शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

तुम्हालाही श्रीमंत व्हायचे आहे का? गौर गोपाल दास कोणता सोपा उपाय सांगतात बघा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2021 18:05 IST

आपल्यालाही आपली क्षमता ओळखणे गरजेचे आहे. फक्त ती ओळखाताना आपल्या क्षमतेवर स्वतःहून मर्यादा घालून घेऊ नका.

श्रीमंत व्हावे, सर्व प्रकारच्या सुख सुविधा मिळाव्यात आणि ऐषोआरामी जीवन जगावे असे प्रत्येकाला वाटते. यासाठीच प्रत्येकाचा आयुष्यभर खटाटोप सुरू असतो. श्रीमंत कोणीही होऊ शकतो. प्रत्येकाकडे तेवढी क्षमता आहे, परंतु ती किती प्रमाणात आहे हेच आपण आजमावून पाहत नाही, त्यामुळे अयशस्वी राहतो. 

पाण्याच्या बाटलीचे उदाहरण घ्या. काचेची, प्लॅस्टिकची, तांब्याची आणखी अनेक प्रकारची, रंगाची पाण्याची बाटली आपण पाहिली असेल. सगळ्या पाण्याच्या बाटल्या थेट झाकणापर्यंत काठोकाठ भरलेल्या असतात. त्यांच्यात फरक पडतो, तो केवळ आकारामानानुसार!

समजा तुमच्याकडे पाण्याची बाटली अर्धा लिटरची असेल आणि त्यात तुम्ही एक लिटर पाणी भरू पाहत असाल, तर बाटलीच्या क्षमतेबाहेरचे पाणी वाहून जाईल. याउलट तुमच्याकडे एक लिटर ची पाण्याची बाटली आहे आणि त्यात तुम्ही तर अर्धा लिटरच पाणी भरणार असाल तर त्या बाटलीची अर्धी क्षमता तुम्ही वाया घालवत आहात. याचाच अर्थ आपल्याला बाटलीची क्षमता पाहून त्यात किती पाणी भरायचे हे ठरवले पाहिजे. 

याप्रमाणे आपल्यालाही आपली क्षमता ओळखणे गरजेचे आहे. फक्त ती ओळखाताना आपल्या क्षमतेवर स्वतःहून मर्यादा घालून घेऊ नका. तुम्हाला आधी अमर्याद प्रयत्न करावे लागतील, ते योग्य दिशेने असावे लागतील, तरच भविष्यात तुम्हाला तुमच्या मर्यादेची जाणीव आपोआप होईल. त्याआधीच स्वतःच्या कक्षा मर्यादित ठेवू नका. थकेपर्यंत मेहनत करा. मग तुम्ही लक्षाधीश व्हायचे की कोट्याधीश हे नियतीला ठरवू द्या. मात्र तुम्ही प्रयत्न सोडू नका. एक ना एक दिवस तुम्हीही नक्कीच श्रीमंत व्हाल- परिस्थितीने, अनुभवाने आणि मनाने!

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी