शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

Astrology : ज्ञानेश्वर माउलींच्या ओजस्वी लेखनशैलीला जोड मिळाली, ती 'या' ग्रहदशेची!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2023 11:08 IST

Saint Dnyaneshwar: आपल्याकडे साहित्यिकांची कमतरता नाही, मात्र लेखनशैली प्रभावी होण्यासाठी गुरुकृपा आणि अनुकूल ग्रहदशाही तेवढीच महत्त्वाची!

>> अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक 

लेखन हे एक प्रभावी माध्यम आहे. समाजाची विचारधारा संपूर्णपणे बदलण्याची ताकद ह्या लेखणीत आहे त्यामुळे सर्वप्रथम ह्या लेखणीला तसेच आपल्या सद्गुरुना वंदन करूनच लिहावे . मनात विषयाची समज पक्की हवी . मूळ मुद्दे हवे तर लिहून काढावे आणि त्यानुसार परिच्छेद करून लिहावे. विषय कुठेही भरकटत जाणार नाही ह्याचे भान असावे. आपले म्हणणे वाचकांच्या  हृदयाचा ठाव घेणारे असेल तरच त्याची पोचपावती आपल्याला मिळेल. 

ज्योतिषीय दृष्टीकोनातून लेखन कौशल्य अभ्यासताना मी माऊलींच्या पत्रिकेचा अभ्यास करीन . ज्ञानेश्वर माऊली ह्यांनी लिहिलेली ओं नमोजी आज्ञा , मोगरा फुलाला , अजी सोनियाचा दिनू हि काव्ये अजरामर झालेली आहेत . लेखनाचा मुख्य ग्रह बुध आणि ज्ञानाशिवाय लेखणी उजळणार नाही त्यामुळे ज्ञानाचा सागर गुरु. बुध ला योग्य रीतीने वळवायचे काम गुरूकडे आहे. लेखन हाताने लिहिले जातात म्हणून हात , बाहु महत्वाचे . बुध आणि गुरु सोबत नेप हा लेखनासाठी अंतस्फुर्ती  देणारा ग्रह तसेच मनाचा कारक चंद्र सुद्धा तितकाच महत्वाचा . ज्ञानेश्वर माऊलींचे बुद्धीसामार्थ्य अचाट आणि विस्मय चकित करणारे होते . इतक्या लहान वयातील त्यांची समज वाखाणण्याजोगी होती. वयाच्या 16 व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा ज्ञानाने भरलेला अमृतासारखा ग्रंथ त्यांनी रचला जो आज पुढील कित्येक पिढ्यांना मार्गदर्शक ठरत आहे. कुंडलीच्या लाभ ते तृतीय भावापर्यंत त्यांच्या कुंडलीत गुरु चंद्र शुक्र राहू बुध ह्यासारख्या बलाढ्य ग्रहांचे अधिष्ठान आहे खांद्याचा वरचा भागात हे सर्व ग्रह आहेत . खांद्याचा वरील भाग म्हणजे जिथे मेदू आहे म्हणजेच बुद्धी मन विचारप्रणाली . बुद्धीचा कारक गुरु लाभेश लाभात , लग्नात उच्चीचा चंद्र जो तृतीयेश सुद्धा आहे ,चंद्र स्थिर राशीत ,  बुध गुरु नवपंचम , शुक्र बुधाच्या राशीत , चंद्र बुध लाभ , लग्नेश शुक्रवार व्ययेश मंगळाची दृष्टी , कीर्ती सातासमुद्रापलीकडे गेली , तृतीय स्थान आणि चंद्र शुक्र गुरु ह्यामुळे जनमानसात प्रसिद्धी मिळाली. त्यांच्या लिखाणात तरलता आणि अपार सौंदर्य होते.

लेखन हि एक कला आहे आणि अनेकदा ती उपजत असायला लागते हा माझा अभ्यास सांगतो . ठरवून काहीही लिहिता येत नाही पण अभ्यास पूर्ण लेखन लेखनाचा दर्जा उंचावते . ओघवती आणि सहज सोपी भाषा वाचकांशी जवळचे नाते जोडते. सरतेशेवटी सर्वात मुख्य म्हणजे सद्गुरूंचा आशीर्वाद . स्वतःची साधना , उपासना , वाचन , संशोधन , विचार मंथन , अंतर्स्फुर्ती , योग्य वेळी योग्य विषयाची निवड करून केलेल्या लेखांची निर्मिती आत्यंतिक समाधान देते आणि वाचकांना अंतर्मुख होण्यास कारणीभूत ठरते.

लेखन कौशल्य हा गुरूंचा आशीर्वाद . लेखन करणे हे खचितच सोपे नाही त्यालाही कष्ट आहेत , आपला जीव ओतावा लागतो . लेखन हि गुरुकृपा आहे त्याचा योग्य मान ठेवावा ,  इतरांचे लेख चोरून साहित्य चोरी करून आपण सद्गुरूंच्या रोषास कारणीभूत होणार ह्याचे भान ठेवावे कारण आजकाल साहित्य चोरी हा प्रकार सर्रास आढळतो . तसेही लेख चोरून लेखकाची प्रतिभा तर नाही चोरता येणार हेही तितकेच खरे आहे. विचार व्हावा .  

संपर्क : 8104639230

 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष