शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला केंद्राचा हिरवा कंदील; प्रवास वेळेत 17 तासांची बचत होणार
2
Municipal Election 2026: कल्याण, पनवेल, धुळ्यात भाजपाचा 'विजयारंभ'! सहा उमेदवार बनले बिनविरोध 'नगसेवक'
3
थर्टी फर्स्टचा जल्लोष पहाटेपर्यंत! हॉटेल आणि बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू राहणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
4
नशीब असावं तर असं! राष्ट्रवादीतून भाजपात आल्या आणि २४ तासांत झाल्या नगरसेविका, धुळ्यात उज्वला भोसले बिनविरोध
5
कोट्यवधीची रोकड, सोने हिऱ्यांनी भरलेली बॅग अन् बरेच काही...; ED च्या हाती कुणाचं लागलं 'घबाड'?
6
'ऑपरेशन सिंदूर'वर लष्कर-ए-तैयबा प्रमुख हाफिज सईदचे मोठे वक्तव्य; म्हणाला- 'भारत पुढील 50 वर्षे...'
7
New Year 2026 Wishes: नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Quotes, WhatsApp Status शेअर करत स्वागत करा नव्या वर्षाचं!
8
Nimesulide Banned: निमसुलाइड औषधावर सरकारनं घातली बंदी, किडनीसाठी अत्यंत धोकादायक!
9
मुंबई महापालिकेसाठी भाजपाची १३७ उमेदवारांची यादी जाहीर; किती अमराठी उमेदवारांना दिली संधी?
10
KDMC Election 2026: कल्याण डोंबिवलीत मतदानाआधीच तीन ठिकाणी फुललं कमळ, भाजपाचे ३ नगरसेवक बिनविरोध 
11
Solapur Municipal Corporation Election 2025 : सोलापूरात मोठी राजकीय खेळी! ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखाने ऐनवेळेला भाजपाकडून भरला फॉर्म
12
धनंजय मुंडे यांना दिलासा! करुणा मुंडे यांची याचिका कोर्टाने फेटाळली, काय होतं प्रकरण?
13
भांडवलशाहीचा 'भीष्म पितामह' निवृत्त! दिवाळखोर कंपनीतून वॉरेन बफेंनी कसे उभारले अब्जावधींचे साम्राज्य?
14
अभिषेक बच्चनचं पत्नीसोबत 'न्यू इयर सेलिब्रेशन', चाहतीसोबत फोटो; ऐश्वर्याच्या सौंदर्यावर सगळेच फिदा
15
Stock Market Holiday 2026 List: NSE-BSE नं जारी केली २०२६ ची सुट्ट्यांची यादी; पाहा किती आहेत लाँग वीकेंड्स?
16
कानात ब्लूटूथ इयरफोन लावल्याने कॅन्सरचा मोठा धोका? एक्सपर्ट्सनी सांगितलं 'सत्य'
17
Malegaon Municipal Corporation Election : मालेगावात अखेर महायुती तुटली; तीनही पक्ष येणार आमने-सामने
18
Panvel Municipal Election 2026: पनवेलमध्ये 'मविआ'ला झटका! भाजपाचे नितीन पाटील बिनविरोध, मतदानाआधीच तीन ठिकाणी फुललं 'कमळ'
19
पाल-खंडोबा यात्रेसाठी एसटीची जय्यत तयारी; मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली महत्त्वाची माहिती
20
“काँग्रेसमुक्त भारतची वल्गना करणारा भाजपा ‘कार्यकर्ता मुक्त भाजपा’ झाला”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

शास्त्रानुसार महिन्यातून एकदाच शरीर संबंधाला अनुमती; ते खरं सांसारिक ब्रह्मचर्य - प्रेमानंद महाराज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 13:03 IST

संसारी व्यक्तीदेखील ब्रह्मचर्याचे पालन करू शकते, ते कसे करावे, याबाबत मार्गदर्शन करताना प्रेमानंद महाराजांनी शास्त्रातील माहिती दिली आहे.  

प्रसिद्ध संत प्रेमानंद महाराज यांचे प्रवचन आणि विचार सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चेत असतात. कौटुंबिक जीवन, अध्यात्म आणि चारित्र्य यावर ते अतिशय स्पष्टपणे मार्गदर्शन करतात. "सांसारिक जीवनात राहूनही ब्रह्मचर्याचे पालन कसे करावे?" यावर त्यांनी केलेले मार्गदर्शन गृहस्थाश्रमी लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

Numerology 2026: नववर्षाच्या पहिल्याच दिवशी उघडणार '१११ पोर्टल'; कागदावर लिहा 'हे' अंक, अनुभवा चमत्कारीक बदल!

आजच्या काळात 'ब्रह्मचर्य' हा शब्द केवळ संन्यासी किंवा साधूंसाठी मर्यादित मानला जातो. परंतु, वृंदावनचे विख्यात संत प्रेमानंद महाराज सांगतात की, विवाहीत व्यक्ती देखील आपल्या मर्यादेत राहून ब्रह्मचर्याचे पालन करू शकते, ज्याला त्यांनी 'सांसारिक ब्रह्मचर्य' असे म्हटले आहे.

