शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

एखाद्या घावाने तुम्हीही दुखावले आहात का?; खचू नका, कारण...

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: September 28, 2020 07:00 IST

अथक प्रयत्न करूनसुद्धा थोडक्यासाठी संयम गमावून बसतो. ज्या दगडावर सर्वात जास्त घाव पडतात, तीच मूर्ती जास्त रेखीव बनते.

ठळक मुद्देसंकटे म्हणजे छिन्नीचे घाव आहेत.संकटे तुम्हाला केवळ मॉडेल नाही, तर 'रोल मॉडेल' बनवणार आहेत. 

ज्योत्स्ना गाडगीळ 

त्रास प्रत्येकाला होत असतो. परंतु, कोणाची सहनशक्ती जास्त असते, तर कोणाची कमी. जो सहनशक्ती वाढवतो, तोच घडत जातो. म्हणूनच मराठीत वाक्प्रचार  आहे, 'टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देवपण येत नाही.' हेच गोष्टीतून पटवून देत आहेत, साधू गौर गोपाल दास...

एका मोठ्या शहराच्या मधोमध एक नामांकित वस्तुसंग्रहालय होते. त्या शहरातूनच नाही, तर जगभरातले पर्यटक त्या वस्तुसंग्रहालयाला भेट देत असत. संगमरवरी फरशीने आणि आरशांनी सजावट केलेले ते पांढरेशुभ्र वस्तुसंग्रहालय एखाद्या महालासारखे भव्य दिव्य वाटत असे. दर दिवशी हजारो लोक तिथे येत, तिथल्या वस्तुंचे कौतुक करत, फोटो काढत, भरभरून वर्णन करत. त्या संग्रहालयातली एक संगमरवरी मूर्ती सर्वांना आकर्षून घेत असे. खरे पाहता, त्या मूर्तीला पाहण्यासाठीच पर्यटकांची झुंबड होत असे. 

हेही वाचा: कोणतीही गोष्ट अशक्य नसते, ती प्रयत्नपूर्वक शक्य करावी लागते - गौर गोपाल दास

एके रात्री, ती मूर्ती सजीव झाली आणि बोलू लागली. तिच्या आवाजाने वस्तूसंग्रहालयाची पायरीसुद्धा बोलू लागली. दोघींमध्ये बराच वेळ संवाद झाला. शेवटी जाता जाता पायरीने आपले शल्य बोलून दाखवले. ती म्हणाली,

'तू आणि मी काही वेगळे नाही. आपण दोघी एकाच खाणीतून निघालो, एकाच हत्याराचे घाव होऊन, तोडमोड होत, एकाच ट्रकमधून इथवर आलो. परंतु, तुला मान मिळाला मूर्तीचा आणि मला मान मिळाला पायरीचा...! ही बाब मनाला अतिशय टोचत होती, तीच बोलून दाखवली. एकाच जातकुळीच्या असूनही लोक मला तुडवून जातात आणि तुला डोळेभरून पाहतात, हे सहन होत नाही.'

हेही वाचा: 'बँक ऑफ कर्मा'चे पासबुक रोज तपासा; पुण्य कमवा अन् त्याचं 'सेव्हिंग'ही करा!

यावर मूर्ती म्हणाली, `बरे झाले बोललीस. पण थोडा मागचा काळ आठवून पहा. इथे पोहोचेपर्यंत तू म्हणालीस त्याप्रमाणे दोघींचा प्रवास सारखाच झाला. परंतु नंतर, इथल्या शिल्पकाराने मूर्ती घडवण्यासाठी आधी तुझी निवड केली, तेव्हा छिन्नीचे काही घाव पडताच, तुझे तुकडे पडले. तेव्हा तू आणखी थोडी सहनशक्ती दाखवली असतीस, तर आज माझ्या जागी तू असतील. मी मात्र, ते घाव सहन केले. संयम राखला आणि आज लोकांच्या आकर्षणाचे केंद्र बनले.'

या गोष्टीतून आपल्या लक्षात येईल, की आपल्याही बाबतीत हेच घडते. अथक प्रयत्न करूनसुद्धा थोडक्यासाठी संयम गमावून बसतो. ज्या दगडावर सर्वात जास्त घाव पडतात, तीच मूर्ती जास्त रेखीव बनते. म्हणून, तुमच्या वाट्याला अनेक प्रकारची संकटे आली, तरी डगमगून जाऊ नका. संकटे म्हणजे छिन्नीचे घाव आहेत. तुमच्या आयुष्यातला अनावश्यक भाग छाटला जातोय, याचा आनंद बाळगा. अन्याय सहन करू नका, पण प्रसंगी अपमान पचवण्याची ताकद ठेवा. याच गोष्टी उद्या तुम्हाला केवळ मॉडेल नाही, तर `रोल मॉडेल' बनवणार आहेत. 

आता तुम्हीच ओळखा, आपली योग्यता 'पायरी' बनण्याची आहे, की 'मूर्ती'?

हेही वाचा : अर्जुनाने श्रीकृष्णावर दाखवला तसा आपला देवावर खरा विश्वास आहे का?... वाचा, एका छोट्या मुलीची गोष्ट