शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

Ashadhi Ekadashi 2022: १० जुलैपासून सुरू होणाऱ्या चातुर्मासात लग्न-मुंज यांसारखी शुभकार्ये का केली जात नाहीत? जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 11:36 IST

Ashadhi Ekadashi 2022: आषाढी एकादशीपासून कार्तिकी एकादशीपर्यंत चातुर्मास असणार आहे. तो संपल्यानंतर शुभकार्याची सुरुवात करण्यामागे नेमके काय कारण असावे? जाणून घ्या!

'चातुर्मास' हा कालावधी धर्मशास्त्रदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा म्हणून गणला जातो. केवळ धार्मिकदृष्ट्याच नव्हे तर आरोग्य, विज्ञान, अध्यात्म, संस्कृती, सामाजिक वातावरण इत्यादी सर्वचदृष्ट्या तो अत्यंत महत्त्वाचा समजण्यात येतो. विशेष म्हणजे या काळात काही गोष्टी अवश्य पाळाव्यात तर काही गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात असे सांगितले आहे. परमार्थाला पोषक गोष्टींचा विधी व प्रपंचाला मारक गोष्टींचा निषेध हे चातुर्मासाचे वैशिष्ट्य आहे. 

चातुर्मासाचा आरंभ आषाढी एकादशीस होऊन समाप्ती कार्तिक द्वादशीस होते. भौगालिकदृष्ट्या हा कालावधी बराच लक्षणीय स्थित्यंतराचा असतो. कारण पावसाळा असल्यामुळे धरणीचे रूप जसे बदललेले असते तसेच मानवाचे मानसिक रूपही बदललेले असते. देहातील पचनादी संस्थांचे कार्यही निराळ्या ढंगात चाललेले असते. अशावेळी त्यास अनुसरून कंद, वांगी, चिंचा इ. खाद्यपदार्थ टाळण्यास सांगितले आहेत. 

पावसाचा भर असल्यामुळे फारसे स्थलांतर घडत नाही. त्यामुळे चातुर्मास्य व्रत एका स्थानी राहूनच करावे असा प्रघात आहे. रुपकात्मकदृष्ट्या ब्रह्मदेवाचे नवसृष्टीनिर्मितीचे कार्य जोमाने चालू असते, तर पालनकर्त्या विष्णूचे कार्य मंदावलेले असते. म्हणूनच चातुर्मासात `विष्णूशयन' म्हटले जाते. आषाढ शुद्ध एकादशीला विष्णुशयन तर कार्तिक शुद्ध एकादशीनंतर म्हणजे द्वादशीला विष्णुप्रबोधोत्सव साजरा केला जातो. म्हणून चातुर्मासाच्या काळात विवाहाचा वा तत्सम अन्य कार्यांचा निषेध सांगितला आहे.

लग्नासारखा आयुष्याला कलाटणी देणारा विधी देवाब्राह्मणाच्या साक्षीने करावा, म्हणून देव विश्रांती घेत असतानाच्या काळात विवाह टाळला जातो. पण विवाहाचा निषेध असला तरी विवाहाची प्राथमिक तयारी, म्हणजे स्थळ पाहणे, प्राथमिक बोलणे करणे, साखरपुडा करणे या गोष्टींना हरकत नसते. त्यामुळे लग्न लांबणीवर गेले याचे दुःख न बाळगता चार महिन्यांनी खुद्द भगवंत दाम्पत्याला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहतील हा विचार आणि विश्वास आपण ठेवायला हवा. 

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशी