शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांना शंकराचार्यांनी ज्ञानर्षी म्हणून गौरवले; त्यांच्या नावे आजचा शिक्षक दिन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2023 12:34 IST

आपल्या भारतभूमीला डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यासारखे विद्वान सुपुत्र लाभले, त्यांचे आपल्या मातृभूमीप्रती असलेले योगदान जाणून घ्या. 

भारताचे  माझी  राष्ट्रपती व  तत्वचिंतक , अभ्यासक  डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा आज जन्मदिन हा दिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. त्यांचा  जन्म आंध्रप्रदेशातील तिरुत्तनी येथे झाला.मद्रास येथे महाविद्यालयीन शिक्षण झाले. कलकत्ता विद्यापीठात तत्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून काम केले कालांतराने ऑक्सफर्ड येथील मँचेस्टर कॉलेजमध्ये तुलनात्मक धर्मशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम पाहिले.तसेच राष्ट्रसंघात भारताचे प्रतिनिधी म्हणून काम पाहीले. इ.स. १९४९ ते ५२ या काळात ते राशियाचे राजदुत म्हणून काम पाहिले आहे  याच काळात  स्टॉलीन व  त्यांची भेट झाली  स्टॉलीनने  नेहमीची प्रथा मोडत अर्थात सर्व प्रोटोकॉल तोडत  श्री राधाकृष्णन यांना आपल्या भेटीस बोलवले होते  असा उल्लेख वाचाण्यास मिळतो. अ.भा तत्वज्ञान परिषद व अ.भा.शिक्षण परिषदेचे अध्यक्षीय स्थान ही त्यांनी  भुषविले. पहिल्या शिक्षण आयोगाचे अध्यक्ष असताना त्यांनी मुल्य शिक्षणावर जास्त भर देत भारतीय संस्कृतीला साजेसा विद्यार्थी निर्माण व्हावा  या दृष्टीने प्रयत्न केले तसेच  त्यांच्या ग्रंथ लेखनाची प्रेरणाही  हीच होती.

तर्कशुद्ध संभाषणचार्तुय हे डॉक्टकरांचे वैशिष्ट्य  होते. म.गांधी व त्यांच्यातील चेन्नई येथील शाकाहार व मांसाहार यावरील वाद असो व १९६५  मध्ये भारत पाक युद्धाच्या संदर्भात अमेरिकन राष्ट्राध्यक्षासोबत झालेला संवाद असो या घटना वाचनीय आहे. त्यांचा पिंड सरळ, प्रांजळ तत्वचिंतकाचा होता. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री श्री यशवंतराव चव्हाण यांच्या चरित्रातही डॉक्टरांच्या संदर्भात काही प्रेरणादायी आठवणी आहेत . भारतीय विद्याभवनाने डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना  ब्रम्हविद्याभास्कर तर करवीर पीठाच्या शंकराचार्य यांनी ज्ञानर्षी म्हणून गौरविले "एनसायक्लोपिडीया ब्रिटनिका या इंग्रजी विश्वकोशात भारतीय तत्वज्ञानावरील टिपण ही डॉक्टरांच्या साहित्यातून घेतील आहे. 

आपल्या लिखाणात  श्री शंकराचार्यांच्या  अद्वैत मताचा पुरस्कार करत  त्यावर आधुनिक काळातील विचारांचा मुलामा देण्याचा प्रयत्न केला. शांकर तत्त्वज्ञानाच्या आधारावर प्रवृत्तीपर जीवन जगता येईल असे त्यांनी आपल्या विविध ग्रंथातुन मांडण्याचा प्रयत्न केला. श्री राधाकृष्णन् यांनी अद्वैतातील  मायावादाचा जोरदार पुरस्कार केला आहे. मात्र द  रेन ऑफ रिलिजन इन कंटेंपररी फिलॉसॉफी या इ स. १९२० मध्ये  प्रकाशीत  झालेल्या  त्यांच्या या ग्रंथात  मनाचा कल रामानुजांच्या विशिष्टाद्वैत   मताकडे  म्हणजे सगुणोपासनेकडे वाकलेला  दिसतो. पुढे मात्र इ.स.  १९२३ या साली प्रसिद्ध झालेल्या इंडियन फिलॉसॉफी या द्विखंड रुपात प्रकाशीत झालेल्या  ग्रंथात शंकराचार्याचे केवलाद्वैत मत त्यांनी शिरोधार्य मानलेले आहे. पण १९२९ साली प्रसिद्ध झालेल्या ॲन आयडियालिस्ट व्ह्यू ऑफ लाइफ या ग्रंथात त्यांचे जीवनविषयक समग्र तत्त्वज्ञान साररूपाने आले आहे असे म्हणता येईल. 

त्यांनी उपनिषदे व प्रिन्सिपल उपनिषद्स , ब्रह्मसूत्रे  ब्रह्मसूत्राज  व भगवद्‌गीता (द भगवद्‌गीता – १९४८) या वेदान्ताच्या  प्रस्थानत्रयीवर भाष्यस्वरूप ग्रंथांची निर्मिती केली या व्यक्तिरीक्त  द फिलॉसॉफी ऑफ रविंद्रनाथ टागोर  ,द हिंदू व्ह्यू ऑफ लाइफ ,ईस्ट अँड वेस्ट इन रिलिजन,  ईस्टर्न रिलिजन्स अँड वेस्टर्न थॉट , द धम्मपद , द रिकव्हरी ऑफ फेथ,  ही  ग्रंथरचना केली हे एवढ पाहता श्री राधाकृष्णन यांना प्राचीन अर्थाने  ‘आचार्य’ ही उपाधी  शोभेल.  सध्याचे स. प. महाविद्यालय  पण  जुन्या काळतील न्यु पुना कॉलेज   येथे  भारतीय व पाश्चिमात्य तसेच ज्ञानेश्वरीचे संपादक श्री सोनोपंतांनी तत्त्वज्ञान मंडळाची स्थापना केली  होती (१९२१)  त्या मंडळात व्याख्यान देण्यासाठी डॉ. राधाकृष्णन् आले होते.   राजकारणात असूनही त्यांनी त्यांची ग्रंथनिष्ठा  जोपासली व सांभाळली  व आपल्या लेखणाने व वाणीने भारतीय संस्कृतीची बीजे पेरली. अशा या थोर तत्वचिंतकास ही  अक्षरांजली वाहुन लेखणीस विराम देतो. 

छायाचित्र:  तत्कालीन शृंगेरी मठाचे शंकराचार्य विद्यातीर्थ स्वामी  हे दिल्ली येथे विजय यात्रेच्या दरम्यान आले असता डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी त्यांची भेट घेतली.

टॅग्स :Teachers Dayशिक्षक दिन