शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
2
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
3
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
4
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
5
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
6
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
7
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
8
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
9
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
10
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
11
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
12
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
13
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
14
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
15
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
16
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
17
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
18
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
19
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
20
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 

Adhik Maas 2020: अधिक महिन्यात कोणते संकल्प करावेत?; काय आहे महत्त्व?... जाणून घ्या

By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: September 21, 2020 2:57 PM

Adhik Maas 2020: प्रेम आणि प्राप्ती या दोन्ही गोष्टी मागून मिळत नसतात. त्यासाठी समर्पण असावे लागते. मनापासून केलेला संकल्प निश्चित पूर्ण होतो आणि त्याचे फळही मिळते. 

ठळक मुद्दे२१ सप्टेंबर २०२० रोजी वैधृति योग आहे. या वैधृति पर्वात तिळाचे सोळा लाडू, केळी, फळे, खारका, सुपाऱ्या, सोळा संख्येत दान कराव्यात. सोमवारी शिवामूठ वाहणे, कोरडा शिधा दान करणे, एखाद्या ग्रंथालयाला, धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक संस्थांना यथाशक्ती आर्थिक मदत करणे, घरातल्या बाळकृष्णाला किंवा श्री विष्णूंच्या तसबिरीला एक तुळशी दल वाहणे, पांढरे फुल वाहणे, उपास्य देवतेचा जप करणे, इ. संकल्प ज्या गोष्टींची आपल्याला सहज पूर्तता करता येईल, अशाच गोष्टींचा संकल्प करावा.

ज्योत्स्ना गाडगीळ. 

पुण्यसंचयासाठी उत्तम कालखंड मानला जाणारा अधिक महिना १८ सप्टेंबरपासून सुरू झाला असून १६ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. अधिक मासात अधिक फलप्राप्तीसाठी आपण हर तऱ्हेचे प्रयत्न करतो. त्यात पूजेइतकेच महत्त्व असते, संकल्पाला. मात्र, संकल्प करण्याआधी किंवा संकल्प सोडण्याआधी, त्याचा अर्थ काय आणि तो कोणकोणत्या प्रकारे केला जातो, ते जाणून घेऊया. 

शपथ आणि संकल्प यातील फरक :

हाती घेतलेले कोणतेही कार्य सिद्धीस जावे, म्हणून आपण संकल्प करतो. संकल्प स्वेच्छेने केला जातो. याउलट शपथ, स्वेच्छेने किंवा अनिच्छेने घेतली जाते. शपथ पूर्ण करताना येणाऱ्या अडचणी जाचक वाटतात, तर संकल्प पूर्ण करताना येणाऱ्या अडचणी आव्हानात्मक वाटतात. शपथ रागाच्या भरात घेतली जाऊ शकते, मात्र संकल्प हा चांगले कार्य तडीस नेण्यासाठीच केला जातो. म्हणून अधिक मासाच्या वेळी धार्मिक अनुष्ठान मांडले असता, यथाशक्ती संकल्प पार पाडले जातात. 

हेही वाचाः तन्नो विष्णू: प्रचोदयात।; श्री विष्णूंचे पाच श्लोक ठरतील पुण्यफलदायी

संकल्प करत असताना म्हणायचा श्लोक :

सङकल्पमूल: कामो वै यज्ञा: सङकल्पसम्भवा:।व्रता नियमधर्माश्च सर्वे सङकल्पजा: स्मृता।।

अर्थ : आपल्या ईच्छा पूर्ण व्हाव्यात, या हेतूमधून संकल्पाचा उगम झाला. सर्व यज्ञ संकल्पानंतर संपन्न होतात, त्याचप्रमाणे सर्व व्रते, नियम व धर्म संकल्पातून निर्माण होतात. संकल्पाच्या वेळी देवतेचा उच्चार केल्यामुळे देवता सुक्ष्म रूपाने उपस्थित होतात व संकल्प तडीस नेण्यास मदत करतात. 

संकल्प कधी करतात?

अनेक दिवस चालणारे गुरुचरित्र, भागवतसप्ताह, चण्डी, अथर्वशीर्ष, शिवकवच इ. अनुष्ठाने आरंभ करण्यापूर्वी संकल्प सोडले जातात. संकल्प सोडण्याच्या वेळी सोडण्यात येणाऱ्या पाण्याला 'उदक' म्हणतात. उदकसेवनावाचून झालेला संकल्प व्यर्थ असतो, असे म्हणतात. नित्यसंकल्पात 'संकल्पोक्त फलवाप्यते, संकल्पोक्तसंख्यापरिपूर्तये' असे म्हटले जाते. 

हेही वाचाः देवाकडे काय मागितलं, तर सगळे प्रश्न सुटतील?... सांगताहेत सद्गुरू वामनराव पै

अधिक मासात कोणकोणते संकल्प करता येऊ शकतात?

चार्तुमासात, श्रावणी सोमवारी आपण जे संकल्प करतो, त्याचीच पुनरावृत्ती अधिक मासात केली तरी चालते. त्यासाठी वेगळ्या संकल्पांचे आयोजन करण्याची गरज नाही. मूळात, फार कठीण संकल्प करू नयेत. ज्या गोष्टींची आपल्याला सहज पूर्तता करता येईल, अशाच गोष्टींचा संकल्प करावा, म्हणजे तो सिद्धीस नेता येतो. 

जसे की, दर सोमवारी शिवामूठ वाहणे, कोरडा शिधा दान करणे, एखाद्या ग्रंथालयाला, धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक संस्थांना यथाशक्ती आर्थिक मदत करणे, घरातल्या बाळकृष्णाला किंवा श्री विष्णूंच्या तसबिरीला एक तुळशी दल वाहणे, रोज एखादे पांढरे फुल वाहणे, उपास्य देवतेचा जप करणे, इ. गोष्टींचा आपण संकल्प करू शकतो. 

२१ सप्टेंबर २०२० रोजी वैधृति योग आहे. या वैधृति पर्वात तिळाचे सोळा लाडू, केळी, फळे, खारका, सुपाऱ्या, सोळा संख्येत दान कराव्यात. 

प्रेम आणि प्राप्ती या दोन्ही गोष्टी मागून मिळत नसतात. त्यासाठी समर्पण असावे लागते. मनापासून केलेला संकल्प निश्चित पूर्ण होतो आणि त्याचे फळही मिळते. 

भगवान श्रीकृष्णाची तुला करत असताना, त्यांची प्रिय पत्नी सत्यभामा हिने तिजोरीतले सर्व धन पारड्यात टाकले, तरी श्रीकृष्णाचे पारडे वर जात नव्हते. तेव्हा अत्यंत भक्तीभावाने रुक्मिणीने एक तुळशीचे पान धनाची राशी असलेल्या पारड्यात ठेवले आणि कृष्णाचे पारडे वर झाले. या कथेवरून लक्षात येते, भक्तीभावाने वाहिलेली कोणतीही गोष्ट, कोणताही संकल्प भगवंतापर्यंत पोहोचतो. फक्त त्यासाठी शुध्द भक्ती, शुद्ध आचरण आणि शुद्ध मनाने संकल्प करायला हवा.

टॅग्स :Adhik Maasअधिक महिना