शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशला लागणार जॅकपॉट! ५०० टक्के टॅरिफच्या टांगत्या तलवारीनं का वाढली भारताची डोकेदुखी?
2
राम मंदिराजवळ नमाज पढणारा अब्दुल अहद शेख कोण? बॅगेत सापडलं असं काही, कुटुंबीय म्हणाले...  
3
PCMC Election 2026: निवडणुका जवळ आल्या की, अनेकांचा कंठ फुटून काहीही बोलतात, दादा आपण रागवायचं नाही - देवेंद्र फडणवीस
4
ठाकरे बंधूंच्या 'शिवगर्जनेची' तारीख ठरली! शिवाजी पार्कवर राज ठाकरे कोणता गौप्यस्फोट करणार?
5
शरद पवार अन् अजित पवार एकत्र येणार नाहीत?; प्रफुल पटेल यांच्या विधानानं नव्या चर्चांना उधाण
6
WPL 2026 : अनुष्का शर्माचा ‘पायगुण’! GG ची ‘साडेसाती’ संपली; UP वॉरियर्सकडून ‘ती’ एकटीच लढली
7
मोदी सरकारविरोधात लिखाण करणाऱ्या डॉ. संग्राम पाटील यांना मुंबईत येताच पोलिसांनी घेतलं ताब्यात
8
Holiday for Election: मतदानासाठी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर, कोणाला लागू असणार?
9
"आमचा जीव घेतला तरीही..."; सुप्रिया सुळे कडाडल्या; भाजपाला इशारा, मुंबईबाबत काय म्हणाल्या?
10
चौफेर टीका, भाजपाची नाचक्की, अखेरीस स्वीकृत नगरसेवक तुषार आपटे याने दिला राजीनामा
11
Video - ओडिशामध्ये ९ सीटर चार्टर्ड प्लेन क्रॅश; पायलटसह ६ जण गंभीर जखमी
12
ICC U19 World Cup Warm up Matches : वैभव सूर्यवंशीची वादळी खेळी! शतक अवघ्या ४ धावांनी हुकलं
13
Washim: ४५ वर्षीय महिलेला दगडाने ठेचून मारलं; आरोपीला पकडलं आणि घटना ऐकून पोलीस हादरले
14
"माझ्या नशिबात जे लिहिलं आहे, ते…" टी-20 संघातून डच्चू दिल्याबद्दल गिल पहिल्यांदाच मनातलं बोलला!
15
"काम करा, मग तोंड दाखवा..." जळगावात उमेदवार प्रचाराला आले अन् महिलांचा संताप अनावर झाला
16
'मर्चा' पोह्याची बातच न्यारी; GI टॅग मिळताच सर्वत्र चर्चा, चवीने लावलं वेड, खवय्यांचं जिंकलं मन
17
WPL 2026 Anushka Sharma Debut :विराट कोहलीला आयडॉल मानणाऱ्या अनुष्का शर्माची फिफ्टी हुकली, पण...
18
WPL 2026 मधील मिस्ट्री अँकर, तिच्या सौंदर्यावर फॅन्स झाले फिदा, कोण आहे ती?
19
इन्स्टाग्रामवर ओळख, बसस्थानकावर बोलावले, कारमध्ये बसवून...; अहिल्यानगरच्या तरुणीवर पुणे जिल्ह्यात नको ते घडलं
20
‘सत्तेत राहून एकमेकावर आरोप कसले करतात? हिंमत असेल तर सत्तेतून बाहेर पडा’, काँग्रेसचं भाजपा आणि अजित पवारांना आव्हान   
Daily Top 2Weekly Top 5

अपघात, रोग आणि चिंता होईल दूर! फक्त करा प्रेमानंद महाराजांनी सांगितलेले ५ 'रामबाण' उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 17:35 IST

प्रत्येकाला आपले जीवन आनंदी, उत्साही आणि चिंतामुक्त होऊन जगावेसे वाटते, त्याचे गुपित प्रेमानंद महाराजांनी सांगितलेल्या ५ नियमांमध्ये दडले आहे. 

वृंदावन येथील संत प्रेमानंद महाराजांनी जीवनातील दुःख, चिंता आणि भय यावर मात करण्यासाठी अत्यंत सोपे आणि प्रभावी उपाय सांगितले आहेत. त्यांच्या मते, भौतिक सुख-दुःखांवर विजय मिळवून आत्मिक शांती प्राप्त करण्याचा मार्ग भक्तीमध्ये दडलेला आहे. जीवन आनंदी आणि चिंतामुक्त(Stress free life tips by Premanand Maharaj) करण्यासाठी महाराजांनी सांगितलेले हे पाच नियम तुमच्यासाठी मोलाचे ठरतील.

