शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
5
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
6
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
7
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
8
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
9
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
10
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
11
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
12
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
13
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
14
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
15
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
16
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
17
गोंधळ घालत मनसैनिकांची मुख्याध्यापिकेला मारहाण
18
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
19
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
20
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"

दुसऱ्यांची प्रगती बघून अस्वस्थ होऊ नका, तुमच्या अपयशाचे कारण कदाचित 'हे' असू शकेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 16:03 IST

दुसऱ्यांबद्दल असूया, द्वेष, मत्सर वाटणे  स्वभाव आहे, पण त्यावर मात केली तरच आपली यशाची दारं उघडू शकतील!

स्पर्धा निकोप असेल, तर प्रगतीला वाव असतो. परंतु सहसा तसे होत नाही. स्पर्धेतून एकमेकांबद्दल मत्सर वाढतो, द्वेष उत्पन्न होतो आणि दुसऱ्याच्या प्रगतीने आपण अस्वस्थ होतो. हा मनुष्य स्वभाव असला, तरीदेखील त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. दुसऱ्यांच्या प्रगतीबद्दल वाटणारी असूया आपल्या प्रगतीच्या आड येऊन नैराश्याला खतपाणी घालते. त्यावर पर्याय सुचवताना व्याख्याते गौर गोपाल दास प्रभू एक गोष्ट सांगतात. ती वाचल्यावर तुम्हाला बालपणी ऐकलेली गोष्ट आठवेल. ती गोष्ट कोणती हे पुढे कळेलच. आधी प्रभुजींनी सांगितलेली गोष्ट पाहू. 

राहुल आणि जितेन हे दोघेही एकाच विद्यापीठातून एकाच गुणवत्तेने उत्तीर्ण झालेले दोन विद्यार्थी एकाच कंपनीत नोकरीला लागतात. दोघेही एकसारखे मेहनती असूनही वर्षभरातच राहुलला पगारवाढ आणि पदोन्नती मिळते. जितेनला या गोष्टीचा खूप त्रास होतो. तो कुढत राहतो. आणखी मेहनत घेतो. तरीदेखील त्याच्या कामाची दखल घेतली जात नाही. 

एक दिवस जितेन रागारागात राजीनामा देतो. आपल्या मेहनतीची दखल घेतली जात नसल्याचे राजीनाम्यात नमूद करतो. कंपनीचे व्यवस्थापक जितेनच्या याआधीच्या कामाची पाहणी करतात. पण तो नक्की कशात कमी पडतोय, हे पाहण्यासाठी त्याला एक संधी देतात.

जितेनला बोलावून एक काम दिले जाते. आपल्या कंपनीच्या आवारात कोणी टरबूज विक्रेता आहे का? याची पाहणी करण्यास सांगितले जाते. जितेन तपास करून येतो. व्यवस्थापक त्याला टरबुजाची किंमत विचारतो, जितेन पुन्हा जाऊन चौकशी करून येतो. थोड्यावेळाने हेच काम राहुलला दिले जाते. राहुल तपास करून येतो आणि आल्यावर टरबूजवाला कुठे बसतो, तो किती रुपयाला टरबूज देणार आहे, तो टरबूज कुठे पिकवतो, महिन्याला किती उत्पन्न कमवतो, त्याच्याकडून घाऊक भावात खरेदी करायची असल्यास आपल्याला किती नफा होऊ शकेल अशी इथंभूत माहिती आणतो. ते ऐकून जितेन वरमतो. काम सारखेच, परंतु राहुलच्या कामाची पद्धत, त्याची विचार करण्याची पद्धत आणि कामाला दिलेले पूर्णत्त्व यामुळे त्याचे काम आपल्यापेक्षा वरचढ ठरते, हे जितेन च्या लक्षात येते. तो राजीनामा मागे घेतो आणि राहुलच्या हाताखाली राहून काम अधिक चांगल्या रीतीने पूर्ण कसे करता येईल हे शिकून घेतो. 

आता तुम्हालाही बालपणीची अकबर बिरबलाची गोष्ट आठवली ना? बिरबलाच्या जागी बेगम आपल्या भावाचा वशिला लावू पाहते, पण बिरबल म्हणजे आजचा राहुल असतो. जो कामात चोख आणि उजवा असतो. आपल्यालाही अशा राहुलचा, बिरबलाचा आदर्श ठेवायचा आहे. यशाचा मार्ग असाच शोधायचा असतो. त्यामुळे दुसऱ्याच्या यशाने वाईट वाटून न घेता आपण कुठे कमी पडत आहोत, याचा अभ्यास करा आणि आपल्या यशाची वाट तयार करा. तुम्हालाही निश्चितच यश मिळेल!