शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

'पुन्हा वाजणार सनई चौघडे, माघ मासात आनंदी आनंद चोहीकडे'; १० फेब्रुवारी माघ मासारंभ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2024 09:55 IST

Magh Maas: पौषामुळे स्थगित झालेल्या शुभकार्यांना माघ मासामुळे मिळणार चालना; जाणून घ्या माघ मासाची महती आणि माहिती!

यंदा १० फेब्रुवारीपासून माघ मास सुरु होत असून तो १० मार्च रोजी संपणार आहे, या महिन्यातील शुभ दिवस, सण आणि इतर महत्त्वाच्या गोष्टी याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

या महिन्याच्या पौर्णिमेला अथवा तिच्या आधी किंवा नंतर 'मघा' नक्षत्र येते, म्हणून या मासाला 'माघ' असे नाव प्राप्त झाले आहे. याचे प्राचीन नाव `तप' असे आहे.  या मासातील बहुतेक व्रतांमध्ये पौष मासाप्रमाणे तिळाचा अधिक उपयोग केल जातो. भगवान शिवशंकराची महाशिवरात्री आणि कश्यप अदितीचा पुत्र म्हणून गणपतीने `महोत्कट विनायक' म्हणून ज्या तिथीला अवतार घेतला, ती विनायकी ही गणेशजयंती अशा पिता पुत्राच्या अवतारांनी हा माघ महिना सर्व शिवभक्तांना तसेच गणेशभक्तांना अतिप्रिय आहे. याशिवाय माघातील शुद्ध सप्तमीला येणारी 'रथसप्तमी' ही सूर्योपासकाां 'पर्वणी' वाटते. तर त्याच्या दुसऱ्या दिवशी येणारी भीमाष्टमी ही भिष्म पितामहांच्या श्राद्धकर्मासाठी आपल्या धर्मधुरिणांनी आग्रहपूर्वक तसेच आदरपूर्वक राखून ठेवल्याने भारतीय संस्कृतीचा एक वेगळा हृदयंगम असा पैलू अखिल जगाला दाखवून देते. कृष्णपक्षातील 'दासनवमी' ही समर्थभक्तांसाठी आणि समर्थ सांप्रदायिकांसाठी अतिशय महत्त्वाची आहे. हा नेमक्याच परंतु अतिमहत्त्वाच्या तिथ्यांमुळे माघ महिना आपले वेगळे आणि महत्त्वाचे स्थान दाखवतो. या मासात विशेष कोणती व्रते नाहीत. तरीही त्याचे उत्साहाने स्वागत केले जाते. पौषामुळे साखरपुडा, मुंज, गृहप्रवेश इ. खोळंबलेल्या शुभ कार्यांना माघ मासामुळे पुनश्च चालना मिळते. 

माघ मासात वसंत ऋतूचे आगमन होते. वसंत ऋतू हा समस्त ऋतूंचा राजा. वसंताचे आगमन ही सृष्टीसाठीदेखील एक सुंदर कलाटणी असते. शिशिराची पानगळती संपवून वसंताची चाहूल लागताच कोकीळ कूजन कानावर पडू लागते. झाडावर फुटलेली नवीन पालवी वसंतोत्सवाची वर्दी देते. निष्पर्ण झालेली झाडे इवल्याशा पानांनी साजिरी दिसू लागतात आणि पाहता पाहता निसर्गाचे रूप पालटू लागते. याच काळात रसिकजनांना साहित्य संगीताची मेजवानी मिळावी, म्हणून वसंत व्याख्यानमाला, वसंत संगीत महोत्सव इ. कार्यक्रमांची आखणी केली जाते. दूरदर्शनपूर्वीच्या काळात  असे कार्यक्रम लोकांचे मनोरंजन आणि प्रबोधन करत असत. आजच्या मोबाईलयुगात या कार्यक्रमांचे स्वरूप पालटले असले, तरीही सातत्य कायम आह़े. 

माघ मासात दानाला अतिशय महत्त्व आहे. येनकेनप्रकारेण आपल्या हातून पुण्य घडावे, हा त्यामागील आशय आहे. आपल्या उत्पन्नाचा दहावा भाग समाजासाठी, देशासाठी खर्च व्हावा. कारण आपण जसे समाजाकडून घेत असतो, तसे आपण समाजाचे देणेही लागतो. व्रत वैकल्याच्या निमित्ताने ही छोटीशी परतफेड करावी, हा आपल्या संस्कृतीने आपल्यावर घातलेला संस्कार आहे.

याशिवाय माघ मासातील दिनविशेष आणि सण उत्सवांची महती आणि माहिती वेळोवेळी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूच, तुर्तास एवढेच!