शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
2
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
3
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
4
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
5
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
6
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
7
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
8
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
9
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
10
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
11
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
12
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
13
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
14
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
15
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
16
IPL 2026 Retain and Released Player Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
17
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
18
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
19
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
20
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
Daily Top 2Weekly Top 5

Anger Control: तुम्हालाही खूप म्हणजे खूपच राग येतो का? 'या' औषधाचे चार थेंब सात दिवसात दाखवतील प्रभाव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2023 11:02 IST

Anger Management: रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी आजवर तुम्ही सगळे पर्याय वापरून बघितले असतील तर निवडा हा शेवटचा मार्ग!

सद्यस्थितीत सगळ्यात मोठा टास्क काय असेल तर तो म्हणजे रागावर नियंत्रण! हा प्रश्न आबाल वृद्धांना सतावतोय. कारण वयोगट कोणताही असो, आपण सगळेच आपल्या मनावरचा ताबा गमावून बसलो आहोत. रागवायचं नाही ठरवलं तरी नेमका जास्त राग येतो आणि राग नियंत्रणात येत नाही म्हणूनही राग येतो. अशा रागावर सापडलाय एक रामबाण तोडगा. त्याचे चार थेम्ब सात दिवसात तुमचा राग घालवतील, कसा ते पहा!

एका बाईला खूप राग येत असतो. ती सर्व उपाय करते. शेवटी एका साधू महाराजांना शरण जाते आणि त्यांना उपाय विचारते. साधू बाबा एक औषधाची बाटली देतात आणि राग आल्यावर त्यातल्या औषधाचे चार थेम्ब जिभेवर टाकायला सांगतात व म्हणतात, 'हे औषध घातल्यावर दहा मिनिटं अजिबात बोलू नका. सलग सात दिवस हा प्रयोग करा आणि मग तुमचा अनुभव सांगा.' 

त्या दिवसापासून बाईने प्रयोग सुरु केला आणि काय आश्चर्य! सात दिवसात तिचा राग आटोक्यात आला. ती साश्रू नयनांनी धावत साधू महाराजांकडे आली आणि तिने पायावर डोकं ठेवून विचारलं, 'महाराज नेमकं कोणतं चमत्कारिक औषध दिलंत, जेणेकरून माझा राग पूर्णपणे गेला? माझा स्वभाव कायमस्वरूपी बदलला. इतक्या वर्षांचं स्वप्न साकार झालं आणि आता मी खूपच तणावमुक्त जीवन जगू लागलेय.सांगा महाराज....'

महाराज म्हणाले, 'ताई, त्या औषधाच्या बाटलीत कोणतंही औषध नव्हतं तर साधं पाणी होतं! फक्त ते चार थेंब जिभेवर ठेवल्यानंन्तर दहा मिनिटं पाळलेलं मौन औषधासारखं प्रभावी ठरलं. त्या दहा मिनिटात राग निवळला आणि मनातल्या मनात रागाचा निचरा झाला आणि तुम्ही तणावमुक्त जीवन जगू लागलात!' 

तात्पर्य, रागाच्या वेळी पाळलेले मौन हा राग घालवण्याचा सर्वोत्तम आणि बिनखर्चिक पर्याय आहे. त्यामुळे पुढच्या वेळेस तुम्हाला राग आला तर पाण्याचे चार थेम्ब जिभेवर ठेवा आणि दहा मिनिटं मौन पाळा; औषधाची मात्रा तुम्हालाही लागू होईल हे नक्की!

टॅग्स :Mental Health Tipsमानसिक आरोग्यInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी