शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
3
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
4
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
5
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
6
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
7
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
8
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
9
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
10
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
11
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
12
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
13
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
14
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
15
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
16
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
17
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
18
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
19
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
20
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

आनंदाला छळणारी पीडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2024 08:02 IST

आनंद हा निरंतर उपलब्ध आहे; आपण मात्र त्याचे काळाप्रमाणे तुकडे करतो.

खरे तर आनंद ही मनुष्यात फुलाप्रमाणे उमलणारी सहज प्रक्रिया आहे. असे असूनही मनुष्य आनंद शोधण्याच्या नादात तणावग्रस्त होऊन बसतो. आपण महिनाभर काम करून श्रमाचा मोबदला मिळवून आनंदी होणारे आहोत. हे श्रम अधिकार जन्माला घालतात. जिथे अधिकार जन्माला येतो, तिथे आनंदाचा केवळ आभास वाट्याला येतो. आभासाचे वय शाश्वताकडे न सरकता क्षणभंगुराकडे सरकते. झाडाची सावली आणि शीतलता तशी नित्यत्वानेच उपलब्ध असते; आपण मात्र उन्हात राबराब राबून त्यानंतरच गार वाऱ्याचा आनंद घेतो. आनंद हा निरंतर उपलब्ध आहे; आपण मात्र त्याचे काळाप्रमाणे तुकडे करतो. 'अमुक केल्याशिवाय तमुक होणारच नाही' ही भाषा आपल्याला तणावात ढकलते. तणाव जन्माला येण्याचे मुख्य कारण हेच आहे, की आपण आनंदाऐवजी त्याच्या कारणांनी आनंदी होतो. कारणं आली की त्यांचा काळ जन्माला येतो. एकदा आनंद काळात ढकलला, की त्यानंतर तो आपोआपच तणावात बदलतो. इथे प्रत्येक महत्वाची गोष्ट तिच्या गतीत आनंद देणारी आहे. या गतीवर आपल्या गतीचे टार्गेट लादले की आनंद पीडेत बदलतो.

आपला श्वास एका मिनिटात पंधरा फेऱ्या घालतो. या फेऱ्या कमीअधिक झाल्या तर त्यातून लगेच दुःख, रोग जन्माला येतो. आपल्या नाडीच्या ठोक्यांच्या गतीवर आपण आपली गती लादत नाही. जिथे नैसर्गिक गती आपोआप राखली जाते आहे, तिथे अस्तिवाचा आनंद प्रसन्नतेचा शिडकावा करतो. जिथे या नैसर्गिक गतीवर माणसाची कृत्रिम गती स्वार होते, तिथे मात्र हा बेलगाम घोडा आपल्याला खड्ड्यात घातल्याशिवाय राहात नाही. कोणत्याही विषयातली 'विश्रांती' हीच त्या विषयातून आनंद जन्माला घालत असते. आपण घाई, अज्ञान, स्पर्धा, नैपुण्य, ध्येय अशा असंख्य कारणांनी या विश्रांतीला सतत छेडत राहतो; परिणामी आनंदाचे सगळे उद्योग घोर पीडेत बदलतात. इथे कोणतेही पशुपक्षी स्वतःच्या आनंदाला कधीही छेडत नाहीत. आपण मात्र आपल्या मानगुटीवर बसलेला काळ आनंदाच्या मानगुटीवर बसवतो. यशाच्या चुकीच्या संकल्पना डोक्यावर बसल्याने ही 'आनंदाला छळणारी पीडा' संपायचे नावच घेत नाही. याचा शेवटचा परिणाम असा होतो, की आपला आनंदावरचा विश्वास कायमचा उडून जातो, आणि काळातून जन्माला आलेला मृत्यू नामक भ्रम शाश्वत होऊन बसतो.

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशीashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022