शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
2
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
3
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
4
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
5
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
6
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
7
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
8
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
10
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
11
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
12
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
13
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
14
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
15
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
16
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
17
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
18
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
20
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम

ऐंशी वर्षांचे आजोबा पुन्हा एक वर्षाचे झाले; कसे ? वाचा ही बोधकथा!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: January 23, 2021 20:33 IST

आयुष्याचे ध्येय कळत नाही, तोपर्यंत आपण जिवंत असतो, परंतु आयुष्याचा अर्थ कळला की आपण जगायला लागतो. जिवंत असणे आणि जगणे या दोहोत नेमका फरक काय आहे, त्याचा उलगडा या बोधकथेतून होईल. 

एकदा एक ब्रह्मज्ञानी संत महात्मा एका गावात आले होते. त्यांच्या दर्शनासाठी अनेक भाविक सज्जन जमले. संत महात्म्यांकडून त्यांनी ब्रह्मज्ञानाची प्राप्ती केली. त्या भाविक सज्जनांमध्ये एक ऐंशी वर्षांचे म्हातारे गृहस्थ होते. त्यांनी संत महात्म्यांना घरी चरण लावण्याबद्दल विनंती केली. महात्म्यांनी पुढच्या वर्षी याच दिवशी नक्की येईन असे आश्वासन दिले. म्हातारे बाबा खूपच आनंदित झाले.

पाहता पाहता वर्ष संपले. दिलेलेल्या शब्दाप्रमाणे संत महात्मा  त्या म्हाताऱ्या बाबांकडे आले. संत महात्म्यांच्या आगमनाने त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. त्यांनी स्वागताची सर्व तयारी करून ठेवली होती. म्हातारपणामुळे त्यांचे हातपाय थरथरत होेते पण त्या दिवशी त्यांच्यामध्ये कमालीचा आनंद आणि उत्साह संचारला होता. 

प्रसन्न होत महात्म्यांनी विचारले, 'बाबा तुमचे वय काय'बाबा म्हणाले, 'एक वर्ष'महात्म्यांनी विचारले, 'ते कसे काय?'बाबा म्हणाले, 'माझे सारे आयुष्य मी प्रपंचात, मोह मायेत घालवले. परंतु गेल्यावर्षी याच दिवशी आपण ब्रह्मज्ञान देऊन या मायेतून सोडवले. मला नवीन जन्म मिळाला. जोपर्यंत मी ईश्वरापासून दूर होतो, तोपर्यंत माझे आयुष्य फुकट गेले. ज्याक्षणी तुम्ही मला ईश्वराशी जोडले, त्यादिवसापासून माझा जन्म सार्थकी लागला. म्हणून माझे खरे वय एकच वर्षे आहे.'

पुन्हा इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर महात्म्यांनी विचारले, `बाबा, तुम्हाला मुले किती? तुमच्या परिवारात सदस्य किती?'बाबा म्हणाले, 'महात्माजी, मला एकच मुलगा आहे आणि परिवारातील सदस्य विचाराल, तर तुमच्या सहवासात आहेत, तेवढे सदस्य माझ्या परिवारात आहेत.''बाबा, तुम्हाला तीन मुले आहेत ना?' महात्माजी म्हणाले.'होय, त्यातली दोन मायेची आहेत. हा एकच माझा खरा पुत्र! तुमच्यासारखी महान विभूती घरी येणार असूनही दोघे पुत्र दुकानदारी सोडून आले नाहीत. त्यांना संतसेवेपेक्षा धन दौलत महत्त्वाची वाटते. पण हा माझा पुत्र सगळ्या अडचणी बाजूला ठेवून संतसेवेसाठी धावत आला. संतसेवेसाठी जो पुढे येईल, तोच माझा आहे.'

'बरं, तुमची धन दौलत संपत्ती किती आहे?' महात्म्यांनी पुढचा प्रश्न विचारला.'माझ्याजवळ धन दौलत संपत्ती करोडो रुपये आहेत असे लोक म्हणतात. पण आतापर्यंत संतसेवेत जेवढे धन मी खर्च केले, तेवढेच माझे होते. ज्या धनाचा उपयोग सेवेसाठी होत नाही, ते धन असून काय उपयोग?'

म्हाताऱ्या बाबांचे ते विचार आणि त्यांना आलेली समज पाहून संत महात्मा प्रसन्न झाले. जीवनात सद्गुरू लाभल्याशिवाय सत्य असत्याची समज येत नाही. ईश्वराची ओळख झाल्यानंतरच जीवन जगण्याचा खरा अर्थ समजू लागतो.