शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

Asto Tips: दही खाऊन झाल्यावर वाटी स्वच्छ न करता घासायला टाकू नका; तणावग्रस्त राहाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2024 12:57 IST

Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार दही खाऊन झाल्यावर वाटी लगेच घासायला टाकून न देता त्यात पाणी घालून प्यावे; त्याचा कुंडलीदोषाशी आहे निकटचा संबंध!

दही किंवा ताक हा भारतीय आहार पद्धतीचा अविभाज्य भाग असतो. पूर्वीचे लोक तर म्हणायचे, 'दही नाही तिथे काही नाही' म्हणजे दह्याला एवढे महत्त्व होते. ते शुभ मानले जाते, एवढेच नाही तर महत्त्वाच्या कामाला जाताना दही साखरही दिले जाते. त्याचे आरोग्यदायी गुणधर्म तर आपण जाणतोच, शिवाय त्यापासून बनवलेले ताक देखील अत्यंत गुणकारी मानले जाते. म्हणून दही किंवा ताक प्यायल्या नंतर ती वाटी लगेच घासायला टाकून न देता त्यात पाणी घालून त्याचा प्रत्येक कण पोटात घ्यावा असे शास्त्र सांगते. तसे न केल्यास होणारा कुंडली दोष आणि त्याच्याशी जोडलेली रामकथाही जाणून घेऊ. 

यामागील रामकथा :

रामकथेत अशी गोष्ट सांगितली जाते, की एकदा हनुमंत सीता माईच्या शोधात लंकेत गेले होते. तिथे ते रावणाच्या पाकगृहात पोहोचले. तिथे खरकटी भांडी होती. त्या ताटांपैकी एक भले मोठे सोन्याचे ताट रावणाचे होते. त्यात सगळे पदार्थ चाटून पुसून संपवले होते, फक्त दह्याची वाटी स्वच्छ केली नव्हती. ती पाहता हनुमंताने ओळखले, की रावणाचा मृत्यू समीप आला आहे. 

या रामकथेवरून दह्याचे महत्त्व अधोरेखित होते. आणि रावणाचा मृत्यू समीप यासाठी म्हटलं आहे, कारण दह्याची नासाडी करणारी व्यक्ती मुजोर वृत्तीची असते. ती व्यक्ती आपल्याच कृत्याने ताण तणाव ओढवून घेते आणि तणावग्रस्त जीवन जगते. हनुमंताचे भाकीत खरे ठरले. रामावर विजय मिळवण्याचा ध्यास घेतलेल्या रावणाला मृत्यूला सामोरे जावे लागले. 

कुंडली दोष :

दही, दूध, तूप, लोणी, ताक हे वैभवाचे प्रतीक मानले जाते, त्याची नासाडी म्हणजे आपणच आपल्या कुंडलीत निर्माण केलेला दोष! ज्योतिष शास्त्रानुसार हे वैभव ज्या चंद्र देवतेच्या कृपेमुळे प्राप्त होते, ती देवता या कृतीमुळे रुष्ट होते, परिणामी कुंडलीत चंद्र दोष निर्माण होतो, आयुर्मान कमी होते आणि व्यक्ती तणावग्रस्त आयुष्य जगते. 

टॅग्स :Astrologyफलज्योतिषramayanरामायण