शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

Ayodhya Ram Mandir: श्रीरामलला प्रतिष्ठापना वर्षपूर्ती; करूया रामरक्षा पठण, देव, देश, धर्माला मिळेल संरक्षण कवच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 11:02 IST

Ayodhya Ram Mandir: श्रीरामलला प्रतिष्ठापना वर्षपूर्तीनिमित्त 'रामरक्षा घरोघरी' हा उपक्रम योजला आहे, त्यात घरी राहूनही सहभागी कसे होता येईल ते पहा. 

आज ११ जानेवारी, पौष शुक्ल द्वादशी, आजच्या तिथीला अयोध्येत अर्थात श्रीरामाच्या जन्मस्थळी उभारलेल्या श्रीराम मंदिरात रामलला प्राणप्रतिष्ठेला एक  वर्ष पूर्ण होत आहे. हे मंदिर म्हणजे रामभक्तांचे श्रद्धास्थान आहे. अशातच श्रीरामाची मूर्ती त्या स्थळी विराजमान झाली हा मोठा सोहळाच! वर्षभरात लाखो भाविकांनी रामललाचे दर्शन घेतले, अयोध्या नगरी पाहिली आणि आज वर्षपूर्ती सोहळा साजरा करण्याचे आयोजले आहे. हा उत्सव आपल्या परीने घरी बसूनही कसा साजरा करता येईल? चला जाणून घेऊ. 

समर्थ व्यासपीठ, पुणे व भक्तिसुधा फाऊंडेशन यांच्याकडून सोशल मीडियावर गेले अनेक दिवस एक मेसेज व्हायरल होत होता. तो म्हणजे 'रामरक्षा घरोघरी। रघुनाथ कृपा करी.' गेल्यावर्षी मकर संक्रांतीला पुण्यात स. प. महाविद्यालयात एक लाख लोकांनी सामूहिक रामरक्षा पठण केले होते. तर यावर्षी घरी राहून या उपक्रमात सहभागी होता येणार आहे. कसे? तर पुढीलप्रमाणे-

शनिवार ११ जानेवारी - सकाळी ११ ते १२ या वेळेत आपापल्या स्थानी

>> तीन वेळा रामरक्षा पठण>> एक भीमरूपी महारुद्रा मारुती स्तोत्र>> श्री रामनामाची एक जपमाळ

या पठणाचे तीन सामाजिक संकल्प : श्रीरामभक्ती , देशभक्ती, सीमेवरील लष्करी जवानांना रक्षा कवच 

या उपक्रमात प्रचंड संख्येने उत्स्फूर्त सहभागी व्हा, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे. आपली सामूहिक रामरक्षा पठण संख्या नोंदणी नाव-गावासहित ११ जानेवारी २०२५ रोजी कळवावी. 7020353130 या व्हाट्सअप नंबरवर अथवा https://bhaktisudha.co.in या वेबसाईटवर आपली सेवा झाली हे नोंदवता येईल. तसेच ज्यांना ही स्तोत्र पाठ नाहीत, त्यांच्यासाठी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ११ जानेवारी रोजी सकाळी ११ ते १२ या वेळेत या उपक्रमाचे पठण प्रसारित होईल. ही पठण संख्या अयोध्येत श्री रामचरणी अर्पण  होणार आहे. 

ज्यांना सकाळी ११ ते १२ या वेळेत रामरक्षा पठण करणे जमले नाही, त्यांनी दिवसभरात आपल्या सवडीने हा उपक्रम पूर्ण करावा. कारण रामरक्षा हे केवळ स्त्रोत्र नाही तर संरक्षण कवच आहे. त्याचा लाभ कसा होतो तेही जाणून घेऊ. 

रामरक्षा कधी व किती वेळा म्हणावी?

रोज एकदा ठराविक ठिकाणी ठरावीक वेळी म्हटल्याने रामरक्षा सिद्ध होते. किंवा गुढीपाडवा ते रामनवमी ह्या काळात दररोज १३ वेळा रामरक्षा म्हटल्याने ती सिद्ध होते. 

रामरक्षाचे इतर फायदे:

१) अशुभ शक्तीपासुन बचाव करते .२) राहु - केतु महादशेचा त्रासातून मुक्ती मिळते.३) कर्जमुक्ती व कर्जवसुली साठी फायदेशीर ठरते. त्यासाठी 'आपदामपहर्तारम....' हा श्लोक १ लक्ष वेळा म्हणल्याचे ऋणमुक्ती हे फळ मिळते.४) रामरक्षेमध्ये प्रत्येक अवयवाचे स्वतंत्र पाठ आहेत त्या त्या पाठाचे सतत पठण केल्याने त्याचे स्वतंत्र फलित मिळते.उदा: कौसल्याये दृशो पातु:....हा श्लोक सतत म्हटल्याने डोळ्यांचे विकार बरे होतात...ई.

रामरक्षेचे नियम :

>>रामरक्षा आपणांस जमेल तेव्हा वर्षभरातील कोणत्याही पोर्णिमेपासुन पठण करण्यास सुरुवात करणे लाभदायक ठरते.>> रामरक्षा रोज एकदा ठरावीक ठिकाणी ठरावीक वेळीच म्हणावी. वेळ व जागा बदलु नये>>तसेच त्या त्या आजारपणात अनुकूल श्लोकपठण केल्यास आजारपणातुनही मुक्ती मिळते.>>ह्या श्लोकपठणाचे १५००० पाठ जप करणे.>> जपाच्या बरोबरीने आजारी व्यक्तीच्या नावाने अभिमंत्रित केलेले " श्री रामरक्षा सिद्ध यंत्र " सतत जवळ ठेवावे. म्हणजे त्वरीत आजारपणातुन मुक्तता होते.>>हातपाय धुवून, शुचिर्भूत होऊन रामरक्षा म्हणण्यास हरकत नाही. >>कुमार वयातील मुलांनी तर रामरक्षा नित्याने अवश्य म्हणावी. त्यामुळे वाणीवर पण योग्य संस्कार होतात व नित्य रामरक्षा पठणाने शक्ति उत्पन्न होते व ती आपले सदा सर्वकाळ रक्षण करते. आबालवृद्धांनी पण नित्य रामरक्षा म्हणावी. त्याच्यापासून निश्चित फायदा आहेच.

रामरक्षेचे अनुपालन करण्याची पण पद्धत आहे.

कोणत्याही महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेपासून सुरुवात करून शुद्ध नवमीपर्यंत हे अनुष्ठान करतात. प्रतिपदेला एकदा, द्वितीयेला दोनदा याप्रमाणे चढत्या क्रमाने वाचून नवमीच्या दिवशी नऊवेळा रामरक्षेचा पाठ म्हणावा. अनुष्ठान म्हटले की त्याच्या यमनियमांचे पालन करणे झालेच. याचा अनुभव आल्याशिवाय राहात नाही.

श्रीरामरक्षा’ ह्या स्तोत्राचे महत्व काय?

श्रीरामरक्षा या शब्दाचा अर्थ रक्षणकर्ता राम असा आहे. प्रभु रामचंद्रांना ‘मर्यादा पुरुषोत्तम‘ असे म्हणतात. प्रभु रामचंद्रांचे चरित्र अवलोकन केल्यास आपल्या असे लक्षात येईल की, प्रभु रामचंद्रांनी राजा, पिता, बंधू, पति या सर्व नात्यांनी मर्यादा सांभाळून एक फार मोठा आदर्श घालून दिला आहे. बुधकौशिक ऋषिंच्या स्वप्नात जाऊन प्रत्यक्ष प्रभु रामचंद्रांनीच रामरक्षा हे स्तोत्र सांगितले आहे. त्यामुळे रामरक्षा स्तोत्रातील प्रत्येक अक्षर हे मंत्रमय व तारक असे आहे.

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरPuja Vidhiपूजा विधी