शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

विदुर नीतीनुसार पुरुषार्थ कोणत्या चार गोष्टींमध्ये आहे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2021 08:00 IST

विदुर नीती प्रमाणे या चार गोष्टी लक्षात आचरणात आणून मानाने जगू शकतो. 

महाभारतातील धृतराष्ट्र यांचे अमात्य विदुर यांचे विचार विदुरनीती म्हणून ओळखले जातात. एका अध्यायात त्यांनी पुरुषार्थ जपावा कसा याचे मार्गदर्शन केले आहे. ते एका श्लोकात म्हणतात-

क्रोधो हर्षश्च दर्पश्च ह्रीः स्तम्भो मान्यमानिता।यमर्थान्नपकर्षन्ति स वै पण्डित उच्यते।। 

सामान्य व्यक्ती ज्या कारणांमुळे असामान्य पदाला जाते, त्या तत्त्वाला पुरुषार्थ म्हणतात. तो जपण्यासाठी मनुष्याला आपल्या स्वभावावर आणि वागणुकीवर नियंत्रण मिळवावे लागते. त्या चार बाबी कोणत्या, तर विदुर सांगतात, रागाच्या भरात आणि आनंदाच्या भरात चुकीचे निर्णय घेतले जातात. ज्याला या चुका टाळायच्या असतील, त्याने मनावर नियंत्रण ठेवून सम दुःख सुखक्षमी अर्थात सुख आणि दुःखात एकसारखी तटस्थ स्थिती ठेवण्याची कला आत्मसात केली पाहिजे. 

ह्रीः अर्थात नम्रता. विनम्र व्यक्तीचे काम कधीच अडत नाही. याउलट अहंकारीत व्यक्ती सगळे काही गमावून बसते. म्हणून स्वभावात नम्रपणा आणून आपले काम करवून घेण्याचे कसब अंगी बाणले पाहिजे. परंतु यासाठी लाचारी पत्करणे योग्य नाही. लाचार व्यक्ती कोणत्याही क्षणी लाथाडली जाऊ शकते. जे काम नम्रपणे होऊ शकते ते खुशमस्करी करून पदरात पाडून घेणे योग्य नाही. 

स्वतःबद्दल आत्मविश्वास जरूर बाळगावा, परंतु दुराभिमान नको. स्वतःला श्रेष्ठ समजणे योग्य नाही. मी म्हणेन ती पूर्व असे म्हणत राहिलो तर आपोआप इतरांबद्दल कमीपणा वाटून स्वतः मधील अहंकाराला खतपाणी घातले जाईल. ते टाळले पाहिजे. यासाठी स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवा, स्वतःला कमी लेखू नका पण स्वतःला सर्वेसर्वा समजण्याची चूक करू नका. 

विदुर नीती प्रमाणे या चार गोष्टी लक्षात आचरणात आणून मानाने जगू शकतो.