शास्त्रानुसार 'सांसारिक ब्रह्मचर्य' म्हणजे काय?

महाराजांच्या मते, विवाह झाला म्हणजे संयम संपला असा होत नाही. उलट, विवाहाचा उद्देश हा कामवासनेवर नियंत्रण मिळवून तिला शिस्त लावणे हा आहे. प्रेमानंद महाराज सांगतात की:

मर्यादित संबंध: शास्त्रानुसार, एका महिन्यात केवळ एकदाच शरीर संबंधाला अनुमती दिली गेली आहे.

विवाहित ब्रह्मचर्य: जो पुरुष किंवा स्त्री आपल्या विवाहीत जोडीदाराशी निष्ठ राहून केवळ शास्त्राने सांगितलेल्या मर्यादेत राहतात, त्यांनाही 'ब्रह्मचारी'च मानले जाते.

वादळाने दृष्टी हिरावली, 'दिव्यदृष्टी'ने भाकितं वर्तवली; बाबा वेंगा कोण होत्या? त्यांनी खरंच हे सगळं लिहून ठेवलंय?

या नियमामागचा उद्देश काय?

महाराज या नियमामागे काही महत्त्वाची कारणे सांगतात:

१. शारीरिक आणि मानसिक शक्तीची बचत: वारंवार कामवासनेच्या आहारी गेल्यामुळे मनुष्याची शारीरिक ऊर्जा (वीर्य शक्ती) क्षीण होते. या ऊर्जेचा वापर अध्यात्म आणि बुद्धीच्या विकासासाठी व्हावा, हा त्यामागचा उद्देश आहे. २. मानसिक शांती: जो मनुष्य वासनेवर नियंत्रण मिळवतो, त्याचे मन शांत आणि एकाग्र राहते. यामुळे संसार करताना देखील ईश्वराचे स्मरण करणे सोपे जाते. ३. चारित्र्य संवर्धन: केवळ विवाहाच्या बंधनात राहूनही जर संयम नसेल, तर मनुष्य पशूसमान होतो. संयम पाळल्याने व्यक्तीमध्ये संयम आणि सुसंस्कृतपणा येतो.

शारीरिक संबंध ठेवण्याची वेळ कोणती?

महाराज सांगतात, पत्नीचा मासिक धर्म अर्थात पाळी येऊन गेल्यावर आठव्या दिवशी शरीर संबंध ठेवणे शास्त्रानुसार योग्य ठरते. यालाच विज्ञानात ओव्ह्युलेशन पिरेड म्हटले जाते. संतती निर्मितीसाठी हा काळ योग्य आहे. संसारी व्यक्तीने संसार वाढवण्यासाठी संबंध ठेवावेत. तो हेतू साध्य झाला असेल तर मनावर, शरीरावर ताबा ठेवणे म्हणजे संसारात राहून कमावलेले ब्रह्मचर्य!

Vastu Shastra: सावधान! घरामध्ये 'या' चुका होत असतील तर पैसा टिकणार नाही आणि नात्यातही येईल कटुता!

गृहस्थाश्रमींसाठी महाराजांचा सल्ला

प्रेमानंद महाराज स्पष्टपणे सांगतात की, जर तुम्हाला संसारात राहून भगवंताची प्राप्ती करायची असेल, तर केवळ पूजा-पाठ करून उपयोग नाही. तुम्हाला तुमच्या इंद्रियांवर ताबा मिळवावा लागेल.

जोडीदाराशी निष्ठा: परस्त्री किंवा परपुरुषाचा विचार करणे हे महापाप आहे.

वासनेचा त्याग: शरीर संबंधाचा मूळ उद्देश हा वंश वाढवणे (संतान प्राप्ती) हा असावा, केवळ भोग विलास नाही.

या आचरणाचे फायदे

महाराजांच्या मते, अशा प्रकारे 'सांसारिक ब्रह्मचर्याचे' पालन केल्यास:

मुलांवर चांगले संस्कार होतात.

पती-पत्नीमधील ओढ आणि प्रेम शारीरिक पातळीवरून आत्मिक पातळीवर पोहोचते.

घरात सुख-समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा नांदते.

पाहा महाराजांचा व्हिडिओ - 

English
हिंदी सारांश
Web Title : Once-a-month intimacy: True marital celibacy, according to Premanand Maharaj.

Web Summary : Premanand Maharaj emphasizes 'marital celibacy,' advocating for limited physical intimacy to conserve energy and foster mental peace. He suggests intercourse post-menstruation for progeny, promoting restraint for spiritual growth and stronger family bonds.
टॅग्स :relationshipरिलेशनशिपRelationship TipsरिलेशनशिपSexual Healthलैंगिक आरोग्य