शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
2
दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
3
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
4
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
5
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
6
मी सर्वांसमोर का तिला चुकीच्या पद्धतीने किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
7
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
8
राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा
9
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
10
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
11
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
12
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
13
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
14
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
15
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
16
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
17
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
18
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
19
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
20
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
Daily Top 2Weekly Top 5

स्वप्नांना सांगू नका अडचणी मोठ्या आहेत, अडचणींना सांगा स्वप्नं मोठी आहेत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2021 15:01 IST

मेहनती लोक अपयशाची कारणे न देता, अपयशाची कारणे शोधतात, त्यावर काम करतात आणि यशाचा मार्ग मोकळा करतात. अशा लोकांची राष्ट्रविकासासाठी गरज असते.

'कारणे द्या' या प्रश्नाचे शालेय वयात उत्तर दिले, की गपकन ५-६ गुणांची कमाई होत असे. तेव्हापासून, कठीण प्रश्न सोडून देत, सोप्या प्रश्नांसाठी कारणे देत राहण्याची मनुष्याला नकळत सवयच लागली. प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा आपल्या एका भाषणात म्हणाले होते, `लोखंडाला कोणीही तोडू शकत नाही, मात्र त्याला गंज लागला, तर तो निकामी होतो. म्हणून अपयश आले, तर वाईट वाटून हार पत्करण्यापेक्षा अपयशाची कारणे शोधा, त्यावर मात करा आणि भविष्याकडे यशस्वी वाटचाल करा.'

आपल्या सभोवती असे अनेक लोक असतात, ज्यांना स्वत:च्या प्रश्नांची उत्तरे माहित असतात, परंतु ती त्यांना शोधायची नसतात. ते आळस करतात आणि नशीबाला दोष देत राहतात. दुसऱ्यांचे सगळे कसे चांगले, आपले कसे वाईट, हा विचार करण्यात आयुष्यातला बराच वेळ वाया घालवतात. लोकांमुळे आपली प्रगती कशी अडली, आपले नुकसान कसे झाले, आपण अपयशी कसे झालो, याबाबत लोकांना दोष देत राहतात. अशा लोकांना दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळ दिसते, पण स्वत:च्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही! 

याउलट मेहनती लोक अपयशाची कारणे न देता, अपयशाची कारणे शोधतात, त्यावर काम करतात आणि यशाचा मार्ग मोकळा करतात. अशा लोकांची राष्ट्रविकासासाठी गरज असते. हाच धागा धरून संत तुकाराम महाराज म्हणतात, 

ढालतलवारे गुंतले हे कर, म्हणे मी झुंजा कैसा झुंजो।पोटी पडदाळे सिले टोप ओझे, हें तो झाले दुजे मरणमूळ।बैसविले मला येणे अश्वावरी, धावू पळू तरी कैसा आता।असोनि उपाय म्हणे हे अपाय, म्हणे हाय हाय काय करू।तुका म्हणे हा तो स्वये परब्रह्म, मूर्ख नेणे वर्म संतचरण।।

ज्याला कर्तव्य करायचेच नसते, तो काहीही कारणे पुढे करून कर्तव्य करायचे टाळतो. या टाळाटाळीची काही उदाहरणे महाराजांनी येथे दिली आहेत. एक रडतराव युद्धाचा प्रसंग आल्यावर काय म्हणतो पहा, त्याला लढण्यासाठी ढाल-तलवार दिली, घोड्यावर बसवले, डोक्याला टोप, अंगात चिलखत वगैरे संरक्षणात्मक पोशाख दिला, युद्धासाठी या सर्वांची मदत झाली असती, पण या शिपाई काय म्हणतो,  अहो, माझे हात ढालीने, तलवारीने गुंतून पडले आहेत. मी लढाई कशी करणार? या चिलखताची, या टोपाची केवढी अडचण झाली आहे? मला यानेच मरण येईल, मला याचेच ओझे झाले आहे. मला घोड्यावर बसविले आहे, माझ्यावर शत्रू धावून आले, तर मी पळून कसा जाऊ? म्हणजे लढायची गोष्ट दूरच! पळायचे कसे याचीच चिंता! 

हे उदाहरण देऊन तुकाराम महाराज म्हणतात, ज्या गोष्टी परमेश्वर प्राप्तीला साधन रूप आहेत, त्याच अडचणीच्या आहेत, असे मानणारे लोक या जगात पुष्कळ आहेत. तोंडाने नाम घेणे त्यांना अडचणीचे वाटते. हातांनी टाळ वाजविणे अडचणीचे वाटते. आपला देह हाच परमार्थाला सहाय्यभूत आहे, पण ते त्यांना कळत नाही. अशा लोकांना काय म्हणावे? स्वत:ला हे हीनदीन समजतात. खरोखर सर्वतोपरी हे ब्रह्मरूपच आहेत, पण त्यांना हे कळत नाही. 

प्रपंच आणि परमार्थ यांचा ताळमेळ साधा आणि आयुष्याला सुंदर वळण देऊन ते सत्कारणी लावा!

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीRatan Tataरतन टाटा