शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

'धीर धरा...हे ही दिवस जातील'; वाचा दोन शेतकऱ्यांच्या यशापयशाची गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2021 08:00 IST

कितीही कठीण परिस्थिती असली, तरी संयम ठेवा! आज ना उद्या परिस्थिती बदलेल आणि त्याबरोबर तुमची मनस्थितीदेखील!

आपण सतत दुसऱ्यांकडे पाहून दु:खी होत असतो. आपल्या आनंदाची तुलना त्यांच्याशी करत राहतो. त्यामुळे होते असे, की जे आपल्याकडे आहे, त्याकडे आपले लक्षच जात नाही आणि नुकसान आपलेच होत राहते. आता या दोन शेतकऱ्यांचीच गोष्ट बघा ना!

एका गावात सामान्य जीवन जगणारे दोन शेतकरी होते. एक समाधानी होता तर दुसरा असमाधानी. गेल्या काही काळात त्या गावातल्या काही शेतकऱ्यांना आपल्या शेतात हिरे आणि मौल्यवान रत्ने सापडली. ते रातोरात श्रीमंत झाले. ते पाहून असमाधानी शेतकऱ्यानेसुद्धा नशीब आजमवायचहे ठरवले. त्यानेही प्रयत्न करून पाहिला इथवर ठीक आहे. परंतु त्याने अपयशाने खचून आत्महत्या केली. 

याउलट दुसरा शेतकरी आपले काम प्रामाणिकपणे करत राहिला. हिरे, मौल्यवान रत्ने यांची स्वप्न बघण्याऐवजी काळ्या मातीत सोन्यासारखे धान्य पिकवत होता. एक दिवस त्याला शेतात आकर्षक दगड दिसला. त्याने कौतुकाने तो घरी आणला. मुलांनाही मजा वाटली. बायकोने तो श्रद्धेने कपाळी लावून देवघरात ठेवला.

एक दिवस त्याचा मित्र शहरातून आला. त्याच्या घरी उतरला. तेव्हा त्याची दृष्टी देवघरात गेली. तो म्हणाला, हे मुल्यवान रत्न तू खुलेआम ठेवले आहेस, तुला भीती नाही वाटली?

यावर शेतकरी म्हणाला, ते रत्न आहे हेच मला माहित नव्हते. मला तो आकर्षक वाटला म्हणून घरी आणला. बायकोने देव्हाऱ्यात ठेवला, एवढेच!मित्र म्हणाला, तुझ्या शेतजमीनीची पाहणी करायला हवी. शेतकऱ्याने होकार दिला आणि खोदकामात त्या शेतातून मुल्यवान रत्नांची खाण निघाली. शेतकऱ्याचे दिवस पालटले. तो समाधानी होताच, आता आनंदाने वैभव उपभोगू लागला. त्यावेळेस त्याला आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची आठवण आली. त्यानेही स्वत:वर आणि दैवावर विश्वास ठेवला असता तर कदाचित आज परिस्थिती त्याचीही बदलली असती.

म्हणून कितीही कठीण परिस्थिती असली, तरी संयम ठेवा! आज ना उद्या परिस्थिती बदलेल आणि त्याबरोबर तुमची मनस्थितीदेखील!

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी