शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

Asrology Tips: जेवणाच्या ताटात एकाच वेळी तीन पोळ्या वाढू नये म्हणतात, अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2023 13:11 IST

Health Tips: सम-विषम संख्येचे महत्त्व धर्मशास्त्रातही पाळले गेले आहे. यात आहारशास्त्राचा समावेश का आणि कसा झाला ते पाहू

'तीन तीगाडा काम बिघाडा', 'तेरड्याचा रंग तीन दिवस', 'नव्याचे नऊ दिवस', 'दुष्काळात तेरावा महिना' अशा म्हणी आपण ऐकल्या आहेत, यावरून आपल्या पूर्वजांना विषम संख्येबाबत आलेले अनुभव या साहित्यातून डोकावतात. म्हणून विशिष्ट बाबी वगळता त्यांनी समतेचा पुरस्कार केला आहे. म्हणून वास्तुशास्त्र असो नाहीतर ज्योतिष शास्त्र सम संख्येला अधिक महत्त्व असल्याचे दिसून येते. तीच बाब आहारशास्त्राबाबत सांगितली जाते ती अशी-

ज्योतिषशास्त्रानुसार :

ज्योतिष शास्त्रात तीन क्रमांक शुभ मानला जात नाही. उपासनेत किंवा दैनंदिन जीवनात देखील तीनाऐवजी चाराला आपण प्राधान्य देतो. याउलट श्राद्धाच्या पूजेत, स्वयंपाकात, मंत्रोच्चारणात विषम संख्येने गोष्टी केल्या जातात. अगदी जेवणाच्या ताटातही तीन पोळ्या वाढल्या जातात. त्यामुळे इतर वेळी तीन पोळ्या वाढणे शास्त्राने निषेधार्थ ठरवले आहे. 

आरोग्यशास्त्रानुसार : 

तसे पाहिले तर जेवणात तीन पोळ्या एकत्र खाऊ नयेत कारण त्यामुळे शरीराचे वजन झपाट्याने वाढते. शरीरावर नियंत्रण ठेवण्यासाठी एका वेळी दोन पोळ्या पुरेशा मानल्या जातात. एक वाटी भात, एक वाटी आमटी आणि एक वाटी भाजी एवढे अन्न शरीरासाठी पूरक मानले जाते. पुरेसे अन्न खाल्ल्याने शरीर नेहमी तंदुरुस्त आणि ऊर्जावान राहते. याउलट जास्त अन्न खाल्ल्याने शरीरातील चरबी वाढते आणि आळसही कायम राहतो. या सर्व गोष्टी टाळण्यासाठी हलका आहार घेणे श्रेयस्कर ठरते.

तर्कशास्त्रानुसार :

आपल्याकडे अनेक गोष्टी प्रथा, परंपरा म्हणून पाळल्या जातात आणि पुढे नेल्या जातात. काही गोष्टींना शास्त्राधार असतो तर काही गोष्टी आपापल्या सोयीने बदल करत रुजवल्या जातात. उदाहरणार्थ, वटसावित्रीची पूजा वडाला फेऱ्या मारून करणे शास्त्राला अभिप्रेत असते, जेणेकरून प्राणवायू देणाऱ्या वृक्षाच्या सान्निध्यात महिलांना सकारात्मक ऊर्जा मिळावी हा मूळ हेतू, मात्र अलीकडे स्त्रियांनी वडाची फांदी तोडून आणत पर्यावरणाचे नुकसान सुरु केले, त्यात धर्मशास्त्राची काय चूक? तीन पोळ्या एकत्र न वाढण्यामागेही तार्किक कारण हेच लक्षात येते, की सरसकट सामान्य व्यक्ती दोन पोळ्या खाऊन थांबते, जोडीला भात, भाजी, कोशिंबीर, पापड असे इतरही जिन्नस असतात. आग्रहाखातर पानात भरपूर पदार्थ वाढून ठेवले आणि खाणाऱ्याला ते जड झाले तर ते वाया जाऊ नयेत, म्हणून सुरुवातीला मोजक्या प्रमाणात जेवण वाढून नंतर गरजेनुसार पदार्थांचा तसेच पोळ्यांचा आग्रह केला जातो. त्यामुळे अन्नाची नासाडी होत नाही आणि अन्न टाकल्याचे पापही लागत नाही! 

 

 

टॅग्स :Astrologyफलज्योतिषfoodअन्नHealth Tipsहेल्थ टिप्स