शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

Asrology Tips: जेवणाच्या ताटात एकाच वेळी तीन पोळ्या वाढू नये म्हणतात, अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2023 13:11 IST

Health Tips: सम-विषम संख्येचे महत्त्व धर्मशास्त्रातही पाळले गेले आहे. यात आहारशास्त्राचा समावेश का आणि कसा झाला ते पाहू

'तीन तीगाडा काम बिघाडा', 'तेरड्याचा रंग तीन दिवस', 'नव्याचे नऊ दिवस', 'दुष्काळात तेरावा महिना' अशा म्हणी आपण ऐकल्या आहेत, यावरून आपल्या पूर्वजांना विषम संख्येबाबत आलेले अनुभव या साहित्यातून डोकावतात. म्हणून विशिष्ट बाबी वगळता त्यांनी समतेचा पुरस्कार केला आहे. म्हणून वास्तुशास्त्र असो नाहीतर ज्योतिष शास्त्र सम संख्येला अधिक महत्त्व असल्याचे दिसून येते. तीच बाब आहारशास्त्राबाबत सांगितली जाते ती अशी-

ज्योतिषशास्त्रानुसार :

ज्योतिष शास्त्रात तीन क्रमांक शुभ मानला जात नाही. उपासनेत किंवा दैनंदिन जीवनात देखील तीनाऐवजी चाराला आपण प्राधान्य देतो. याउलट श्राद्धाच्या पूजेत, स्वयंपाकात, मंत्रोच्चारणात विषम संख्येने गोष्टी केल्या जातात. अगदी जेवणाच्या ताटातही तीन पोळ्या वाढल्या जातात. त्यामुळे इतर वेळी तीन पोळ्या वाढणे शास्त्राने निषेधार्थ ठरवले आहे. 

आरोग्यशास्त्रानुसार : 

तसे पाहिले तर जेवणात तीन पोळ्या एकत्र खाऊ नयेत कारण त्यामुळे शरीराचे वजन झपाट्याने वाढते. शरीरावर नियंत्रण ठेवण्यासाठी एका वेळी दोन पोळ्या पुरेशा मानल्या जातात. एक वाटी भात, एक वाटी आमटी आणि एक वाटी भाजी एवढे अन्न शरीरासाठी पूरक मानले जाते. पुरेसे अन्न खाल्ल्याने शरीर नेहमी तंदुरुस्त आणि ऊर्जावान राहते. याउलट जास्त अन्न खाल्ल्याने शरीरातील चरबी वाढते आणि आळसही कायम राहतो. या सर्व गोष्टी टाळण्यासाठी हलका आहार घेणे श्रेयस्कर ठरते.

तर्कशास्त्रानुसार :

आपल्याकडे अनेक गोष्टी प्रथा, परंपरा म्हणून पाळल्या जातात आणि पुढे नेल्या जातात. काही गोष्टींना शास्त्राधार असतो तर काही गोष्टी आपापल्या सोयीने बदल करत रुजवल्या जातात. उदाहरणार्थ, वटसावित्रीची पूजा वडाला फेऱ्या मारून करणे शास्त्राला अभिप्रेत असते, जेणेकरून प्राणवायू देणाऱ्या वृक्षाच्या सान्निध्यात महिलांना सकारात्मक ऊर्जा मिळावी हा मूळ हेतू, मात्र अलीकडे स्त्रियांनी वडाची फांदी तोडून आणत पर्यावरणाचे नुकसान सुरु केले, त्यात धर्मशास्त्राची काय चूक? तीन पोळ्या एकत्र न वाढण्यामागेही तार्किक कारण हेच लक्षात येते, की सरसकट सामान्य व्यक्ती दोन पोळ्या खाऊन थांबते, जोडीला भात, भाजी, कोशिंबीर, पापड असे इतरही जिन्नस असतात. आग्रहाखातर पानात भरपूर पदार्थ वाढून ठेवले आणि खाणाऱ्याला ते जड झाले तर ते वाया जाऊ नयेत, म्हणून सुरुवातीला मोजक्या प्रमाणात जेवण वाढून नंतर गरजेनुसार पदार्थांचा तसेच पोळ्यांचा आग्रह केला जातो. त्यामुळे अन्नाची नासाडी होत नाही आणि अन्न टाकल्याचे पापही लागत नाही! 

 

 

टॅग्स :Astrologyफलज्योतिषfoodअन्नHealth Tipsहेल्थ टिप्स