चाणक्यनीती: कोणी त्रास देत असेल तर अशा हितशत्रूंशी लढण्यासाठी वापरा 'या' ३ गुप्त रणनीती!

१. रोज देवाचे 'चरणामृत' घ्या

प्रेमानंद महाराजांनुसार, चरणामृत हे केवळ तीर्थ नाही, तर ते सगळ्या रोगांचा नाश करण्याचे सामर्थ्य ठेवणारे औषध आहे.

रोज सकाळी देवाचे चरणामृत प्राशन केल्यास, ते शरीरातील अनेक रोगांना दूर ठेवते. यामुळे अकाल मृत्यू (Unnatural Death) येत नाही आणि जीवनात भगवंताचे संरक्षण लाभते.

२. 'कृष्णाय वासुदेवाय' चा ११ वेळा जप

जीवनात अपघात किंवा संकटांचे भय नेहमीच असते. हे भय दूर करण्यासाठी महाराज एक शक्तिशाली मंत्र सांगतात. हा मंत्र रोज ११ वेळा म्हणावा- 

‘कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने । प्रणत: क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम: ।।’

हा श्लोक ११ वेळा म्हटल्याने रस्त्यात किंवा प्रवासात कुठेही अपघात होणार नाही आणि जरी झाले तरी तुमची त्यातून निश्चित सुटका होईल.

३. नित्य २० मिनिटे नामस्मरण करा

मन स्थिर ठेवण्यासाठी आणि चिंतांपासून दूर राहण्यासाठी नामस्मरण हा सर्वात सोपा आणि शक्तिशाली उपाय आहे. दिवसभरात केवळ २० मिनिटे भगवंताचे नामस्मरण करण्यासाठी वेळ काढा. यामुळे मन शांत होते, सकारात्मकता वाढते आणि भौतिक जीवनातील समस्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो.

Ritual: पानाच्या टपरीवर का असते शंकराची पितळी मूर्ती? धार्मिक मान्यता की आणखी काही?

४. रोज ११ दंडवत घाला (मोक्षाचा मार्ग)

महाराज शिस्त आणि नियमांवर जोर देतात. मोक्षाचा मार्ग खुला करण्यासाठी ते दंडवत घालण्याचा नियम सांगतात. रोज देवासमोर ११ दंडवत घालण्याचा नियम (नेम) स्वतःसाठी निश्चित करा. हा नियम पाळल्यास मोक्षाचा मार्ग खुला होतो आणि तुम्हाला पुनर्जन्माच्या चक्रात अडकावे लागत नाही. दंडवत म्हणजे स्वतःला भगवंताच्या चरणी पूर्णपणे समर्पित करणे.

५. देवाची 'चरण धूळ' मस्तकावर लावा

आपल्या देवाच्या चरणांची धूळ (चरण धूळ) मस्तकावर लावल्यास, ते आपल्याला देवाशी थेट जोडते. यामुळे अहंकार (Ego) कमी होतो आणि नम्रता (Humility) वाढते. चरण धूळ मस्तकावर लावल्याने देवाचे आशीर्वाद आणि ऊर्जा दिवसभर तुमच्यासोबत राहते, ज्यामुळे चिंता आपोआप दूर होतात.

प्रेमानंद महाराजांनी सांगितलेले हे पाच उपाय केवळ धार्मिक विधी नसून, ते एक जीवन जगण्याची कला शिकवतात. या नियमांमधून साधकाला भगवंताचे संरक्षण, रोगांपासून मुक्ती आणि अंतिमतः पुनर्जन्मातून मुक्ती मिळवून चिंतामुक्त व समाधानी जीवन जगण्याचा मार्ग मिळतो. पाहा व्हिडीओ -

English
हिंदी सारांश
Web Title : Premanand Maharaj's 5 remedies for accident prevention, health, and peace.

Web Summary : Saint Premanand Maharaj suggests five simple remedies for a happy, stress-free life: drink 'Charanamrit', chant 'Krishnaay Vasudevay', meditate for 20 minutes, do 11 'Dandavat', and apply 'Charan Dhool' to your forehead. These practices offer protection, health, and spiritual liberation.
टॅग्स :spiritualअध्यात्मिकPuja Vidhiपूजा विधीTraditional Ritualsपारंपारिक विधी