शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

Anger Control: तुम्हालाही खूप म्हणजे खूपच राग येतो का? 'या' औषधाचे चार थेंब सात दिवसात दाखवतील प्रभाव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2023 11:02 IST

Anger Management: रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी आजवर तुम्ही सगळे पर्याय वापरून बघितले असतील तर निवडा हा शेवटचा मार्ग!

सद्यस्थितीत सगळ्यात मोठा टास्क काय असेल तर तो म्हणजे रागावर नियंत्रण! हा प्रश्न आबाल वृद्धांना सतावतोय. कारण वयोगट कोणताही असो, आपण सगळेच आपल्या मनावरचा ताबा गमावून बसलो आहोत. रागवायचं नाही ठरवलं तरी नेमका जास्त राग येतो आणि राग नियंत्रणात येत नाही म्हणूनही राग येतो. अशा रागावर सापडलाय एक रामबाण तोडगा. त्याचे चार थेम्ब सात दिवसात तुमचा राग घालवतील, कसा ते पहा!

एका बाईला खूप राग येत असतो. ती सर्व उपाय करते. शेवटी एका साधू महाराजांना शरण जाते आणि त्यांना उपाय विचारते. साधू बाबा एक औषधाची बाटली देतात आणि राग आल्यावर त्यातल्या औषधाचे चार थेम्ब जिभेवर टाकायला सांगतात व म्हणतात, 'हे औषध घातल्यावर दहा मिनिटं अजिबात बोलू नका. सलग सात दिवस हा प्रयोग करा आणि मग तुमचा अनुभव सांगा.' 

त्या दिवसापासून बाईने प्रयोग सुरु केला आणि काय आश्चर्य! सात दिवसात तिचा राग आटोक्यात आला. ती साश्रू नयनांनी धावत साधू महाराजांकडे आली आणि तिने पायावर डोकं ठेवून विचारलं, 'महाराज नेमकं कोणतं चमत्कारिक औषध दिलंत, जेणेकरून माझा राग पूर्णपणे गेला? माझा स्वभाव कायमस्वरूपी बदलला. इतक्या वर्षांचं स्वप्न साकार झालं आणि आता मी खूपच तणावमुक्त जीवन जगू लागलेय.सांगा महाराज....'

महाराज म्हणाले, 'ताई, त्या औषधाच्या बाटलीत कोणतंही औषध नव्हतं तर साधं पाणी होतं! फक्त ते चार थेंब जिभेवर ठेवल्यानंन्तर दहा मिनिटं पाळलेलं मौन औषधासारखं प्रभावी ठरलं. त्या दहा मिनिटात राग निवळला आणि मनातल्या मनात रागाचा निचरा झाला आणि तुम्ही तणावमुक्त जीवन जगू लागलात!' 

तात्पर्य, रागाच्या वेळी पाळलेले मौन हा राग घालवण्याचा सर्वोत्तम आणि बिनखर्चिक पर्याय आहे. त्यामुळे पुढच्या वेळेस तुम्हाला राग आला तर पाण्याचे चार थेम्ब जिभेवर ठेवा आणि दहा मिनिटं मौन पाळा; औषधाची मात्रा तुम्हालाही लागू होईल हे नक्की!

टॅग्स :Mental Health Tipsमानसिक आरोग्यInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी