शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

तुम्हालाही श्रीमंत व्हायचे आहे का? गौर गोपाल दास कोणता सोपा उपाय सांगतात बघा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2021 18:05 IST

आपल्यालाही आपली क्षमता ओळखणे गरजेचे आहे. फक्त ती ओळखाताना आपल्या क्षमतेवर स्वतःहून मर्यादा घालून घेऊ नका.

श्रीमंत व्हावे, सर्व प्रकारच्या सुख सुविधा मिळाव्यात आणि ऐषोआरामी जीवन जगावे असे प्रत्येकाला वाटते. यासाठीच प्रत्येकाचा आयुष्यभर खटाटोप सुरू असतो. श्रीमंत कोणीही होऊ शकतो. प्रत्येकाकडे तेवढी क्षमता आहे, परंतु ती किती प्रमाणात आहे हेच आपण आजमावून पाहत नाही, त्यामुळे अयशस्वी राहतो. 

पाण्याच्या बाटलीचे उदाहरण घ्या. काचेची, प्लॅस्टिकची, तांब्याची आणखी अनेक प्रकारची, रंगाची पाण्याची बाटली आपण पाहिली असेल. सगळ्या पाण्याच्या बाटल्या थेट झाकणापर्यंत काठोकाठ भरलेल्या असतात. त्यांच्यात फरक पडतो, तो केवळ आकारामानानुसार!

समजा तुमच्याकडे पाण्याची बाटली अर्धा लिटरची असेल आणि त्यात तुम्ही एक लिटर पाणी भरू पाहत असाल, तर बाटलीच्या क्षमतेबाहेरचे पाणी वाहून जाईल. याउलट तुमच्याकडे एक लिटर ची पाण्याची बाटली आहे आणि त्यात तुम्ही तर अर्धा लिटरच पाणी भरणार असाल तर त्या बाटलीची अर्धी क्षमता तुम्ही वाया घालवत आहात. याचाच अर्थ आपल्याला बाटलीची क्षमता पाहून त्यात किती पाणी भरायचे हे ठरवले पाहिजे. 

याप्रमाणे आपल्यालाही आपली क्षमता ओळखणे गरजेचे आहे. फक्त ती ओळखाताना आपल्या क्षमतेवर स्वतःहून मर्यादा घालून घेऊ नका. तुम्हाला आधी अमर्याद प्रयत्न करावे लागतील, ते योग्य दिशेने असावे लागतील, तरच भविष्यात तुम्हाला तुमच्या मर्यादेची जाणीव आपोआप होईल. त्याआधीच स्वतःच्या कक्षा मर्यादित ठेवू नका. थकेपर्यंत मेहनत करा. मग तुम्ही लक्षाधीश व्हायचे की कोट्याधीश हे नियतीला ठरवू द्या. मात्र तुम्ही प्रयत्न सोडू नका. एक ना एक दिवस तुम्हीही नक्कीच श्रीमंत व्हाल- परिस्थितीने, अनुभवाने आणि मनाने!

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी