शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

Chaturmas 2024: एकेकाळी रत्नमंडित असलेले त्रिविक्रम मंदिर आज खंडित स्थितीत, तरी भक्कम ऐतिहासिक पुरावा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2024 11:10 IST

Chaturmas 2024: नुकताच चातुर्मास सुरु झाला आहे, त्यानिमित्त जाणून घेऊया रामटेक येथील प्राचीन आणि ऐतिहासिक त्रिविक्रम मंदिराबद्दल!

>> सर्वेश फडणवीस 

रामटेक येथे भगवान श्री विष्णूच्या दशावताराचे मंदिर आहे. तेथे श्रीराम, नृसिंह, वराह तसेच विष्णूंचा एक अवतार वामन अवतार आहे. वामन अवतारात श्रीविष्णूंनी बटु वामनाचे रूप घेतले व उन्मत्त बळीराजास याचक म्हणून यज्ञाच्या वेळी तीन पावलं भूमी मागितली. राजा उदार व दानी होता. तो वामनास म्हणाला, "अरे बटु, तुझी पावलं ती किती छोटी? दिली तीन पावलं जमीन! चल घे." बटुने एका पावलात संपूर्ण पृथ्वी, दुसऱ्या पावलात अंतराळ व्यापले आणि विचारले, तिसरे पाऊल कुठे ठेवू? राजा म्हणाला, 'माझ्या मस्तकावर ठेवा बटुराज!' बळीच्या मस्तकावर तिसरे पाऊल ठेवून बळी व त्याच्या अर्धांगिनीस पाताळात ढकलले. त्याच्या मस्तकावर आपले पाऊल ठेवले. ते मंदिर बटुरूप धारण करणाऱ्या वामनाचे अर्थात श्रीविष्णूंचे त्रिविक्रम रूपाचे मंदिर आहे. 

कथा आपण सर्वच जाणतो. यातील प्रतिमा ही वामनाची - त्रिविक्रमांची अर्थात श्रीविष्णूंची आहे. वाकटक कालीन त्रिविक्रम मंदिर बहुतांशी नष्ट झाले असले तरी त्रिविक्रमाची मूर्ती सौष्ठवयुक्त असून लक्ष वेधून घेणारी आहे. याच्या जवळ गेल्यावर मनात वेगळीच भावना होती. आता मूर्ती खंडित झाली असली तरी तिचं अस्तित्व आणि पाऊलखुणा आजही बघायला मिळतात. हे बघतांना मनात विचार आला की त्याकाळी या मूर्तीवर कितीतरी वेळा राजोपचार पूजा संपन्न झाल्या असतील त्यावेळचे वातावरण कित्ती वेगळं असेल.

इ.स.चे २०० -२५० शतक ते इ. स. चे ६ वे शतक या काळात या घराण्याने या भागात राज्य केले. विन्ध्यशक्ती हा या घराण्याचा संस्थापक होता. या घराण्यातील प्रवरसेन पहिला याच्या काळात त्याने अनेक वैदिक यज्ञही केले. प्रवरसेन पहिला याच्या काळात राज्याचा विस्तारही मोठ्या प्रमाणात झाला. त्याच्या वंशजांनी नंदिवर्धन अर्थात आताचे नगरधन या स्थानावरून राज्य केले तर सर्वसेन या मुलाने वत्सगुल्म अर्थात वाशीम येथून दुसरी शाखा चालवली. नंदिवर्धन अर्थात नगरधन या ठिकाणाहून राज्य करणाऱ्या राजांमध्ये रुद्रसेन दुसरा याची पत्नी ही गुप्त सम्राट चंद्रगुप्त दुसरा याची कन्या राणी प्रभावतीगुप्ता ही होती. या वाकाटक घराण्याचे कर्तृत्त्व पाहून त्यांना समकालीन बलाढ्य गुप्त सम्राट चंद्रगुप्त दुसरा विक्रमादित्य याने आपल्या मुलीचा म्हणजे प्रभावतीगुप्ता हिचा विवाह रूद्रसेन दुसरा या नंदिवर्धन अर्थात नगरधन येथून राज्य करणाऱ्या राजाशी करून दिला. 

दुर्दैवाने रूद्रसेनाचा अकाली मृत्यू झाला. त्यामुळे राज्याची आणि राजकुमारांची जबाबदारी राणी प्रभावतीगुप्ता हिच्यावर येऊन पडली, तिच्या पराक्रमी वडिलांनी तिला राज्यकारभारामध्ये मदत करण्यासाठी काही मुत्सद्दी लोक या राज्यात पाठवले असावे असे अनेक अभ्यासकांचे मत आहे. महामहोपाध्याय डॉ. वा. वि. मिराशी यांनी तर त्या लोकांमध्ये सुप्रसिद्ध कवी कालिदासही असावा असे मत मांडले. उज्ज्यनी हुन प्रभावतीगुप्ता हिच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी तसेच सहाय्य करण्यासाठी चंद्रगुप्त यांचा विश्वासू म्हणजे महाकवी कालिदास होता असेही काही अभ्यासकांचे मत आहे आणि याच ठिकाणी त्याने मेघदूताची निर्मिती केली 'विष्णुवृद्ध' गोत्र असलेले वाकाटक हे ब्राह्मण आणि शिवभक्त होते, तर 'धारण' गोत्र असलेल्या आणि विष्णूचे परमभक्त असलेल्या गुप्त या घराण्यातील प्रभावतीगुप्ता मात्र वैश्य होत्या. वाकाटकांच्या नंदिवर्धन अर्थात नगरधन शाखेचे हे राजा आणि राणी आपले राज्य समृद्ध व्हावे यासाठी सदैव तत्पर होते. राणी प्रभावतीगुप्ता हिने आपली विष्णूभक्ती सासरीसुद्धा चालूच ठेवली हे वाकाटकांनी या काळात बांधलेल्या नरसिंह आणि इतर वैष्णव मंदिरांवरून लक्षात येते. नंदिवर्धन, मनसर आणि रामटेक ही एकमेकांपासून अतिशय जवळ असणारी स्थळे म्हणजे वाकाटक राजांच्या राजकीय, सांस्कृतिक व्यवहाराची केंद्रच होती. कालांतराने येणाऱ्या काळात मनसर आणि नगरधन या ठिकाणी बरीच उत्खनने झाली आहेत. 

त्रिविक्रम मंदिर लाल दगडाचे असून मंडप चारही बाजूंनी उघडा आहे. या मंडपास सहा दगडी खांब असून त्यापैकी चार खांबावर पद्मबंधाचे कोरीव काम आहे. पण इतर दोन खांब मात्र साधे आहेत. मंडपाचा वरचा भाग इतर ठिकाणाच्या गुप्त -वाकाटक कालीन मंदिराप्रमाणे सपाट असून या देवालयात मुळात ही त्रिविक्रमाची प्रतिमा आहे. त्रिविक्रमची दगडी प्रतिमा चतुर्भुज असून शिरावर किरीट आहे. त्याच्या शिरावर मागे तेजोवलय दाखवले असून कानात कुंडल आणि गळ्यात पदकासहित मुक्तहार आहे. वैजयंतीमाला दोन्ही पायांवर लोंबती दर्शविली आहे. कमरेवर उदरबंध असून अधोवस्त्र बांधले आहे.  त्रिविक्रमांचे सर्व हात आता भग्न झालेले असून, त्यांचे रत्नजडीत अंगद अद्यापही दिसत आहे. त्रिविक्रमांचा डावा पाय मजबुतपणे रोवला असून उजवा पाय आकाश व्यापण्याकरिता उचललेला दिसतो. पण आता ते भग्न आहे. मंदिर छोटेसेच आहे. पण विदर्भातील प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. आता आपण रामटेकला गेल्यावर गड मंदिरासोबत त्रिविक्रमाचे मंदिर ही बघायला हवे खरंतर हे आडवाटेवर आहे पण हा वैभवशाली आणि समृद्ध करणारा इतिहास येथे बघायला मिळत आहे. फक्त निःशब्द व्हावे आणि हे सगळं वैभव डोळ्यात साठवत तेथून  निघालो खरंच संस्कृतीच्या पाऊलखुणा तिथे आजही डौलाने उभ्या आहेत. 

टॅग्स :chaturmasचातुर्मासTempleमंदिरnagpurनागपूरhistoryइतिहास