शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

Anger Control: तुम्हालाही खूप म्हणजे खूपच राग येतो का? 'या' औषधाचे चार थेंब सात दिवसात दाखवतील प्रभाव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2023 11:02 IST

Anger Management: रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी आजवर तुम्ही सगळे पर्याय वापरून बघितले असतील तर निवडा हा शेवटचा मार्ग!

सद्यस्थितीत सगळ्यात मोठा टास्क काय असेल तर तो म्हणजे रागावर नियंत्रण! हा प्रश्न आबाल वृद्धांना सतावतोय. कारण वयोगट कोणताही असो, आपण सगळेच आपल्या मनावरचा ताबा गमावून बसलो आहोत. रागवायचं नाही ठरवलं तरी नेमका जास्त राग येतो आणि राग नियंत्रणात येत नाही म्हणूनही राग येतो. अशा रागावर सापडलाय एक रामबाण तोडगा. त्याचे चार थेम्ब सात दिवसात तुमचा राग घालवतील, कसा ते पहा!

एका बाईला खूप राग येत असतो. ती सर्व उपाय करते. शेवटी एका साधू महाराजांना शरण जाते आणि त्यांना उपाय विचारते. साधू बाबा एक औषधाची बाटली देतात आणि राग आल्यावर त्यातल्या औषधाचे चार थेम्ब जिभेवर टाकायला सांगतात व म्हणतात, 'हे औषध घातल्यावर दहा मिनिटं अजिबात बोलू नका. सलग सात दिवस हा प्रयोग करा आणि मग तुमचा अनुभव सांगा.' 

त्या दिवसापासून बाईने प्रयोग सुरु केला आणि काय आश्चर्य! सात दिवसात तिचा राग आटोक्यात आला. ती साश्रू नयनांनी धावत साधू महाराजांकडे आली आणि तिने पायावर डोकं ठेवून विचारलं, 'महाराज नेमकं कोणतं चमत्कारिक औषध दिलंत, जेणेकरून माझा राग पूर्णपणे गेला? माझा स्वभाव कायमस्वरूपी बदलला. इतक्या वर्षांचं स्वप्न साकार झालं आणि आता मी खूपच तणावमुक्त जीवन जगू लागलेय.सांगा महाराज....'

महाराज म्हणाले, 'ताई, त्या औषधाच्या बाटलीत कोणतंही औषध नव्हतं तर साधं पाणी होतं! फक्त ते चार थेंब जिभेवर ठेवल्यानंन्तर दहा मिनिटं पाळलेलं मौन औषधासारखं प्रभावी ठरलं. त्या दहा मिनिटात राग निवळला आणि मनातल्या मनात रागाचा निचरा झाला आणि तुम्ही तणावमुक्त जीवन जगू लागलात!' 

तात्पर्य, रागाच्या वेळी पाळलेले मौन हा राग घालवण्याचा सर्वोत्तम आणि बिनखर्चिक पर्याय आहे. त्यामुळे पुढच्या वेळेस तुम्हाला राग आला तर पाण्याचे चार थेम्ब जिभेवर ठेवा आणि दहा मिनिटं मौन पाळा; औषधाची मात्रा तुम्हालाही लागू होईल हे नक्की!

टॅग्स :Mental Health Tipsमानसिक आरोग्यInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी