शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

२९ फेब्रुवारीला मिळालेला एक दिवस बोनस आहे समजा आणि त्याचा 'असा' उपयोग करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2024 07:12 IST

प्रत्येक दिवस एक संधी घेऊन येतो आणि प्रत्येक सायंकाळ एक अनुभव देऊन जाते! - गौर गोपाल दास 

यंदा फेब्रुवारीत २९ दिवस आहेत. अर्थात हे लीप इयर आहे. ग्रेगरियन दिनदर्शिकेनुसार ज्या वर्षातील फेब्रुवारी महिन्यात २८ च्या ऐवजी २९ दिवस असतात अशा वर्षाला लीप वर्ष असे म्हणतात. ज्यामुळे हे वर्ष ३६४ दिवसांचे नसून ३६५ दिवसांचे होणार आहे. मग या एक दिवस अधिक मिळालेल्या संधीचा वापर आपल्याला कसा करता येईल, हे गौर गोपाल दास यांच्याकडून जाणून घेऊ. 

आज सकाळी उठल्यावर, जर हा लेख तुमच्या नजरेस पडला असेल आणि तो उघडून तुम्ही वाचला असेल, तर तुम्ही खरोखरच भाग्यवान आहात. त्याचे मुख्य कारण म्हणजे, तुम्ही काल रात्री डोळे बंद केलेत, ते आज सकाळी पुन्हा उघडण्याची तुम्हाला संधी मिळाली. अनेकांनी काल रात्रीच ती संधी गमावली आहे, हे लक्षात घ्या. मात्र, तुम्हाला ती संधी मिळाली आहे. संधी कोणती? तर दिवसाची, आयुष्याची नवी सुरुवात करण्याची, नवीन दिशा निवडण्याची. यासाठी रोज सकाळी पाच गोष्टी नक्की करा.

सकाळी उठल्यावर चुकूनही मोबाईल, लॅपटॉप, नोटबुक अशा गॅझेटना हात लावू नका. दिवसाची प्रसन्न सुरुवात सकारात्मकतेने करा. गॅझेट चार्जिंगला लावण्याआधी स्वत:ला सकारात्मक ऊर्जा देऊन दिवसभरासाठी चार्ज करा. ती ऊर्जा तुम्हाला दिवसभर सकारात्मकतेचे बळ देणार आहे. तुमच्याकडे काय नाही, ते आठवण्याऐवजी काय आहे, ते आठवून पहा. आपल्याजवळ असलेल्या गोष्टींची श्रीमंती नसलेल्या गोष्टींची उणीव भरून काढण्यास मदत करेल. 

दिवसभरात काय करायचे आहे, हे ठरवण्याआधी स्वत: दिवसभरातील आव्हाने स्वीकारण्यासाठी सज्ज करा. कोणतीही गोष्ट अशक्य नाही. प्रयत्न केल्याने मलाही सर्व काही जमू शकते, हा आत्मविश्वास स्वत:ला द्या. जेणेकरून जगाने तुम्हाला कमी लेखले, तरी तुम्ही स्वत:ची साथ कधीच सोडणार नाही आणि तुमचा आत्मविश्वास कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला खचू देणार नाही. 

कोणत्याही कामात आपल्या वतीने १०० टक्के प्रयत्न करण्याची तयारी ठेवा. याउपर ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणात नाहीत, त्यांचा विचार सोडून द्या. मात्र, प्रयत्न न करता अपयश स्वीकारू नका. प्रयत्नांती अपयश आले, तरी ते आपल्या भल्या मोठ्या आयुष्याचा छोटासा भाग आहे, असे म्हणून ते अपयश पचवण्याची तयारी ठेवा. 

एकाच वेळी चार गोष्टी करण्यापेक्षा एकावेळी एकच गोष्ट करा. जर छोट्या छोट्या गोष्टी नीट करू शकला नाहीत, तर मोठ्या गोष्टी नीट कधीच करू शकणार नाही. यासाठीच प्रत्येक गोष्ट लक्षपूर्वक करा. त्याच छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला आनंद आणि जगण्याचे बळ देतील. 

पाचवी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तुम्हाला तुमच्या पडत्या काळात जशी कोणाची शाब्दिक, मानसिक, आर्थिक गरज असते, तशीच इतरांनाही असते. दुसऱ्याची अडचण समजून घेण्याचा प्रयत्न करा. यथाशक्ती मदत करा. मनात वैरभाव किंवा स्वार्थ न ठेवता केलेली मदत दुसऱ्यांपेक्षा तुम्हालाच अधिक आनंद देणारी ठरेल.

प्रत्येक दिवस एक संधी घेऊन येतो,प्रत्येक सायंकाळ एक अनुभव देऊन जाते!

या दोन्ही गोष्टींचा आयुष्यात पुरेपूर उपयोग करून घ्या आणि रोज नवीन संधी दिल्याबद्दल देवाचे मनापासून आभार माना. 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी