शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Chanakyaniti :मुलं ऐकत नाहीत? उलट बोलतात? त्यांना योग्य वळण लावण्यासाठी 'हे' उपाय नक्की करून बघा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2022 11:36 IST

Life Lesson: सुजाण पालकत्त्व एका दिवसात येत नाही, मुलांबरोबर पालकांचीही वाढ होत असते. हीच वेळ आहे शिकण्याची आणि शिकवण्याची!

'अगर किसी बच्चे को खिलोना ना दिया जाए, तो वह कुछ देर तकी रोएगा, मगर संस्कार ना दिए जाए तो जिंदगीभर रोएगा।' मध्यंतरी हे सुंदर वाक्य वाचनात आले होते. भारतात संस्कार, मूल्य, परंपरा या गोष्टींना महत्त्व का आहे, याचे सार वरच्या एका वाक्यात एकवटले आहे. आपले आयुष्य, जडणघडण, वागणूक या सर्वांवर संस्कारांचा मोठा हातभार असतो. ओल्या मातीला योग्य वयात वळण दिले, तरच ती चांगला आकार देते. ही ओली माती म्हणजे बाल्य दशा. याच वयात मुलांना प्रेम, आपुलकी, राग, लोभ, आदर, नम्रता या गोष्टींचे वळण लावायचे असते.

दुर्दैवाने आज घरोघरी या गोष्टींचा अभाव दिसत आहे. 'आमचा मुलगा आमचे ऐकत नाही', ही बाब आजचे पालक हसत हसत सांगतात. परंतु हेच हसू उद्या पाल्य आणि पालकांच्या डोळ्यातले आसू बनतात. यासाठी आचार्य चाणक्य म्हणतात, पुढच्या पिढीच्या हाती देशाचे भवितव्य आहे. त्यांना योग्य रीतीने घडवणे हे आपले कर्तव्य आहे. याची जाणीव ठेवून काही बाबतीत पथ्य जरूर पाळा. 

वाईट वळण, वाईट सवयी लागायला वेळ लागत नाही. मनुष्य स्वभाव वाईट गोष्टी पटकन आत्मसात करतो. लहान मुले त्याला अपवाद कशी असतील? म्हणून त्यांना वाईट गोष्टी कळण्याआधी जगात चांगले काय आहे, याची ओळख करून देणे ही पालकांची जबाबदारी आहे. माळी ज्याप्रमाणे ऊन, वारा, पाऊस यांपासून आपल्या बागेची राखण करतो, रक्षण करतो, तशी राखण पालकांना करायला हवी. आपल्या घरची बाग हसरी, खेळती राहावी वाटत असेल, तर स्वतः जातीने लक्ष घातले पाहिजे.

मुलांवर प्रेम करावे, माया करावी परंतु अति लाड करू नये. साखर गोड असते, परंतु त्याचे अति सेवन केले तर मधुमेह होतो आणि मधुमेहाने शरीर निकामी बनते. म्हणून नात्यात साखरेचा गोडवा असावा. परंतु अति लाडाने मुलांचेच नुकसान होते. त्यांचा स्वभाव हट्टी बनतो. राग राग करून, आक्रस्ताळेपणा करून, रडून, चिडून एखादी गोष्ट लगेच मिळवता येते हा चुकीचा संदेश मुलांना जातो. मुलांचे लाड जरूर पूरवा. परंतु गरज ओळखा आणि त्यांनी मागितलेली वस्तू त्यांना दोन दिवसांनी नाहीतर दोन महिन्यांनी द्या. त्यांचा संयम वाढेल आणि मिळणाऱ्या वस्तूची किंमत कळेल. 

मोठयांप्रमाणे लहान मुलांनाही मान अपमान कळतो. म्हणून त्यांच्याकडून चूक झाली असता चारचौघात त्याला ओरडण्यापेक्षा समजवून सांगा आणि चूक मोठी असेल, तर वेळीच एक फटका द्या. वेळेवर मारलेला एक फटका आयुष्यभराची शिकवण देऊन जातो. मुलांना अपमान वाटला तरी चालेल, परंतु मोठ्या अपराधाची शिक्षा वेळीच द्यायला हवी आणि नंतर त्यांची कानउघडणी देखील करायला हवी. मुलांना केवळ मारून मुटकून वळण लावता येत नाही. त्यांना त्यांच्या कलाने घेत समजवावे लागते. परंतु, पालकांकडे तेवढा संयम हवा. हा समतोल नीट राखला, तर मुलांकडून भविष्यात मोठे अपराध घडणार नाही. चुकीच्या गोष्टी करताना मन धजावणार नाही. आई वडिलांबद्दल आदरयुक्त भीती वाटेल आणि तेवढेच प्रेमही कायम राहील. 

टॅग्स :Parenting Tipsपालकत्व