शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
4
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
5
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
6
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
7
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
8
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
9
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
10
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
11
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
12
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
13
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
14
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
15
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
16
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
17
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
18
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
19
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
20
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
Daily Top 2Weekly Top 5

जय श्रीराम! ४५ दिवसांत १.२६ कोटी भाविकांनी घेतले राम दर्शन; अयोध्येत रेकॉर्डब्रेक कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 15:32 IST

Ram Mandir Ayodhya: महाकुंभमेळ्याची सांगता झाली असली तरी अयोध्येतील राम मंदिरात जाऊन रामदर्शन घेणाऱ्या भाविकांची संख्या वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे.

Ram Mandir Ayodhya: जगातील सर्वांत मोठ्या स्वरुपाचा धार्मिक सोहळा असलेल्या प्रयागराज येथील महाकुंभमेळ्याचा महाशिवरात्रीच्या दिवशी समारोप झाला. या दिवशी सुमारे १.४४ कोटी लोकांनी पवित्र स्नान केले. तर १३ जानेवारी २०२५ पासून ४५ दिवस सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात आतापर्यंत ६६.२१ कोटींहून अधिक भाविकांनी स्नान केले. हर हर महादेवच्या जयघोषाने महाकुंभ मेळ्याचा परिसर निनादला होता. अखेरच्या दिवशी पवित्र स्नान करण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यामुळे प्रयागराजमध्ये वाहनांच्या रांगाच रांगा लागल्याचे चित्र पहायला मिळाले. महाकुंभमेळ्यात सहभागी झालेले भाविक अयोध्येत जाऊन राम दर्शन घेत होते. यामुळे अयोध्येतही मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. 

मिळालेल्या माहितीनुसार, महाकुंभमेळ्याची सुरुवात झाल्यापासूनच अयोध्येत भाविकांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली. गेल्या वर्षी भव्य राम मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर आतापर्यंत कोट्यवधी भाविकांनी रामललाचे दर्शन घेतले आहे. सुमारे लाखो भाविक दररोज राम दर्शन घेत आहेत. परंतु, महाकुंभमेळ्याच्या ४५ दिवसांत अयोध्येत येणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. यामुळे राम मंदिराचे व्यवस्थापनही गडबडले. राम मंदिर व्यवस्थापनावरही मोठा ताण आला. कोणतीही अप्रिय घटना घडू नये, यासाठी प्रशासन, राम मंदिर ट्रस्ट यांनी अनेक बदल केले.

४५ दिवसांत १.२६ कोटी भाविकांनी घेतले राम दर्शन

१४ जानेवारी २०२५ ते २६ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत अयोध्येत येऊन तब्बल १.२६ कोटी भाविकांनी रामललाचे दर्शन घेतले. अयोध्येत येणाऱ्या भाविक, पर्यटकांची संख्या वाढतच चालली आहे. अयोध्येत भाविकांचा जनसागर लोटला आहे. ही गर्दी आणखी काही दिवस कायम राहील, असा अंदाज बांधण्यात आला आहे. तसेच या महाकुंभमेळ्याच्या कालावधीत राम मंदिरही १९ तास भाविकांसाठी खुले ठेवण्यात आले होते. रामललाच्या चरणी दररोज सुमारे ३.५ ते ४ लाख भाविक नतमस्तक होत आहेत. यामुळे रामललाची दिनचर्या पूर्णपणे बदलून गेल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, महाकुंभमेळा सुरू झाल्यापासून १३ जानेवारी रोजी १.७० कोटी, १४ जानेवारी रोजी ३.५० कोटी, २९ जानेवारी रोजी ७.६४ कोटी, ३ फेब्रुवारी रोजी २.५७ कोटी, १२ फेब्रुवारी रोजी २ कोटी आणि २६ फेब्रुवारी रोजी १.४४ कोटी भाविकांनी हजेरी लावली. या दिवशी विक्रमी संख्येने भाविक महाकुंभमेळ्यात आले होते. 

 

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरUttar Pradeshउत्तर प्रदेशspiritualअध्यात्मिक