शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

बॉसची कृपादृष्टी, मनासारखी वेतनवाढ, पदोन्नती शक्य? हो! सुरू आहे अप्रायझल कालावधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 15:08 IST

ज्योतिषशास्त्रात नोकरी, करिअरमध्ये यश, प्रगती साध्य करण्यासाठी काही उपाय सांगितले जातात. नेमके काय करावे? जाणून घ्या...

ज्योतिषीय दृष्टिकोनातून एप्रिल महिना विशेष मानला गेला असला तरी आणखी एका कारणासाठी तो महत्त्वाचा मानला जातो. नोकरी, कार्यक्षेत्र, करिअरच्या बाबतीतही एप्रिल आणि पुढील एक ते दोन महिने महत्त्वाचे मानले जातात. कारण याच कालावधीत बहुतांश कंपन्यांमध्ये अप्रायझल म्हणजेच मूल्यमापनाची प्रक्रिया सुरू केली जाते. यावरून वेतनवाढ, पदोन्नती, बदली ठरत असते. हा कालावधी नोकरदारांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा मानला जातो. यावर पुढचे भवितव्य अवलंबून असते. ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगितले जातात, ते या अप्रायझल कालावधीसाठी उपयुक्त ठरू शकतात. 

एप्रिल आणि पुढील दोन महिने मूल्यमापनाचा कालावधी असतो. वर्षभर केलेल्या मेहनतीचे फळ पदोन्नती व वेतनवाढीच्या रूपाने मिळते. पण कधी-कधी मेहनत करूनही फळ मिळत नाही, तेव्हा निराशाच होते. यामागे ग्रहस्थिती, ग्रहदोष असू शकतो, असे सांगितले जाते. असे काही ग्रह आहेत, ज्यांचा आपल्या प्रगतीशी थेट संबंध आहे. या ग्रहांचे उपाय केल्यास कुंडलीतील ग्रह मजबूत होऊ शकतात आणि त्याचा लाभ तुम्हाला प्राप्त होऊ शकतो, असे मानले जाते. मात्र, त्यासोबतच प्रामाणिकपणे काम करणे, आपल्या कामांमध्ये १०० टक्के योगदान देणे, दिलेली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडणे आवश्यक ठरते. तुमच्या कर्मासोबत भाग्य आणि नशीबाची साथ यश, प्रगती साध्य करून देऊ शकते, असे सांगितले जाते. 

बॉसशी चांगले संबंध ठेवण्यासाठी शुभ ३ ग्रह असणे आवश्यक

नोकरी, कार्यक्षेत्रात जलद प्रगती करण्यासाठी आणि बॉसशी चांगले संबंध ठेवण्यासाठी शुभ ३ ग्रह असणे आवश्यक आहे. हे ग्रह सूर्य आणि राहू-केतू आहेत. सूर्य करिअर, कार्यक्षेत्र, नेतृत्व यांचा कारक मानला जातो. सूर्य गुरुकारकही असल्याचे म्हटले जाते. बॉसही गुरू, मार्गदर्शकाच्या भूमिकेत असतो. जर तुमचा सूर्य बलवान असेल, तर बॉससोबत चांगले संबंध प्रस्थापित होऊ शकतील. तसेच तुम्हाला त्याच्याकडून खूप काही शिकण्याची आणि पुढे जाण्याची संधी मिळेल. दुसरीकडे, राहू आणि केतू हे असे ग्रह आहेत की जर ते अशुभ असतील तर ते तुमचे बॉससोबतचे नाते बिघडू शकते. त्यासाठी राहु-केतुचे उपाय उपयुक्त ठरू शकतात. 

सूर्य बलवान होण्यासाठी काय उपाय करावे?

सूर्याचे कुंडलीतील स्थान महत्त्वाचे मानले गेले आहे. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य अनुकूल नसेल, तर त्या व्यक्तीला १२ रविवार सूर्याचे व्रत करण्याचा सल्ला दिला जातो. काळी लवकर उठून सूर्योदयाला सूर्य देवतेला अर्घ द्यावे. सूर्य मंत्रांचा जप करावा. ज्येष्ठांचा आदर करावा. आदित्य हृदय स्तोत्र वाचावे. सूर्याचे रत्न माणिक धारण करावे. मात्र, त्याची योग्य पद्धत, धारण करण्याचा विधी, यासाठी तज्ज्ञ मंडळींचा सल्ला अवश्य घ्यावा.

राहु-केतुच्या शुभ प्रभावासाठी काय करावे? 

राहु-केतु छाया ग्रह मानले गेले असून, त्याचा प्रभाव बुद्धीवर होतो, असे म्हटले जाते. राहु-केतुचा सकारात्मक प्रभाव प्राप्त करण्यासाठी नकारात्मक विचारांचा परिणाम आपल्यावर होऊ न देण्याचा प्रयत्न करावा. आशावादी राहावे. सकारात्मकता येण्यासाठी आपल्या आराध्य देवतेचे यथाशक्ती नामस्मरण, जप करावा. धैर्याने परिस्थिती हाताळावी. हाती घेतलेले काम उत्तमरितीने कसे करता येईल, यावर भर द्यावा, असे संगितले जाते. तसेच पूजा-अर्चा करताना चंदनाचा प्रामुख्याने वापर करावा. चंदनाची अगरबत्ती, धूप यांचा समावेश पूजनात करावा. तसेच दानधर्म करण्याचा सल्ला दिला जातो. सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, तज्ज्ञ मंडळींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल.  

टॅग्स :Astrologyफलज्योतिषjobनोकरी