शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

चिरतारुण्य आणि सुदृढ आरोग्य देणारा च्यवनप्राश 'च्यवन' ऋषींच्या नावावरून ओळखला जाऊ लागला; वाचा ही गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2021 13:53 IST

हिवाळ्यात च्यवनप्राशचे सेवन आपण करतो, त्याबरोबर जाणून घ्या त्याच्या उगमाची कथा!

फार पूर्वी शर्याति नावाचा राजा होता. त्याला अनेक अपत्ये होती. तो प्रजाहितदक्ष राजा होताच, शिवाय तो कुटुंबवत्सलदेखील होता. आपला राज्यकारभार सांभाळून तो आपल्या कुटुंबाला वेळ देत असे. एकदा सहपरिवार राना वनाचा फेरफटका करत असताना राजा राणी बोलत बसले. त्यांची मुले वयाने मोठी होती, शूर होती. ती इतरत्र फिरत होती. 

असाच फेरफटका मारत असताना राजकुमारी सुकन्या हिच्या हातून एका मातीच्या ढीगाला दगड लागला आणि त्यातून रक्त वाहू लागले. ती घाबरली. तो मातीचा ढीग नसून त्यात कोणाचा तरी मानवी देह आहे, याची तिला कल्पना आली. तिने तत्काळ ओरडून आपल्या आई वडिलांना आणि भावंडांना तिथे बोलावून घेतले. रक्त थांबत नव्हते. 

राजाने पुढाकार घेऊन मातीचा थर दूर केला. तर त्या ढीगाखाली च्यवन नावाचे थोर तपस्वी तपश्चर्या करत बसले होते. राजकुमारी सुकन्याच्या हातून चुकून लागलेल्या दगडामुळे त्यांचा डोळा जखमी झाला आणि त्यातून रक्त वाहू लागले. 

राजाने तत्काळ आपल्या राज्यातून राजवैद्यांना बोलावून घेतले. ऋषींची मलमपट्टी केली. परंतु, राजवैद्यांच्या सांगण्यानुसार च्यवन ऋषींनी आपली दृष्टी गमावली होती.

हे वृत्त कळल्यावर राजकुमारी सुकन्येला अपराधी वाटू लागले. ऋषींनी क्षमा केली, तरी तिला तिच्या चुकीचे प्रायश्चित्त करून घ्यायचे होते. ती आपल्या वडिलांना म्हणाली, `पिताश्री, माझ्यामुळे ऋषींची दृष्टी गेली, आता मीच त्यांचे नेत्र होईन. अर्थात मी त्यांच्याशी विवाह करून त्यांचा सांभाळ करीन.'

दोघांच्या वयातील तफावत पाहता राजाने तिला अडवले, परंतु तिने आपलेच म्हणणे पुढे रेटले. राजाने च्यवन ऋषींशी राजकन्येचा विवाह लावून दिला. च्यवन ऋषींची तपश्चर्या पाहून देवतांनी त्यांना वरदान दिले आणि आयुर्वेदीक औषधे दिली, ज्यामुळे च्यवन ऋषींना तारुण्य प्राप्त झाले आणि सर्व देवतांच्या आशीर्वादाने ऋषींनी पुढे राजकन्येसोबत सुखाने संसार केला.