आणि अन्नाची हेळसांड होणार नाही हाच संकल्प प्रगट करूया..

जय गजानन !!

टॅग्स :Gajanan Maharajगजानन महाराजfoodअन्नShegaonशेगाव