शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

"ज्यावर तुमची निष्ठा आहे तेच करा"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2020 09:47 IST

तुम्हाला ज्या गोष्टीबद्दल आस्था आहे ते तुम्ही केलं नाही तर तुम्ही चांगले जगलात की नाही पाहायला आयुष्याच्या शेवटपर्यंत थांबण्याची गरज नाही - ते आधीच वाया गेलेले जीवन आहे.

प्रश्न : आपल्या ध्येयकार्याचा आणि दूरदृष्टीचा एक भाग होण्याची माझी इच्छा आहे, आणि तुम्ही म्हणता तसं एक 'साक्षात्कारी जीवन' जगावे. आणि मग सगळीकडे सुख-समाधान असावे असे मला वाटते. पण कुठेतरी, माझ्या आत मला एक प्रकारची भीती वाटते, की हा मार्ग मी शेवटपर्यंत चालू शकेल की नाही. हेच मला पुढं जाण्यापासून रोखतंय. तर या भीतीवर मी मात कशी करू?सद्गुरू : मी तुम्हाला खात्री देऊ शकतो की जेव्हा सगळं जग आनंदी करण्याचे आपले ध्येय आहे तेव्हा आपण कोणीच शेवटपर्यंत टिकणार नाही आहोत. त्यामुळे अंतिम ध्येयापर्यंत पोहोचण्याची चिंता करू नका. तुम्हाला असं वाटतं का की उद्या सारे जग एकदम आनंदी होईल? वयाच्या 25 व्या वर्षी, जेव्हा मी पहिल्यांदा परमानंदात भिजून गेलो होतो तेव्हा मला खरोखर वाटलं की मी संपूर्ण जगाला आनंदी बनवू शकतो आणि प्रत्येकजण स्वत:च्या कल्याणासाठी काहीतरी करायला तयार असेल. हे तीन दशकांपूर्वीचे होते. आता आज मला माहीत आहे की असे बरेच जण आहेत जे स्वत:चाच विध्वंस करवून घेणारे आहेत. आम्ही लाखो लोकांना स्पर्श केला आहे, पण तरीही हे संपूर्ण जग नाही.

'ज्यावर तुमची नितांत निष्ठा आहे तेच करा'आणि तुम्ही कधीच मला ज्याची काळजी आहे ते करू नका. तुम्ही तुम्हाला ज्या गोष्टी बद्दल खरंच आस्था वाटते, ते केलं पाहिचे. तुम्हाला ज्या गोष्टीबद्दल आस्था आहे ते तुम्ही केलं नाही तर तुम्ही चांगले जगलात की नाही पाहायला आयुष्याच्या शेवटपर्यंत थांबण्याची गरज नाही - ते आधीच वाया गेलेले जीवन आहे. तुम्हाला हे काम महत्वाचे वाटत असेल तर तुम्ही ते केले पाहिजे.

वास्तविक, मी ज्या प्रकारे बनलेलो आहे, जर मी माझे डोळे बंद केले तर कदाचित मी कधीच उघडणार नाही. माझे कार्य केवळ जगाच्या गरजेनुसार आहे. अन्यथा, मी एकटा असतो तेव्हा मी सर्वोत्तम स्थितीत असतो. मग मला लोकांसमवेत राहण्याची का का गरज वाटेल ? मला काहीतरी करायची का इच्छा होईल ? पण जगात बरेच काही करण्याची गरज आहे, म्हणून मी दिवसातले वीस तास काम करत आहोत. जेव्हा मी सकाळी उठतो, एखादी व्यक्ती तिथे वाटच पाहत असते ज्याच्याकडे मला लक्ष द्यावे लागणार असते.

ही सर्व कृती मला गरज आहे म्हणून नाहीये. जर तूम्ही मला एकट्याला सोडले तर कोणत्याही कृतीशिवाय मी एकदम ठीक आहे. मला एकही शब्द म्हणायचा किंवा लिहायचा नाही. मला काहीही करण्याची गरज नाही. पण आणखी बरेच काही करणे बाकी आहे, म्हणून ही सगळी कृती आवश्यक आहे. तुमची कृती ही कधीही स्वतःबद्दल असू नये. तुम्ही स्वतःच्या आत कसे आहात हे तुमच्या बद्दल आहे. पण तुमची कृती असावी हे असलेल्या सद्यपरिस्थितीशी निगडीत असावे. दुर्दैवाने, बहुतेक लोकांची कार्ये स्वतःबद्दलच असतात. ते जगात कार्य करतात कारण त्यांना स्वतःहून काहीतरी बनवायचे आहे, जो चुकीचा दृष्टीकोन आहे. बहुतेक मानसिक आजार या मूलभूत त्रुटीमुळे उद्भवतात, की लोक कुणीतरी होण्यासाठी काहीतरी करत आहेत. प्रथम तुमच्या आतलं अस्तित्व निश्चित करा – मग कृती करा. तुम्ही असं केलं, तर मग त्यातून जे घडून यायचं ते घडून येईल.तुम्हाला जर या कार्याचे मूल्य दिसत असेल, हे घडून आलेच पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ते करणे आवश्यक आहे. कसे आणि कोणत्या स्तरावर, ते तुमच्यावर अवलंबून आहे. प्रत्येकजण बदल घडवून आणण्यासाठी स्वतःच्या मनाच्या गोष्टी करत असेल तर ते केवळ त्यांच्या समाधानासाठीच असेल. आपल्याला खरोखर बदल घडवून आणायचा असेल तर आपल्याला एकत्र येऊन हे करावं लागेल. हे कार्य स्वत:ला समाधानी करण्याबद्दल नाही. आपण समाधानी झालो, म्हणून आपण कार्य करतो. तुम्हाला काहीतरी करण्याची गरज आहे म्हणून नव्हे. जर ते करणे आवश्यक असेल तर प्रत्येक जवाबदार व्यक्तीने उभे राहिले पाहिजे. आपण घेत असलेले हे काही एक प्रकारचे अभियान नाही. ही तुमच्या मानवतेची अभिव्यक्ती आहे. आणि या प्रकारच्या कृतीचे विशेष म्हणजे ती तुम्हाला माणूस म्हणून अगदी सुंदररित्या घडवते.