शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
2
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
3
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
4
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
5
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
6
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
7
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
8
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
9
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
10
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
11
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
12
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
13
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
15
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
16
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
17
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
18
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
19
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
20
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

Adhik Maas 2020: अधिक मासात करावे दीपदान, जग करूया प्रकाशमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2020 7:30 AM

Adhik Maas 2020: एक दिवा सहस्त्र दिवे प्रज्वलित करू शकतो. माणसाने त्याच्याकडून प्रेरणा घ्यावी, हा दीपदानाचा आणि दीपदर्शनाचा हेतू.

ठळक मुद्देअधिक मासात भगवान महाविष्णूंच्या पूजनार्थ दीपदान केले जातेज्या व्यक्तीला दान देत आहोत, ती व्यक्ती विष्णू-कृष्ण स्वरूप मानून नमस्कार करावा आणि त्यांचा आशीर्वाद घ्यावा. 

ज्योत्स्ना गाडगीळ 

रोज सायंकाळी देवापाशी आणि तुळशीपाशी दिवा लावण्याचा आपल्याकडे प्रघात आहे. हा दिवा देवाच्या गाभाऱ्यात उजेड पडावा म्हणून नाही, तर आपल्या मनातील अंधार दूर व्हावा, यासाठी लावला जातो. अधिक मासात भगवान महाविष्णूंच्या पूजनार्थ दीपदान केले जाते आणि 'अंतरीचा ज्ञानदीप मालवू देऊ नको रे' अशी प्रार्थना केली जाते. 

हेही वाचा: Adhik Maas 2020: स्वस्तिक चिन्ह काढा दारी, भगवान विष्णू येतील घरी

दिव्याचे महत्त्व काय आहे?

एक दिवा सहस्त्र दिवे प्रज्वलित करू शकतो. माणसाने दिव्याकडून प्रेरणा घेऊन मी प्रकाशित होईन आणि दुसऱ्यांनाही प्रकाशित करीन. माणसानेही जगातील अंधार हटविण्यासाठी, अज्ञान दूर करण्यासाठी तसेच दैवी विचारांचा प्रकाश पसरविण्यासाटी अखंड जळत राहिले पाहिजे, अशी जीवनदीक्षा दीपक आपल्याला देतो. सतत तेवत्या दिव्याप्रमाणे मनुष्यानेही प्रभूकार्यासाठी सतत प्रकाशित राहिले पाहिजे. श्रीविष्णूंच्या सेवार्थ दीपदान करून आपण आपल्या विहित कार्याचा कायम आठव ठेवला पाहिजे. 

दीपदान कसे करावे :

पुराणात दीपदानाचे वर्णन केले आहे. अधिकमासात पहाटे लवकर उठावे. शितल जलाने स्नान करावे. घरातल्या देवांची पूजा करावी. ज्या जागेवर दीपपूजा करायची ती जागा सारवून किंवा स्वच्छ पुसून घ्यावी. त्यावर सुंदरशी रांगोळी काढावी, पाट किंवा चौरंग मांडावा, त्यावर रंगीत वस्त्र अंथरावे, पाट किंवा चौरंगावरील वस्त्रावर यथाशक्ती गहू किंवा तांदळाची रास ठेवावी. त्यावर हळदीकुंकवाची बोटे लावलेला, पाण्याने भरलेला, आम्रपल्लव किंवा विड्यांच्या पानांने सुशोभित केलेला एक कलश त्या धान्याच्या राशीवर ठेवावा. कलशामध्ये विड्याची दोन पाने, सुपारी व एखादे नाणे ठेवावे. कलशावर ताम्हन ठेवून, त्या ताम्हनात तांब्याचा किंवा धातूचा एक दिवा ठेवावा. हा दिवा शक्यतो तुपाचा असावा. कलशापुढे गणेशाची सुपारी मांडवी, शक्य असेल तर त्या कलशासमोर राधा-कृष्णाची प्रतिमा किंवा लक्ष्मीनारायणाची मूर्ती ठेवावी. सोबत उदबत्ती, निरांजन आणि घंटा ठेवावी. उपासकाने शुचिर्भूत होऊन चौरंगासमोरील पाटावर बसावे. कुलदेवतेचे, माता पिता, गुरु यांचे स्मरण करावे, चौरंगाजवळच निरंजन अथवा समई लावून घ्यावी. मग आचमन करून दीपपूजन आणि दीपदानाचा संकल्प करावा. मग श्रीगजाननाचे, कलशाचे, समईचे, घंटेचे पूजन करावे. कलशावरील ताम्हनात जो दीप प्रज्वलित करून ठेवलेला आहे, त्या दीपाची भक्तिभावाने षोडशोपचारे पूजा करावी. अशी पूजा केलेला तो दीप गरजू व्यक्तीला दान करावा. त्यासोबत वस्त्र, पात्र, तेहतीस अनारसे इत्यादी वस्तू द्याव्यात. तसेच मिठाई, तांबूल विडा व दक्षिणा द्यावी.  ज्या व्यक्तीला दान देत आहोत, ती व्यक्ती विष्णू-कृष्ण स्वरूप मानून नमस्कार करावा आणि त्यांचा आशीर्वाद घ्यावा. 

दीपदान करताना म्हणावयाचा श्लोक:

आज्यं च वर्तिसंयुक्तं वन्हिना योजितं मया,दीपं गृहाण देवेश त्रैलोक्यतिमिरापह।।

त्रैलोक्याचा अंधार दूर करणाऱ्या हे देवाधिदेवा पुरुषोत्तमा, या दिव्याचा तू स्वीकार कर आणि आमच्या आयुष्यातील अंधार दूर कर.

हेही वाचा: Adhik Maas 2020: अधिक मासात विवाहित मुली भरतात, आईची ओटी

टॅग्स :Adhik Maasअधिक महिना