शहरं
Join us  
Trending Stories
1
१३ चेंडूंत चोपल्या ६४ धावा! 'Virat' पराक्रम करताना चौकार-षटकारांचा पाऊस, थोडक्यात हुकले शतक
2
Air India च्या कर्मचाऱ्यांचा संप मागे; हकालपट्टी झालेल्या 25 कर्मचाऱ्यांना कामावर परत घेणार...
3
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
4
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
5
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
6
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
7
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
8
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
9
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
10
फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, 8 ठार, 3 गंभीर; शिवकाशीत भीषण दुर्घटना
11
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
12
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
13
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
14
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
15
महिला डॉक्टरचा पाठलाग अन् सातत्याने मिस कॉल; आरोपीला ठोकल्या बेड्या
16
श्रीलंकेने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी वनिंदू हसरंगाच्या नेतृत्त्वाखाली तगडा संघ उतरवला; CSK, MI ला दिला धक्का 
17
'12th Fail' फेम विक्रांत मेसीने टॅक्सी ड्रायव्हरला केली शिवीगाळ? अभिनेत्यावर गंभीर आरोप, व्हिडिओ व्हायरल
18
मोठी बातमी : एक चूक काय झाली, LSG च्या मालकांनी लोकेश राहुलच्या हकालपट्टीची तयारी सुरू केली
19
"निवडणूक प्रचार हा मूलभूत अधिकार नाही", केजरीवाल यांच्या जामीन अर्जाला ईडीचा विरोध
20
विराट कोहलीला पंजाबविरूद्धच्या सामन्यात मोठ्या विक्रमाची संधी; ठरू शकतो पहिलाच भारतीय!

तुम्हालाही जग बदलायचे आहे? मग 'हा' छोटासा बदल करा!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2021 8:00 AM

आजच्या घडीला मदतीचा हात अनेकांना हवा आहे. तो पुढे करताना आपल्याला या लहान मुलाचा आदर्श नक्कीच ठेवता येईल. 

महामारीचे हे भयंकर चित्र पाहून त्रस्त झालेला एक छोटासा मुलगा आईला म्हणाला, 'आई, हे आणखी किती काळ असेच सुरू राहणार आहे? मी जर मोठा वैज्ञानिक असतो, तर नक्कीच हे चित्र बदलून टाकले असते. सर्वांचे रक्षण केले असते. सगळ्यांना होणारा त्रास संपवून टाकला असता.'

आपल्या छोट्याशा मुलाचे संवेदनशील मन पाहून आईचे हृदय प्रेमाने भरून आले. ती म्हणाली, `बाळा, जगाप्रती आणि प्रत्येक जीवाप्रती अशीच कणव आयुष्यभर मनात असू दे. तुझ्या हातून घडलेली छोटीशी चांगली कृतीदेखील कोणाचे जग बदलू शकेल. त्यासाठी तुला वैज्ञानिक होईपर्यंत थांबण्याची गरज नाही. चांगले काम कधीही करता येते.'

आईचे शब्द मुलाच्या मनात घुमू लागले. चांगले काम करायचे म्हणजे नक्की काय करायचे, हे त्याला सुचले नाही. पण आईने निर्माण केलेला आशावाद त्याच्या आयुष्यासाठी खूप महत्त्वाचा होता.

एक दिवस नदीवर आंघोळीला जात असताना, अवकाळी पावसामुळे नदीचे पात्र भरू लागल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने नदीवर जाण्याचे टाळले. परंतु तिथून परतत असताना नदीच्या तीरावर एक वारुळ होते. त्या वारुळातून हजारो मुंग्या आतबाहेर करत होत्या. पाण्याची पातळी वाढली तर हे सुंदर वारुळ पाण्यात वाहून जाईल आणि हजारो मुंग्यांचे प्राण जातील. या विचाराने मुलाने त्या वारुळाचा परीसर मोठमोठ्या दगडांनी सुरक्षित केला. त्यामुळे नदीचे पाणी आपली सीमा ओलांडूनही त्या वारुळाला हानी पोहोचवू शकले नाही. 

नदीतील पाण्याची पातळी ओसरल्यावर मुलगा नदीवर आंघोळीला गेला. तेव्हा त्याला वारुळ सुरक्षित असल्याचे आढळले आणि त्यात असलेल्या हजारो मुंग्यांना पाहून त्याला खूपच आनंद झाला. तो लगबगीने घरी आला आणि आईला म्हणाला, `आई, तू म्हणाली होतीस ना? छोटीशी कृती कोणाचे जग बदलू शकते? माझ्या छोट्याशा कृतीने हजारो मुंग्यांचे प्राण वाचले. आजच्या महामारीच्या काळात वैज्ञानिक बनून मी हजारो लोकांचे प्राण वाचवू शकलो नाही, पण हजारो मुंग्यांना वाचवू शकलो याचा मला खूप आनंद आहे...!'

गोष्टीचे तात्पर्य हेच सांगते, की बदल छोट्या छोट्या गोष्टींमधून घडत असतात. परंतु, त्यासाठी बदल घडवण्याची संवेदनशीलता, तत्परता आणि मदतीचा भाव मनात असावा लागतो. आजच्या घडीला असा मदतीचा हात अनेकांना हवा आहे. तो पुढे करताना आपल्याला या लहान मुलाचा आदर्श नक्कीच ठेवता येईल.