शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 18:17 IST

Akshaya Tritiya 2025: ३० एप्रिल रोजी अक्षय्य तृतीया आहे, त्यानिमित्त सोने दान करणे शक्य नाही, निदान पुढील वस्तूंचे दान करा आणि भरघोस पुण्य कमवा. 

जे देतो ते दुपट्टीने परत मिळते, हा निसर्गाचा नियम आहे. मग तो आनंद असो वा दुःख! जे पेराल ते उगवेल! म्हणूनच आपल्याकडे सण उत्सवाच्या निमित्ताने दान धर्म करा असे सांगितले जाते. जेणेकरून तुम्ही जेवढे द्याल ते दुपटीने तुम्हाला परत मिळेल. अक्षय्य तृतीयेला तर दानाचे महत्त्व अधिकच!

या वर्षी अक्षय्य तृतीया(Akshaya Tritiya 2025) ३० एप्रिल रोजी आहे. या दिवशी सोने दान करणे हे मोठे पुण्यकर्म मानले जाते, परंतु आजच्या महागाईच्या काळात  एक लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे सोने दान करणे जवळजवळ अशक्य आहे. अशा परिस्थितीत काही वस्तूंचे दान शास्त्रात सुवर्णदान मानले जाते. चला तर, अक्षय्य तृतीयेला कोणत्या ५ वस्तू दान कराव्यात ते जाणून घेऊया.

अन्नदान : अक्षय्य तृतीयेला धान्य दान करणे हे खूप पुण्यपूर्ण मानले जाते. शास्त्रांमध्ये, भुकेल्या व्यक्तीला अन्न देणे हे सर्वात मोठे पुण्य मानले जाते. पौराणिक कथांनुसार ज्या व्यक्तीने त्याच्या आयुष्यात अन्नदान केले त्याला स्वर्गलोकाचीच नव्हे तर मोक्ष प्राप्ती मिळाली असे उल्लेख आहेत. त्यामुळे अन्नदानाला अतिशय महत्त्व आहे. अक्षय्य तृतीयेला आपल्या घरी नैवेद्याचे ताट केल्यावर देवाला आणि एखाद्या गरजू व्यक्तीला, कुटुंबाला अन्नदान नक्की करा. 

गूळ : अक्षय्य तृतीयेला गुळाचे दान करणे खूप शुभ मानले जाते. शास्त्रांनुसार, गूळ दान केल्याने व्यक्तीचे नशीब उज्ज्वल होते. कारण सूर्यदेवाच्या कृपेने जीवन उजळून निघते. शास्त्रांमध्ये गूळ दान करणे हे सोन्याचे फळ दान करण्यासारखे पुण्यकारक मानले जाते.

जलदान : पाण्याला जीवन म्हणतात. पाण्याशिवाय जीवन शक्य नाही. अक्षय्य तृतीया हा सण ऐन उन्हाळ्यात येत असल्याने मनुष्य असो वा प्राणी, पक्षी पाण्याने प्रत्येक जीव व्याकुळ होणारच! म्हणून अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने तुम्ही मातीच्या भांड्यात पाणी भरून ते पात्र गरजूंना दान करू शकता.

खडे मीठ : अक्षय्य तृतीयेला सैंधव मीठ दान केल्याने पुण्य मिळते. कारण सैंधव मीठ भौतिक सुखसोयींचा स्वामी शुक्र ग्रहाशी संबंधित आहे. मीठ समुद्रातून मिळते, म्हणून मीठ देवी लक्ष्मीशी देखील संबंधित आहे. मीठ हा अन्नपदार्थातला मूलभूत घटक असल्यामुळेही त्याचे महत्त्व लक्षात घेतले पाहिजे. यासाठी मीठाचे दान करावे. दुसऱ्यांच्या आयुष्यात सुख, समृद्धी यावी म्हणून दान केलेले मीठ तुमच्याही आयुष्यात समृद्धी आणेल हे नक्की!

वस्त्रदान : अक्षय्य तृतीयेला वस्त्र दान करणे देखील खूप शुभ मानले जाते. कपडे ही मूलभूत गरजांपैकी एक मानली जाते. एखाद्या गरजू व्यक्तीला लज्जारक्षणासाठी वस्त्र दान केल्याने सोने दान केल्यासारखेच फायदे मिळतात. म्हणून अक्षय्य तृतीयेला विशेषतः पिवळ्या रंगाचे वस्त्र दान करा असे सुचवले जाते. 

टॅग्स :Akshaya Tritiyaअक्षय्य तृतीया