शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

आपल्या नावाचा आपल्या व्यक्तिमत्त्वावर खरंच प्रभाव पडतो का? वाचा ही गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2021 17:18 IST

नावात काय ठेवले आहे, असे शेक्सपिअर म्हणतो, परंतु नावावरूनच पुढे ओळख बनते आणि नाम कमावले की नामाची दिगंत किर्ती पसरते. म्हणून पाळण्यातल्या बाळाचे नाव ठेवताना फार विचारपूर्वक ठेवायचे असते.

नाव ठेवणे हा मनुष्यस्वभावच आहे, तसा नाव ठेवणे हा एक सोहळादेखील आहे. नाव ठेवण्याचा एक प्रकार आयुष्यभर सुरूच राहतो, तर नाव ठेवण्याचा दुसरा प्रकार आयुष्यभराची ओळख मिळवून देतो. कोऽऽहम, कोऽऽहम म्हणजे मी कोण, मी कोण असे विचारणाऱ्या बाळाला नाव ठेवले, की त्याचे रडणे थांबते. सोहम अशी त्याची ओळख पटते. या नामविधीला अतिशय महत्त्व असते. बाळ जन्माला आल्यापासून त्याचे नाव काय ठेवायचे, यावर घरात मोठी चर्चा सुरू असते. कधी ते राशीवरून ठेवले जाते, तर कधी रूपावरून, कधी आवडीवरून तर कधी पूर्वजांच्या आठवणीवरून. 

नावात काय ठेवले आहे, असे शेक्सपिअर म्हणतो, परंतु नावावरूनच पुढे ओळख बनते आणि नाम कमावले की नामाची दिगंत किर्ती पसरते. म्हणून पाळण्यातल्या बाळाचे नाव ठेवताना फार विचारपूर्वक ठेवायचे असते. अलीकडचे आई बाबा मॉडर्न नावांवर भर देतात, नावांची पुस्तक धुंडाळतात, पोथ्या-पुराणांतून `युनिक' नाव शोधून काढतात, थोडक्यात बरीच खटपट करतात.

पूर्वी तसे नव्हते. मुलांची नावे सरसकट ठेवली जात असे. त्यातही देवादिकांच्या नावावर जास्त भर असे. मुलांना हाक मारताना देवाचे नाव घेतले जावे, हा त्यामागचा हेतू असे. मात्र, अनेकदा बाळंतपणात, रोगराईत मुले जन्मत:च दगावत असत. मग जे मूल जिवंत राहत असे, त्याचे नाव दगडू, धोंडू असे ठेवले जात असे. 

अशाच एका धनिकाचा एक मुलगा होता. त्याचे नाव ठेवले होते ठणठणपाळ. अशा निरर्थक नावाचे ओझे त्याने ऐन तारुण्यातही पेलले. मात्र, बायको आली आणि ती त्याला नाव बदलून घेण्यावर रोज बोल सुनावू लागली. कंटाळलेला ठणठणपाळ घर सोडून निघून गेला. 

गावाची वेस ओलांडली. एका वडाच्या पारावर जाऊन बसला. तिथे एक फकीर आले आणि त्यांनी ठणठणपाळला त्याच्या दु:खाचे कारण विचारले. त्याने आपले दु:ख प्रगट केले. फकिर हसले, म्हणाले, नावाचे काय घेऊन बसलास? माणूस नावाने नाही, तर कामाने ओळखला गेला पाहिजे. तू चांगले काम केलेस तर लोक तुला ठणठणपाळ शेठ म्हणून ओळखतील. बायकोलाही तुझ्या कर्तृत्त्वाचा हेवा वाटेल. फकिरांचे बोलणे त्याला काही रुचले नाही. तो नाव बदल करण्यावर अडून राहिला. फकिराने त्याला सांगितले, `तुला काय वाटते, ज्यांचे नाव चांगले, त्यांचे कामही चांगलेच असते का? तुझ्याच गावात जाऊन जरा शोध घे, म्हणजे वस्तुस्थिती आणि विरोधाभास कळेल.'

फकिरांचे बोलणे ऐकून ठणठणपाळ निघाला. एक मावशी गोवऱ्या वेचत होती. तिचे नाव विचारले, तर ती म्हणाली, लक्ष्मी! एक भिकारी मंदिराबाहेर कटोरा घेऊन येणा-जाणाऱ्याला अडवत होता. त्याला नाव विचारले, तर तो म्हणाला- धनपाल! काही पावले पुढे गेल्यावर एक अंत्ययात्रा जात होती. गर्दीतल्या एकाकडे चौकशी केली, गेलेल्या व्यक्तीचे नाव विचारले, तर ते होते अमरसिंह! ठणठणपाळने कपाळाला हात लावला. फकिराजवळ येऊन म्हणाला, `तुम्ही म्हणालात, ते मला पटले आहे. माझे नाव चांगले नसले, तरी मी काम चांगले कमवेन.'

अशाप्रकारे ठणठणपाळचे पुन्हा बारसे झाले नाही, पण त्याने आपल्या कर्तृत्त्वाने ओळख मिळवली. मात्र, आपल्याकडे बाळाचे चांगले नाव ठेवण्याची संधी असेल, तर ते विचारपूर्वकच ठेवले पाहिजे. निरर्थक नाव ठेवण्यापेक्षा पराक्रमी, सद्गुणी, अवतारी व्यक्तीचे नाव ठेवले, तर ते नाव ज्याला ठेवले जाते, तोही ते नाव आणि नावाला साजेसे कर्तृत्त्व अभिमानाने मिरवू शकेल.

याबाबतीत विठ्ठलपंत कुलकर्णी यांचे कौतुक केले पाहिजे. कोण विठ्ठलपंत? तेच आळंदीचे. ज्यांच्या पोटी चार दिव्य रत्न जन्माला आली. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई! या नावांचा पारमार्थिक अर्थ असा, की अध्यात्ममार्गात विषयातून निवृत्ती घेतल्याशिवाय ज्ञान मिळत नाही आणि ज्ञान मिळाल्याशिवाय अध्यात्माचा सोपान म्हणजे मार्ग सुलभ होत नाही. या तिन्ही गोष्टी साध्य झाल्या तरच मुक्तता मिळते. 

आहे की नाही, नावाची करामत मोठी?