शहरं
Join us  
Trending Stories
1
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
2
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
3
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
4
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
5
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
6
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
7
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
8
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
9
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
10
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
11
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
12
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
13
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
14
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
15
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
16
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
17
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
18
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
19
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
20
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले

मोहोंजोदडोच्या उत्खननातही त्रिशूळ सापडले होते; पण महादेवांनी  तेच अस्त्र का निवडले? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2023 07:00 IST

हिंदू देवी देवतांच्या हाती शस्त्र आणि शास्त्र दोन्ही बघायला मिळतात, प्रत्येकाच्या शस्त्र निवडीची प्रेरणा वेगळी आहे, पैकी म्हादेवाबद्दल जाणून घेऊ. 

अनेक हिंदू देव देवतांच्या हाती त्रिशूळ हे आयुध असते. परंतु त्रिशूळ हे भगवान महादेवाचे आयुध मानण्यात येते. त्रिशूळ म्हणजे एक लांब दांडा आणि पुढे तीन टोक असतात. तीन टोक म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश हे सर्जन, पालन व संहार यांचे दैवत आहेत. असुरशक्तीचा विनाश नि:पात करून प्रजाजनांत सुख, शांती आणि वैभव यावे यासाठी त्रिशूळात शक्ती आणि भक्ती साकार झाली आहे. 

त्रिशूळ हे अत्यंत प्रभावी, परिणामकारक असे आयुध असल्यामुळे ते मोठ्या आवेशात आणि आवेगात फिरवून प्रतिस्पर्ध्यांच्या अंगात खुपसतात, असा रामायणात उल्लेख आढळतो.

बौद्ध धर्मातील बोधिवृक्ष आणि त्रिरत्न या प्रतीकांचे त्रिशूळाशी साम्य आहे. सांची, भरहूत आणि अमरावती येथील बौद्ध शिल्पस्तंभावर त्रिशूळ कोरलेले आहे. कार्ले, भाजे, जुन्नर, बेडसे, कुडा येथील लेण्यातही त्रिशूळ हे चिन्ह प्रामुख्याने आढळते. 

सत्पात्र ब्राह्मणाला म्हणजे योग्यता असलेल्या मनुष्याला दान स्वीकारण्यासाठी बोलावणे पाठवून, सस्नेह, आदराने निमंत्रण करून या महानुभव व्यक्तीस दान न करताच अवमानित, विन्मुख पाठवले, तर निमंत्रणकर्त्यास मनुष्यहिंसेइतके पाप लागते आणि या पापाचा धनी म्हणून त्याला पोटशूळाचा विकार जडतो. 

शारीरिक वेदनेने त्याचे जीवन असह्य होते अशी समजूत असल्याने त्याच्या परिमार्जनासाठी, पापक्षालनासाठी त्रिशूळदान करतात. हे दान कृष्णपक्षातील अष्टमी किंवा चतुर्दशी या दिवशी करावे असा संकेत आहे. रुद्रसुक्ताने, शिवपंचाक्षरी मंत्राने किंवा त्रिशूलाय नम: या नाममंत्राने त्रिशूलाची यथाविधी पूजा करतात.

मोहोंजोदडोच्या उत्खननात त्रिशूळ सापडल्याचा उल्लेख आढळतो. त्रिशूळ हा तीन ज्वाळा असलेल्या अग्नीसारका तेजाळता दिसत असल्यामुळे त्याचा ब्रह्ममूलाशी अनुबंध जोडतात. असा हा परमात्म्याशी, ईश्वराशी नाते असलेला, देवगणांच्या हाती आयुध म्हणून अनुग्रह झालेला, सनातन धर्माच्या शक्तीचे प्रतीक असलेला दुष्टांचा कर्दनकाळ, सृजनांचा तारणहार ठरला आहे. म्हणून शिवलिंगाच्या पूजेबरोबरच शिवालयात त्रिशूळाचीही पूजा होते. 

यावरून लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे हिंदू देवदेवतांनी आपल्या हाती शस्त्र बाळगून स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या रक्षणाचा आदर्श घालून आहे. आपणही स्वसंरक्षणाची आणि इतरांच्या रक्षणाची जबाबदारी उचलली पाहिजे. दर वेळी शस्त्र बाळगलेच पाहिजे असे नाही, तर हाती असलेल्या वस्तूचा शस्त्रासारखा वापर करण्याची मी मनाची तयारी केली पाहिजे. अन्यथा शस्त्र हाती असूनही ते चालवण्याचे बळ अंगात नसेल तर उपयोग नाही. काळाची गरज पाहता आपण स्वतःला आणि पुढच्या पिढीला कणखर बनवले पाहिजे. त्यासाठी हिंदू देवदेवतांकडून प्रेरणा घ्यायला हवी.