शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

Asto Tips: दही खाऊन झाल्यावर वाटी स्वच्छ न करता घासायला टाकू नका; तणावग्रस्त राहाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2024 12:57 IST

Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार दही खाऊन झाल्यावर वाटी लगेच घासायला टाकून न देता त्यात पाणी घालून प्यावे; त्याचा कुंडलीदोषाशी आहे निकटचा संबंध!

दही किंवा ताक हा भारतीय आहार पद्धतीचा अविभाज्य भाग असतो. पूर्वीचे लोक तर म्हणायचे, 'दही नाही तिथे काही नाही' म्हणजे दह्याला एवढे महत्त्व होते. ते शुभ मानले जाते, एवढेच नाही तर महत्त्वाच्या कामाला जाताना दही साखरही दिले जाते. त्याचे आरोग्यदायी गुणधर्म तर आपण जाणतोच, शिवाय त्यापासून बनवलेले ताक देखील अत्यंत गुणकारी मानले जाते. म्हणून दही किंवा ताक प्यायल्या नंतर ती वाटी लगेच घासायला टाकून न देता त्यात पाणी घालून त्याचा प्रत्येक कण पोटात घ्यावा असे शास्त्र सांगते. तसे न केल्यास होणारा कुंडली दोष आणि त्याच्याशी जोडलेली रामकथाही जाणून घेऊ. 

यामागील रामकथा :

रामकथेत अशी गोष्ट सांगितली जाते, की एकदा हनुमंत सीता माईच्या शोधात लंकेत गेले होते. तिथे ते रावणाच्या पाकगृहात पोहोचले. तिथे खरकटी भांडी होती. त्या ताटांपैकी एक भले मोठे सोन्याचे ताट रावणाचे होते. त्यात सगळे पदार्थ चाटून पुसून संपवले होते, फक्त दह्याची वाटी स्वच्छ केली नव्हती. ती पाहता हनुमंताने ओळखले, की रावणाचा मृत्यू समीप आला आहे. 

या रामकथेवरून दह्याचे महत्त्व अधोरेखित होते. आणि रावणाचा मृत्यू समीप यासाठी म्हटलं आहे, कारण दह्याची नासाडी करणारी व्यक्ती मुजोर वृत्तीची असते. ती व्यक्ती आपल्याच कृत्याने ताण तणाव ओढवून घेते आणि तणावग्रस्त जीवन जगते. हनुमंताचे भाकीत खरे ठरले. रामावर विजय मिळवण्याचा ध्यास घेतलेल्या रावणाला मृत्यूला सामोरे जावे लागले. 

कुंडली दोष :

दही, दूध, तूप, लोणी, ताक हे वैभवाचे प्रतीक मानले जाते, त्याची नासाडी म्हणजे आपणच आपल्या कुंडलीत निर्माण केलेला दोष! ज्योतिष शास्त्रानुसार हे वैभव ज्या चंद्र देवतेच्या कृपेमुळे प्राप्त होते, ती देवता या कृतीमुळे रुष्ट होते, परिणामी कुंडलीत चंद्र दोष निर्माण होतो, आयुर्मान कमी होते आणि व्यक्ती तणावग्रस्त आयुष्य जगते. 

टॅग्स :Astrologyफलज्योतिषramayanरामायण