शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

घरातील दीर्घकाळ आजारपणाला वास्तुदोषही जबाबदार असू शकतात, करा 'हे' उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 12:59 IST

वास्तूशास्त्रानुसार घरात दीर्घकाळ आजारपण टिकण्याचे कारण घरातल्या वास्तुदोषांना जाते. ते वास्तुदोष दूर कसे करता येतील हे जाणून घेऊया. 

अनेकदा आपण आरोग्याची, आहाराची उचित काळजी घेऊनही घरात आजारपणाचा शिरकाव होतो. छोटे मोठी दुखणी प्रत्येकालाच होत असतात. परंतु जेव्हा एखाद्याचे आजारपण दीर्घकाळ जात नाही आणि त्या व्यक्तीची सेवा सुश्रुषा करून घरातील इतर सदस्यांना आजारपण येते, तेव्हा औषध उपचार यांबरोबरच वास्तुशास्त्रात दिलेले काही उपाय अवश्य करून पहा. 

वास्तूशास्त्रानुसार घरात दीर्घकाळ आजारपण टिकण्याचे कारण घरातल्या वास्तुदोषांना जाते. ते वास्तुदोष दूर कसे करता येतील हे जाणून घेऊया. 

तुमच्या राहत्या घराच्या किंवा इमारतीच्या समोर एखादा मोठा खड्डा असेल, तर तो आधी बुजवून घ्या. त्यामुळे घरातल्या सदस्यांना शारीरिक, मानसिक दुखणी उद्भ्वत राहतात. त्याचप्रमाणे घराच्या, इमारतीच्या समोरील मुख्य बाजूचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवावा. तो परिसर अस्वच्छ असल्यास तेही आजारपणाचे कारण बनते. 

वास्तूचा मध्यभाग रिकामा असायला हवा. त्याला वास्तूचे ब्रह्मस्थान म्हणतात. पूर्वीच्या काळी चौसोपी वाड्यात मधला भाग अंगणासारखा मोकळा असे. आताच्या काळात घरात तसे मोकळे अंगण करता आले नाही, तरी निदान त्या जागेवर जड सामान, फर्निचर, सोफासेट, टेबल या गोष्टी ठेवू नयेत. तेवढा भाग मोकळा ठेवला पाहिजे, अन्यथा वास्तुदोष निर्माण होतो, असे वास्तुशास्त्र सांगते. 

उत्तर पूर्व दिशा, ज्याला ईशान्य कोन म्हटले जाते, ती जागा भगवंताच्या वास्तव्याची समजली जाते. त्या दिशेला टॉयलेट किंवा शिडी असणे, वास्तुदोषाचे मोठे कारण मानले जाते. त्यामुळे घरात सतत आजारपण येते. महिलांना देखील शारीरिक व्याधी संभवतात. त्या दिशेला देवघर असणेच शुभ ठरते. परंतु आता त्यात बदल करणे शक्य नसेल, तर किमान घराचा प्रत्येक ईशान्य कोपरा स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करावा आणि आजारी व्यक्तीने ईशान्येकडे डोके करून झोपू नये. या नियमांचे पालन करावे. 

वास्तूमध्ये स्वयंपाकघर दक्षिण पूर्व अर्थात आग्नेय दिशेला असले पाहिजे. ती दिशा स्वयंपाकघराच्या दृष्टीने लाभदायक ठरते. परंतु तसे नसेल, तर घरातील सदस्यांमध्ये वारंवार आजारी पडण्याचे प्रमाण जास्त दिसते. विशेषतः घरातल्या कमावत्या व्यक्तीला त्याचा जास्त त्रास होतो. परंतु तुमचे स्वयंपाकघर आग्नेय दिशेला नसेल, तर जिथे स्वयंपाक घर आहे, त्या जागी भिंतींना ट्रॉली किचनला लाल रंग लावून घ्यावा. म्हणजे वास्तुदोष दूर होऊन सर्वांची तब्येत ठीक राहते. 

टॅग्स :Vastu shastraवास्तुशास्त्र