शहरं
Join us  
Trending Stories
1
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
2
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
3
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
4
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
5
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
6
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
7
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
8
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
9
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
10
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
11
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
12
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
13
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
14
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
15
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
16
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
17
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
18
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
19
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
20
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?

ज्योतिषशास्त्र सांगते, लग्न ठरवताना 'या' राशींच्या जोड्यांनी एकत्र येणे म्हणजे घराची युद्धभूमी करणे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2021 08:00 IST

आयुष्याची सप्तपदी ही तप्तपदी ठरू नये असे वाटत असेल तर संपूर्ण लेख वाचा!

संसार म्हटला की भांडण होतच राहणार. परंतु, सतत भांडत राहणे म्हणजे संसार नाही ना? 'कधी तिने मनोरम रुसणे, रुसण्यात उगीच ते हसणे' इथवर लटका राग असेल, तर 'ऋणानुबंधांच्या गाठी' जन्मभर टिकतील. परंतु, दोघांनी भांडणात तलवारी उपसल्या, तर नात्याचा खून झालाच म्हणून समजा. यासाठी ज्योतिषशास्त्र आपल्याला विवाहपूर्व सूचना देते. त्यानुसार आपल्या राशीला अनुकूल राशीचा जोडीदार निवडून सप्तपदी घेतली, तर भविष्यातील वादावाद टाळता येतील. चला तर जाणून घेऊया, आपल्या राशीला कोणत्या राशीचा जोडीदार चालणार नाही ते!

कर्क आणि सिंह रास :ज्योतिषशास्त्रानुसार कर्क आणि सिंह राशीच्या व्यक्ती एकत्र आल्यास गृहकलहाला खतपाणी मिळेल. या राशींच्या व्यक्ती लग्नामुळे एकत्र आल्या, तरी त्यांच्यातील अंतर्गत मतभेदामुळे त्यांचे नाते परस्परांशी बांधले जाणार नाही. कर्क राशीचे लोक नात्याबद्दल सजग असले, तरी सिंह राशीचा वरचढ स्वभाव नात्यात अहंभाव निर्माण करतो. त्यामुळे प्रेमाला थारा मिळत नाही.

कुंभ आणि मकर रास : कुंभ आणि मकर राशीचे लग्न जुळल्यास वरवर पाहता जोडी उत्तम असेल, दिसेल. परंतु दोघांचे आपापल्या क्षेत्रातील, स्वभावातील, कामातील मतभेद यांचा परिणाम नात्यातील मतभेद वाढवण्यास हातभार लावतो आणि दरदिवशी भांडणाला कारण मिळते. मकर राशीचे लोक अतिसंवेदशील, तर कुंभ राशीचे लोक अति तटस्थ असतात. दोन्ही राशींनी स्वभावाची दोन टोवंâ गाठल्यामुळे नातेही दुभंगू लागते.

मिथुन आणि कन्या रास :मिथुन राशीचे लोक भावुक असतात, तर कन्या राशीचे तटस्थ आणि संशयी वृत्तीचे असतात. मिथुन राशीच्या लोकांना प्रेमाच्या मोबदल्यात कन्या राशीकडून रुक्ष अनुभव मिळाल्याने ते सतत नाराज राहतात. याउलट कन्या राशीचे लोक मिथुन राशीचा जोडीदार असल्यास त्याचा विचार न करता त्याला सोडून आपल्या आयुष्यात पुढे निघून जातात.

वृषभ आणि तुळ रास :वास्तविक पाहता वृषभ आणि तुळ राशीचे लोक नाते, प्रेम, कौटुंबिक संबंध याबाबत नेहमी जागरुक असतात. याच कारणामुळे त्यांचे परस्पराबद्दल प्रेम आणि ओढ त्यांचे नाते मजबूत ठेवते. परंतु, काही काळानंतर दोन्ही राशींमध्ये या गुणाचा अभाव निर्माण होऊन दोन्ही राशी दुरावतात आणि नात्यांमध्ये दरी निर्माण होत, विलग होतात.

मीन आणि वृश्चिक रास : ज्योतिषशास्त्रानुसार मीन आणि वृश्चिकची जोडी आदर्श मानली जाते. परंतु, राशीचे गुण आडवे येतात आणि नात्यात कटुता निर्माण करतात. मीन राशीचे लोक अति संवेदनशील आणि प्रेमळ असतात, याउलट वृश्चिक राशीचे लोक प्रेमळ असूनही प्रेम व्यक्त करण्यात हलगर्जीपणा करतात. तसेच त्यांच्या संशयी स्वभावामुळे मीन राशीचे लोक दुखावले जातात आणि याच कारणामुळे या दोन राशींमध्ये प्रेमाच्या जागी विसंवादाची  किंवा अबोल्याची पोकळी निर्माण होते व त्याचे पर्यवसान नाते तुटते.

कर्क आणि धनु रास :कर्क आणि धनु राशीचे एकत्र येणे तसे दुर्मिळच! कारण, या राशींचे गुण परस्परविरुद्ध आहेत. धनु राशीचे लोक काटेकोर आणि वेळेला महत्त्व देणारे असतात, तर कर्क राशीच्या लोकांना वेळेचा, परिस्थितीचा काही परिणाम होत नाही. ते आपल्याच तंद्रित असतात. या कारणामुळे धनु राशीला कर्क राशीशी जुळवून घेणे अशक्य ठरते. परिणामी, या दोन्ही राशी एकत्र येत नाहीत.

टॅग्स :Astrologyफलज्योतिष