शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

तुम्हालाही श्रीमंत व्हायचे आहे का? गौर गोपाल दास कोणता सोपा उपाय सांगतात बघा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2021 18:05 IST

आपल्यालाही आपली क्षमता ओळखणे गरजेचे आहे. फक्त ती ओळखाताना आपल्या क्षमतेवर स्वतःहून मर्यादा घालून घेऊ नका.

श्रीमंत व्हावे, सर्व प्रकारच्या सुख सुविधा मिळाव्यात आणि ऐषोआरामी जीवन जगावे असे प्रत्येकाला वाटते. यासाठीच प्रत्येकाचा आयुष्यभर खटाटोप सुरू असतो. श्रीमंत कोणीही होऊ शकतो. प्रत्येकाकडे तेवढी क्षमता आहे, परंतु ती किती प्रमाणात आहे हेच आपण आजमावून पाहत नाही, त्यामुळे अयशस्वी राहतो. 

पाण्याच्या बाटलीचे उदाहरण घ्या. काचेची, प्लॅस्टिकची, तांब्याची आणखी अनेक प्रकारची, रंगाची पाण्याची बाटली आपण पाहिली असेल. सगळ्या पाण्याच्या बाटल्या थेट झाकणापर्यंत काठोकाठ भरलेल्या असतात. त्यांच्यात फरक पडतो, तो केवळ आकारामानानुसार!

समजा तुमच्याकडे पाण्याची बाटली अर्धा लिटरची असेल आणि त्यात तुम्ही एक लिटर पाणी भरू पाहत असाल, तर बाटलीच्या क्षमतेबाहेरचे पाणी वाहून जाईल. याउलट तुमच्याकडे एक लिटर ची पाण्याची बाटली आहे आणि त्यात तुम्ही तर अर्धा लिटरच पाणी भरणार असाल तर त्या बाटलीची अर्धी क्षमता तुम्ही वाया घालवत आहात. याचाच अर्थ आपल्याला बाटलीची क्षमता पाहून त्यात किती पाणी भरायचे हे ठरवले पाहिजे. 

याप्रमाणे आपल्यालाही आपली क्षमता ओळखणे गरजेचे आहे. फक्त ती ओळखाताना आपल्या क्षमतेवर स्वतःहून मर्यादा घालून घेऊ नका. तुम्हाला आधी अमर्याद प्रयत्न करावे लागतील, ते योग्य दिशेने असावे लागतील, तरच भविष्यात तुम्हाला तुमच्या मर्यादेची जाणीव आपोआप होईल. त्याआधीच स्वतःच्या कक्षा मर्यादित ठेवू नका. थकेपर्यंत मेहनत करा. मग तुम्ही लक्षाधीश व्हायचे की कोट्याधीश हे नियतीला ठरवू द्या. मात्र तुम्ही प्रयत्न सोडू नका. एक ना एक दिवस तुम्हीही नक्कीच श्रीमंत व्हाल- परिस्थितीने, अनुभवाने आणि मनाने!

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी