शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

विवाहित माणूस ब्रह्मचारी असू शकतो का? हो! वाचा वसिष्ठ ऋषींची कथा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2021 12:15 IST

प्रापंचिक जबाबदाऱ्या सांभाळून अध्यात्मसाधना करणाऱ्या साधकाला ही विदेही अवस्था प्राप्त होऊ शकते!

'अवघा रंग एक झाला' या संत चोखामेळा यांच्या लोकप्रिय अभंगात एक ओळ आहे, `देही असोनि विदेही, सदा समाधिस्त राही' या ओळीचा फार मोठा गर्भितार्थ आहे. देहात राहूनही देह वासनांपासून अलिप्त राहणे, ही कला केवळ भक्तांनाच जमू जाणे. ते देहकर्म, देहधर्म करतात परंतु आत्मा प्रभू चरणांशी समाधिस्त ठेवतात. ही सिद्धी प्राप्त होण्यासाठी देवाशी समरसून जाणे संतांना अपेक्षित आहे, तेव्हाच तर अवघा रंग एक होईल! याबाबत एक कथा सांगता येईल, ती आहे वशिष्ठ ऋषी, अरुंधती आणि विश्वामित्र ऋषींची!

नदीच्या एका तीरावर वशिष्ठमुनींचा तपश्चर्येने सजलेला, फुललेला आणि डवरलेला आश्रम होता. एक दिवस हे महामुनी आपल्या धर्मपत्नीला म्हणाले, 'अरुंधती, आज सुग्रास भोजन कर आणि ते भोजन समोरील तीरावर घेऊन ये. बऱ्याच काळानंतर विश्वामित्रांची तपश्चर्या आज संपणार आह़े  त्यांना भूक लागलेली असेल. मी पुढे होतो, तूही लवकर ये'

पतीआज्ञेप्रमाणे अरुंधतीने पाकसिद्धी केली आणि नदीच्या त्या तीरावर जाणार तर नदीला पूर आलेला. वसिष्ठांनी पलिकडून पाहिले आणि तिचे भाव ओळखत म्हणाले, 'घाबरतेस काय? नदीला प्रार्थना कर, माझे पती ब्रह्मचारी असतील तर मला वाट करून दे!'

अरुंधती गोंधळली. लग्न होऊन हे ब्रह्मचारी कसे? तिने नदीला विनंती केली आणि काय आश्चर्य, नदीने वाट मोकळी करून दिली. अरुंधती पलीकडे पोहोचली. तिने विश्वामित्रांना जेऊ घातले. पोटभर जेवण झाले. वसिष्ठ निघून गेले होते. अरुंधतीने नदीला पूर आल्याचे सांगत विश्वामित्रांना उपाय विचारला. विश्वामित्र म्हणाले, 'देवी, नदीला सांग, विश्वामित्र आताच्या क्षणापर्यंत उपाशी असतील तर मला वाट करून दे!'

पोटभर जेवलेल्या विश्वामित्रांचे बोल ऐकून अरुंधती पुन्हा गोंधळली. तिने दिलेला उपाय ऐकला, नदीनेही तिचे ऐकले, अरुंधती स्वगृही पोहोचली. दिवसभर विचार करत बसलेली अरुंधती सायंकाळी वसिष्ठ परत आल्यावर विचारती झाली, `तुम्ही विवाहित असून, स्वत:ला ब्रह्मचारी म्हणवता, विश्वामित्र जेवून स्वत:ला उपाशी म्हणवतात आणि नदीला हे पटते व ती वाट मोकळी करते, हे काय गौडबंगाल आहे? मला काहीच कळले नाही.'

त्यावर हसून वसिष्ठ सांगतात, 'अगं देहबुद्धीने केलेले कर्तव्य वेगळे आणि आत्मबुद्धीचे कर्म वेगळे. तू आमच्या देहबुद्धीचा आणि देहधर्माचा विचार करत होतीस परंतु आम्ही आत्मशक्तीच्या आणि आत्मकर्माच्या बळावर नदीला आवाहन कर असे सांगितले. आमच्या आत्मबुद्धीच्या पावित्र्याची साक्ष नदीला पटल्यामुळे तिने मार्ग मोकळा केला. यालाच देही असोनि विदेही अवस्था म्हणतात.'

असाच प्रपंच संतांनीदेखील केला, परंतु देहबुद्धीने! आत्मबुद्धीने मात्र ते प्रभू चरणी समर्पित होते. आपल्याही या अवस्थेपर्यंत पोहोचायचे असेल, तर प्रापंचिक जबाबदाऱ्या पार पाडून मनाने अलिप्त होता आले पाहिजे, तसे करणे जमेल का?