शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
2
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
3
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्त्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
4
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
7
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
8
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
9
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
10
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
11
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
12
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
13
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
14
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
15
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
16
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
17
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
18
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
19
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
20
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली

Diwali 2021 : १०० वर्षांपूर्वीची दिवाळी कशी होती याचे यथार्थ वर्णन वाचा दिवाळी मासिकातल्या एका कवितेतून!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2021 08:10 IST

Diwali 2021 : निराशा दूर करून मनात आनंद निर्माण करण्याची दिवाळी सणाची प्रवृत्ती, आपल्याला मराठी साहित्यातूनही प्रतिबिंबित झालेली दिसते.

आजची दिवाळी आणि पूर्वीची दिवाळी ही तुलना दरवर्षी रंगते. काळ बदललेला असला तरी दिवाळीचा आनंद तसूभरही कमी झालेला नाही. हा सण साजरा करण्याची पद्धत प्रत्येकाची निराळी असली, तरी त्यात दडलेला आनंद कमी जास्त प्रमाणात सारखाच आहे. योगायोगाने त्याचवेळेस ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांचा एक लेख वाचनात आला. त्यात त्यांनी शंभर वर्षांपूर्वीच्या दिवाळीचे वर्णन असलेली कविता दिली आहे. 

दिवाळीमध्ये जशी आजची अमावस्येची रात्र आपण लाखो-कोटी दिवे लावून उजळून टाकण्याचा प्रयत्न करतो, तसेच मनातील निराशेचा अंधार आनंदाचे, आशेचे दीप लावून दूर करण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करीत असतो. हा प्रयत्न, निराशा दूर करून मनात आनंद निर्माण करण्याची ही प्रवृत्ती, आपल्याला मराठी साहित्यातूनही प्रतिबिंबित झालेली दिसते.

Diwali 2021 : दिवाळीचे रंगकाम काढताय? थांबा! वास्तूशास्त्रात दिलेल्या टिप्स एकदा वाचून घ्या!

१८९८ च्या 'मनोरंजन' मासिकाच्या नोव्हेंबर महिन्याच्या अंकात दत्तात्रय कोंडो घाटे म्हणजेच कवी दत्त यांची 'दिवाळी' नावाची एक कविता प्रसिद्ध झाली होती. त्यात दत्त कवी म्हणतात,

पौरजनही निजगृहा रंगवीती, द्वारकेशी सुमहार घालिताती,नवी वस्त्रे भूषणे लेवुनी ही, घरे सजली जणु पुरुष भव्य देही।

पौरजन म्हणजे शहरातले नागरिक, ते आपापली घरे दिवाळीच्या निमित्ताने रंगवतात, दारावर तोरणे लावतात आणि ती घरे इतकी सुंदर दिसतात, की नवी वस्त्रे घालून कोणी रुबाबदार पुरुषच त्या ठिकाणी उभा आहे, असे वाटते. पुरुष म्हणजे देहपुरामधील ईश, हे घराकडे बघून वाटते.

कवी दत्ता यांनी शंभर वर्षापूर्वीचे वर्णन करून ठेवले आहे. एक शतकाचा काळ उलटून गेला, तरी दिवाळीचे स्वरूप आणि आपल्या मनातील दिवाळीबद्दल असलेली अपेक्षा यात फारसा फरक पडलेला नाही. फराळाचे पदार्थ बदलले असतील, फटाक्याची प्रकारही खूप बदललेले आढळतील, कपड्यांमध्ये तर बदल झालेच, परंतु दिवाळीचा उत्साह तीळमात्रही कमी झालेला नाही. पूर्वी वर्षातून एकदाच दिवाळीनिमित्त नवीन कपडे घेतले जात असत. तेही कोणते, तर नऊवारी लुगडे, धोतर. त्यांची जागा आता जीन्स, कुर्ते, ट्राउझर्सने घेतली, हाच काय तो बदल. मात्र, दिवाळीचे मूळ स्वरूप अजुनही टिकून आहे. 

सकाळी उठून लवकर स्नान केले जाते. स्नानापूर्वी तेल, सुगंधी उटणे लावले जाते. पती पत्नीला, बहिण भावाला ओवाळते. हे सगळे जुन्या परंपरेला धरून चालते. पूर्वी दिवाळीचा फराळ घरोघरी केला जात असे. आता बाजारातून विकत आणण्याकडे कल दिसून येतो. आरोग्याच्या तक्रारी वाढत असल्यामुळे फराळ करण्याचे, विकत घेण्याचे प्रमाण कमी झाले असले, तरी शास्त्रापुरता फराळ केला किंवा आणला जातोच.

Diwali 2021 : दिवाळीची आवराआवर सुरू झाली? मग 'हा' महत्त्वाचा कोपरा स्वच्छ करायला अजिबात विसरू नका!

सर्वधर्मसमभावाच्या दृष्टीने दिवाळी या सणाला सर्वधर्मियांनी मान्यता दिली आहे. अन्य कोणत्याही सणांत जेवढा एकोपा दिसून येत नाही, तेवढा दिवाळीत दिसून येतो. कवी दत्ता कवितेचा शेवट करताना लिहितात, 

जधी जाइल दारिद्रय बांधवाचे, जधी जातिल हे दूत यमाजीचे,जधी होइल जन्मणू पुण्यशाली, तदा माझी गे समज ती दिवाळी

असा आशावाद कवींच्या कवितेतून दिसून येतो. शंभर वर्षांपूर्वी समस्याप्रधान स्थिती होती, तशीच आजही आहे. समस्येचे रूप बदलले, परंतु प्रश्न तेच आहेत. ते सर्व प्रश्न निकाली निघो आणि सुबत्तेचा, आनंदाचा, हर तऱ्हेच्या सुखाचा वर्षाव सर्वांवर होवो, अशी प्रार्थना करूया. 

टॅग्स :Diwaliदिवाळी 2021