शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

ऋषी मुनींसारखे निरोगी दीर्घायुष्य मिळवणे आपल्या हातात आहे; त्यासाठी करा 'हे' उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 14:40 IST

निरोगी, दीर्घायुष्य मिळावं ही सर्वांचीच अपेक्षा असते, मात्र त्यासाठी सोपा आणि बिनखर्चिक उपाय आपण करत नाही. त्याची सुरुवात करा.

नैसर्गिक रित्या अहोरात्र म्हणजे २४ तासांत २१,६०० वेळा श्वासोच्छ्वास करतो. त्या श्वासोच्छ्वासातही शीतकाल उष्णकाल यांस अनुसरून डाव्या व उजव्या बाजूने विशिष्ट नैसर्गिक शास्त्रीय व्यवस्थेनुसारच श्वासोच्छ्वास होत असतो. ईश्वराने नाकाला दोन छिद्रे ठेवली आहेत. त्यामागे शास्त्रीय हेतू आहेत. एवढ्या मोठ्या मानवपिंडावर एक केससुद्धा अनावश्यक वा निर्हेतुक नाही. संपूर्ण प्राण ज्या श्वासप्रक्रियेवर अवलंबून आहे, तो श्वासोच्छ्वास ज्या नाकाने व्हावयाचा त्या नाकाची रचनाही ईश्वराने शास्त्रीय केली आहे. 

षट्शतानि दिवारात्रौ सहस्राण्येकविशति:एतत्संख्यात्मकं मैत्रं जीवो जपति सर्वदा।

म्हणजेच दिवसभरात मानव २१,६०० वेळा `सोऽहम' शब्दाचा जप करत असतो, तितक्या वेळा त्याची श्वसनक्रिया होत असते. योगशास्त्रानुसार नाकाच्या डाव्या पुडीला सूर्य व उजवीला चंद्र असे नाव दिले गेले आहे. डाव्या नाकपुडीत इडा नाडी व उजव्या नाकपुडीत पिंगला नाडी आहे. सूर्य पुडीने श्वास घेतल्यास उष्णता व चंद्रनाडीने श्वास घेतल्यास थंडी फुप्फुसात प्रविष्ट हाटे. आज आपणास हे माहितीही नाही की कधी कोणत्या नाकपुडीने श्वास घ्यावा. परंतु आपले पूर्वज दिवसातून तीन वेळा या श्वसनप्रक्रियेची साधना करत असत. या श्वसनप्रक्रियेचे धार्मिक नाव `संध्या' असे आहे. संध्येत प्राणायाम हे मुख्य व परमलाभक असे तत्त्व आहे. या श्वस क्रियेच्या साधनेत आयुष्यवृद्धि होते व ही साधना आपल्या हातात आहे. 

ऋषयो दीर्घसन्ध्यात्वात दीर्घमायुरवाप्नुयु:।

हे मनूचे वचन वर आलेच आहे. ऋषींच्या दीर्घायुष्याचे रहस्य संध्येतच आहे, असा या वचनाचा आशय आहे.योग शास्त्राने प्राणायामाचा व श्वासप्रक्रियेचा खोल अभ्यास केला. ही श्वसनक्रिया निरनिराळ्या अवस्थेत निरनिराळी असते. 

स्थितस्य द्वादश श्वासाश्चलतोऽष्टादश स्मृता:।चतुर्विशति सुप्तस्य, त्रिशद ग्राम्ययरतस्य च।।

मनुष्य बसला असता १२, चालताना १८, झोपलेला असताना २४, विषय सेवनाचे वेळी ३० असे दर मिनिटांच्या हिशोबात श्वास घेतो. याचा अर्था त्या त्या अवस्थेत श्वास अधिक प्रमाणात खर्ची पडतात. म्हणजेच तितक्या प्रमाणात मानवाचे आयुष्य अधिक झपाट्याने नष्ट होते. शरीराचे व्याप तर चालूच राहणार आणि हा आयुष्य नाशही असाच होत राहणार. तरीसुद्धा त्या अवस्थेत होणारा ऱ्हास टाळण्यासाठी श्वासांचा निरोध करून त्याची भरपाई करणे आवश्यक आहे. इतकेच नव्हे तर ही भरपाई करूनही मूळातील २१६०० श्वासातूनही काही वाचवले तर अधिक चांगले. यासाठीच श्वासनिरोधरूप `प्राणायाम' त्यावर उत्तम उपाय म्हणून शास्त्रकारांनी आपल्यापुढे ठेवला आहे. 

ईश्वराने दिलेली श्वाससंख्या म्हणजे आयष्य. दिलेली श्वास संख्या प्राणायामाने दीर्घकाळ वापरता येते. आयुष्य वाढवणे आपल्या हाती आहे.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्स