शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

तुम्हालाही जग बदलायचे आहे? मग 'हा' छोटासा बदल करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2021 08:00 IST

आजच्या घडीला मदतीचा हात अनेकांना हवा आहे. तो पुढे करताना आपल्याला या लहान मुलाचा आदर्श नक्कीच ठेवता येईल. 

महामारीचे हे भयंकर चित्र पाहून त्रस्त झालेला एक छोटासा मुलगा आईला म्हणाला, 'आई, हे आणखी किती काळ असेच सुरू राहणार आहे? मी जर मोठा वैज्ञानिक असतो, तर नक्कीच हे चित्र बदलून टाकले असते. सर्वांचे रक्षण केले असते. सगळ्यांना होणारा त्रास संपवून टाकला असता.'

आपल्या छोट्याशा मुलाचे संवेदनशील मन पाहून आईचे हृदय प्रेमाने भरून आले. ती म्हणाली, `बाळा, जगाप्रती आणि प्रत्येक जीवाप्रती अशीच कणव आयुष्यभर मनात असू दे. तुझ्या हातून घडलेली छोटीशी चांगली कृतीदेखील कोणाचे जग बदलू शकेल. त्यासाठी तुला वैज्ञानिक होईपर्यंत थांबण्याची गरज नाही. चांगले काम कधीही करता येते.'

आईचे शब्द मुलाच्या मनात घुमू लागले. चांगले काम करायचे म्हणजे नक्की काय करायचे, हे त्याला सुचले नाही. पण आईने निर्माण केलेला आशावाद त्याच्या आयुष्यासाठी खूप महत्त्वाचा होता.

एक दिवस नदीवर आंघोळीला जात असताना, अवकाळी पावसामुळे नदीचे पात्र भरू लागल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने नदीवर जाण्याचे टाळले. परंतु तिथून परतत असताना नदीच्या तीरावर एक वारुळ होते. त्या वारुळातून हजारो मुंग्या आतबाहेर करत होत्या. पाण्याची पातळी वाढली तर हे सुंदर वारुळ पाण्यात वाहून जाईल आणि हजारो मुंग्यांचे प्राण जातील. या विचाराने मुलाने त्या वारुळाचा परीसर मोठमोठ्या दगडांनी सुरक्षित केला. त्यामुळे नदीचे पाणी आपली सीमा ओलांडूनही त्या वारुळाला हानी पोहोचवू शकले नाही. 

नदीतील पाण्याची पातळी ओसरल्यावर मुलगा नदीवर आंघोळीला गेला. तेव्हा त्याला वारुळ सुरक्षित असल्याचे आढळले आणि त्यात असलेल्या हजारो मुंग्यांना पाहून त्याला खूपच आनंद झाला. तो लगबगीने घरी आला आणि आईला म्हणाला, `आई, तू म्हणाली होतीस ना? छोटीशी कृती कोणाचे जग बदलू शकते? माझ्या छोट्याशा कृतीने हजारो मुंग्यांचे प्राण वाचले. आजच्या महामारीच्या काळात वैज्ञानिक बनून मी हजारो लोकांचे प्राण वाचवू शकलो नाही, पण हजारो मुंग्यांना वाचवू शकलो याचा मला खूप आनंद आहे...!'

गोष्टीचे तात्पर्य हेच सांगते, की बदल छोट्या छोट्या गोष्टींमधून घडत असतात. परंतु, त्यासाठी बदल घडवण्याची संवेदनशीलता, तत्परता आणि मदतीचा भाव मनात असावा लागतो. आजच्या घडीला असा मदतीचा हात अनेकांना हवा आहे. तो पुढे करताना आपल्याला या लहान मुलाचा आदर्श नक्कीच ठेवता येईल.