शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
2
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
3
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
4
विशेष लेख | फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण: आफ्टर डेथ पॉलिटिकल स्टोरी !
5
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल
6
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
7
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
8
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब
9
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
10
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
11
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
12
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
13
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
14
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
15
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
16
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
17
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
18
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
19
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
20
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान

Adhik Maas 2023: देवपूजा असो नाहीतर नैवेद्य, त्यात साजूक तुपाचा वापर करणे आरोग्यासाठी हितकारक का ठरते? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2023 14:43 IST

Health Care: अधिक मास आणि पाठोपाठ येणाऱ्या श्रावण मासात साजूक तुपाचाचाच वापर का केला पाहिजे ते जाणून घ्या!

वास्तविक नुसत्या देवकार्यातून व पितृकार्यातून घट्ट वनस्पती तुपाचा निषेध मानला गेला आहे असे नव्हे तर हा निषेध सर्वकालीन आहे. वास्तव अर्थाने घट्ट वनस्पती तेलापासून तयार करण्यात येणारा पदार्थ 'तूप' या नावाला कदापिही पात्र होऊ शकत नाही. त्याची निषिद्धता केवळ धार्मिक दृष्ट्याच आहे असे नाही. कारण धर्मात जे जे निषिद्ध मानले गेलेले असते, ते बहुतेक वैज्ञानिक व वैद्यकीय दृष्ट्याही निषिद्ध असतेच. 

घट्ट वनस्पती तुपाचा पहिला गुणधर्म म्हणजे त्यावर एका विशिष्ट वायूची प्रक्रिया करून ते घट्ट बनवण्यात आलेली असते. त्याचे द्रवात रुपांतर होण्यासाठी सामान्यत: १०८ फॅरनहॅट इतकी उष्णता लागते. माणसाचा जास्तीत जास्त ताप १०५ ते १०६ पर्यंत जाऊ शकेल. पण १०८ पर्यंत कधीच जाऊ शकत नाही. म्हणजे घट्ट वनस्पती तूप वितळवून द्रवरूपात आणले व ते पोटात गेले तरी पुन्हा थोडेफार घन अवस्थेत जाते असे सिद्ध होते आणि हा घन अवस्थेतील पदार्थ आतड्याच्या आतील सुरकुत्यांवर साचून त्याचा खडबडीतपणा कमी होते व पचनक्रिया मंदावते. म्हणून असे तूप खाणाऱ्या व्यक्तींना अग्निमांद्य विकाराला बळी पडावे लागते.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा पदार्थ नुसत्या शुद्ध शेंगतेलापासून केल्यास त्यावर वायुप्रक्रिया तितकीशी परिणामकारकरित्या होऊ शकत नाही. म्हणून त्यात प्राण्यांची चरबी मिसळावी लागते. अर्थात या चरबीतील अशुद्धांश पूर्णपणे काढलेला असतो. घट्ट वनस्पती तूपासाठी गायीच्या चरबीइतका सुयोग्य पदार्थ कोणताही नाही. म्हणजे पर्यायाने घट्ट वनस्पती तूप म्हणजे तेल आणि चरबी यांचे मिश्रण होय. देव पितृ कार्यालाच नव्हे तर कोणत्याही कार्याला चरबीयुक्त पदार्थ निषिद्ध होणे अपरिहार्य ठरते. 

तिसरी गोष्ट म्हणजे हे घट्ट वनस्पती तूप साजूक तुपापेक्षा स्वस्त म्हणून त्याचा जास्त प्रमाणात वापर केला जातो. पण प्रयोगांती असे सिद्ध झाले आहे की, एकाच आकाराच्या पुऱ्या साजूक तुपात शंभर होत असतील तर घट्ट वनस्पती तुपात फक्त ऐंशी होतात. म्हणून तळप माध्यम म्हणूनही त्याचा उपयोग करताना स्वस्ताईचा निकष लावता येत नाही.. 

चौथी गोष्ट म्हणजे परदेशीय शास्त्रज्ञांना असे आढळून आले आहे की, हृदयरोगाच्या विविध प्रकारांपैकी एक प्रकार असा आहे, की हृदयाकडे येणाऱ्या रक्तवाहिन्यात एखादा घट्ट कण अडकून बसतो व रक्तपुरवठा बंद पडतो. हा कण वायुप्रक्रिया केलेल्या चरबीतून जाण्याची शक्यता अधिक असते. याखेरीज काही संशोधकांना उंदरावर प्रयोग करता असेही आढळून आले आहे, की उंदराच्या सलग पिढ्यांना घट्ट वनस्पती तूप खाऊ घातले असता, जवळपास सातवी पिढी दृष्टीबधीर होते. 

अशा अनेक कारणांनी त्याज्य ठरलेले घट्ट वनस्पती तूप धर्मशास्त्रात निषिद्ध मानले तर त्यात नवल नाही. घट्ट वनस्पती तूप खाण्यात आणि होमातही वापरू नये. त्याऐवजी दोनदा गाळून स्वच्छ केलेल शेंगदाण्याचे, करडईचे तेल वापरावे. 

टॅग्स :Adhik Maasअधिक महिनाHealthआरोग्यfoodअन्नShravan Specialश्रावण स्पेशल