शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-दिल्ली विमानाचे तिकीट झाले ५०-६० हजारांना; इंडिगोची विमाने रद्द, दुसऱ्या कंपन्यांनी लुटायला सुरुवात केली...
2
इंडिगोला मोठा दिलासा! डीजीसीएने क्रू विश्रांतीचा नियम मागे घेतला, तरीही उड्डाणे सुरळीत होण्यासाठी काही दिवस लागणार
3
नगरपालिकांची मतमोजणी २१ डिसेंबरलाच; सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवला, पण...
4
लहान मुले-वृद्धांनी बेंचवर झोपून रात्र काढली; इंडिगो संकटामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल;..!
5
जो रुट सुसाट! सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड धोक्यात! पण इंग्लंड बॅटरला खरंच ते शक्य होईल का?
6
१ लाखापर्यंतच्या रकमेसाठी समान व्याजदर, RBIकडून सर्व बँकांसाठी नवे नियम; होणार फायदा
7
एअरटेलने स्वस्तातले ३० दिवसांचे दोन प्लॅन बंद केले; आता जास्त पैसे मोजल्याशिवाय पर्याय नाही
8
ना गोवा ना काश्मीर, २०२५ मध्ये लोकांनी 'गुगल'वर 'या' छोट्या शहराला सर्वाधिक केले सर्च
9
प्रवाशांचे हाल! मुंबई-पुण्यासह देशभरातील ६००हून अधिक इंडिगो विमानांचे उड्डाण रद्द!
10
Gold Silver Price Today: सोन्याच्या दरात जोरदार तेजी, चांदीचा दर २ लाखांच्या जवळ; एकाच झटक्यात २४०० रुपयांची तेजी
11
जिद्दीला सलाम ! डोळ्याला इन्फेक्शन... तरीही गॉगल लावून मैदानात उतरला अन् पठ्ठाने शतकच ठोकलं
12
सनी देओल रुपेरी पडद्यावर धमाका करण्यासाठी सज्ज, या दिवशी रिलीज होणार 'बॉर्डर २'चा टीझर
13
आसिम मुनीर यांची ताकद वाढली; पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे 'हे' ५ मोठे अधिकार संपुष्टात!
14
पुतिन-मोदींची 'सरप्राइज राइड', सफेद रंगाच्या Fortuner ची सगळीकडे चर्चा, महाराष्ट्राशी कनेक्शन
15
Matthew Hayden: 'कपडे काढून धावेन' म्हणणारा मॅथ्यू हेडन जो रूटच्या शतकानंतर काय म्हणाला?
16
"आईशप्पथ हे पुन्हा करणार नाही"; तरुणाचा मास्टर प्लॅन बघून स्कॅमरने टेकले हात, लोकेशन कळताच आरोपी घाबरला
17
एआय: महासत्ता की महासंकट?, गरीब-श्रीमंतांमधील...; 'संयुक्त राष्ट्र संघा'ने या तंत्रज्ञानाबद्दल दिला गंभीर इशारा
18
टाटा समूहावर शोककळा! 'लॅक्मे' आणि 'वेस्टसाइड'च्या संस्थापिका सिमोन टाटा यांचे ९५व्या वर्षी निधन
19
इन्स्टावरच्या गर्लफ्रेंडशी लग्न करायला पोहोचला तरुण; वरातही वाजत निघाली अन् अचानक मुलगी फोनच उचलेना..
20
BB 19: "असं संपायला नको होतं...", मालती चहर घराबाहेर गेल्यानंतर प्रणित मोरेची अशी अवस्था
Daily Top 2Weekly Top 5

भक्ती म्हणजे नुसतेच बाह्यदर्शन नाही तर अंतरंगात बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 11:49 IST

अभेद वृत्तीने जर जीवन व्यवहार केला तर देवाचे सगुण दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. भक्ती म्हणजे नुसतेच बाह्यदर्शन नाही तर अंतरंगात बदल अपेक्षित आहे..!

- युवा कीर्तनकार, ह.भ.प. ऋतुपर्ण भरतबुवा रामदासी( बीड, महाराष्ट्र, ८७ ९३ ०३ ०३ ०३ )

महाराष्ट्रातील संतांनी भक्तिमार्गाचा प्रचार आणि प्रसार करतांना देवळातील देव विश्वात्मक बनविला. विश्वात्मक देवाचे वर्णन वेदांमध्ये आहेच पण वेद हे संस्कृत भाषेमध्ये आहेत शिवाय वेदभाषा ही बहुजन समाजाला कळणारी नाही, त्याकाळात वेदमंत्रांचा अधिकारदेखील सर्वांना नव्हता, त्यामुळे वेद तत्वज्ञानापासून बहुजन समाज वंचित राहिला.

संतांनी विचार केला की, मनुष्य देहाच्या उद्धाराचे हे तत्त्वज्ञान समाजाला कळलेच पाहिजे. वेदांच्या कृपणतेबद्दल संतानी खंत व्यक्त केली. ज्ञानराज माऊली म्हणतात -

वेदसंपन्न होय ठाई । परि कृपणू आण नाही ।जो कानी लागला तिही । वर्णाचिया ॥

वेदांतील उद्धाराचा हा मार्ग, हा मानवता धर्म, सर्वांना कळावा, मोक्षद्वार सर्वांसाठी खुले व्हावे, म्हणून संतांनी वेद मराठी मायबोलीत आणले.

वेदांचे काठिण्य लक्षांत घेऊन भगवंताने गीता सांगितली पण अशिक्षित समाजाला गीतादेखील कळाली नाही परत भगवंतांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपाने अवतार घेऊन ज्ञानेश्वरीसारखा सुबोध ग्रंथ रचला.

वेदप्रणित मानवता धर्म, तत्वज्ञान बहुजन समाजाच्यासाठी खुले केले. माऊली म्हणतात -

तैसा वाग्विलासे विस्तारू । गीतार्थेसी विश्व भरुं।आनंदाचे आवारु । मांडू जगा ॥

संतांनी कर्मकांडात आणि व्रतवैकल्यांत अडकलेली भक्ती सर्वजनसुलभ केली. देवप्राप्तीसाठी फार सायास करण्याची गरज नाही. पश्चात्तापपूर्वक भगवंताला शरण गेले की, तो सहज प्राप्त होतो. यासाठी संतांनी नामसाधना सांगितली.माऊली हरिपाठात वर्णन करतात -

देवाचिये द्वारी उभा क्षणभरी ।तेणे मुक्ती चारी साधियेल्या ।हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।पुण्याची गणना कोण करी ॥

संतांच्या या सोप्या, सुलभ तत्वज्ञानामुळे या देशातील अठरापगड जाती हरिनामाच्या ध्वजाखाली एकत्रित आल्या व त्यांनी पंढरीच्या वाळवंटात एकात्मतेचा गोपाळकाला केला. 

पंढरीचा पांडुरंग हा भेदभावातीत आहे, कृपाळू आहे, कनवाळू आहे, पतितपावन आहे त्याला सर्वभावे शरण जा. मन, बुद्धी, चित्त आणि संसारातील सर्व कर्म त्याला अर्पण करा.

जे जे कर्म कराल ते ते निष्काम व निर्लेप करा. कधी कुणाचा द्वेष, मत्सर, वैरभाव करू नका. देव हा देवळापुरता मर्यादित नाही, तो सर्वांतरयामी आहे, सर्वत्र आहे.

जे जे भेटे भूत । ते ते मानिजे भगवंत ।हा भक्तीयोग निश्चित । जाण माझा ॥

संतांनी ही भक्ती जनमनांत रुजवली. अशा अभेद वृत्तीने जर जीवन व्यवहार केला तर देवाचे सगुण दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. भक्ती म्हणजे नुसतेच बाह्यदर्शन नाही तर अंतरंगात बदल अपेक्षित आहे..!

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक