शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

मोहोंजोदडोच्या उत्खननातही त्रिशूळ सापडले होते; पण महादेवांनी  तेच अस्त्र का निवडले? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2023 07:00 IST

हिंदू देवी देवतांच्या हाती शस्त्र आणि शास्त्र दोन्ही बघायला मिळतात, प्रत्येकाच्या शस्त्र निवडीची प्रेरणा वेगळी आहे, पैकी म्हादेवाबद्दल जाणून घेऊ. 

अनेक हिंदू देव देवतांच्या हाती त्रिशूळ हे आयुध असते. परंतु त्रिशूळ हे भगवान महादेवाचे आयुध मानण्यात येते. त्रिशूळ म्हणजे एक लांब दांडा आणि पुढे तीन टोक असतात. तीन टोक म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश हे सर्जन, पालन व संहार यांचे दैवत आहेत. असुरशक्तीचा विनाश नि:पात करून प्रजाजनांत सुख, शांती आणि वैभव यावे यासाठी त्रिशूळात शक्ती आणि भक्ती साकार झाली आहे. 

त्रिशूळ हे अत्यंत प्रभावी, परिणामकारक असे आयुध असल्यामुळे ते मोठ्या आवेशात आणि आवेगात फिरवून प्रतिस्पर्ध्यांच्या अंगात खुपसतात, असा रामायणात उल्लेख आढळतो.

बौद्ध धर्मातील बोधिवृक्ष आणि त्रिरत्न या प्रतीकांचे त्रिशूळाशी साम्य आहे. सांची, भरहूत आणि अमरावती येथील बौद्ध शिल्पस्तंभावर त्रिशूळ कोरलेले आहे. कार्ले, भाजे, जुन्नर, बेडसे, कुडा येथील लेण्यातही त्रिशूळ हे चिन्ह प्रामुख्याने आढळते. 

सत्पात्र ब्राह्मणाला म्हणजे योग्यता असलेल्या मनुष्याला दान स्वीकारण्यासाठी बोलावणे पाठवून, सस्नेह, आदराने निमंत्रण करून या महानुभव व्यक्तीस दान न करताच अवमानित, विन्मुख पाठवले, तर निमंत्रणकर्त्यास मनुष्यहिंसेइतके पाप लागते आणि या पापाचा धनी म्हणून त्याला पोटशूळाचा विकार जडतो. 

शारीरिक वेदनेने त्याचे जीवन असह्य होते अशी समजूत असल्याने त्याच्या परिमार्जनासाठी, पापक्षालनासाठी त्रिशूळदान करतात. हे दान कृष्णपक्षातील अष्टमी किंवा चतुर्दशी या दिवशी करावे असा संकेत आहे. रुद्रसुक्ताने, शिवपंचाक्षरी मंत्राने किंवा त्रिशूलाय नम: या नाममंत्राने त्रिशूलाची यथाविधी पूजा करतात.

मोहोंजोदडोच्या उत्खननात त्रिशूळ सापडल्याचा उल्लेख आढळतो. त्रिशूळ हा तीन ज्वाळा असलेल्या अग्नीसारका तेजाळता दिसत असल्यामुळे त्याचा ब्रह्ममूलाशी अनुबंध जोडतात. असा हा परमात्म्याशी, ईश्वराशी नाते असलेला, देवगणांच्या हाती आयुध म्हणून अनुग्रह झालेला, सनातन धर्माच्या शक्तीचे प्रतीक असलेला दुष्टांचा कर्दनकाळ, सृजनांचा तारणहार ठरला आहे. म्हणून शिवलिंगाच्या पूजेबरोबरच शिवालयात त्रिशूळाचीही पूजा होते. 

यावरून लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे हिंदू देवदेवतांनी आपल्या हाती शस्त्र बाळगून स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या रक्षणाचा आदर्श घालून आहे. आपणही स्वसंरक्षणाची आणि इतरांच्या रक्षणाची जबाबदारी उचलली पाहिजे. दर वेळी शस्त्र बाळगलेच पाहिजे असे नाही, तर हाती असलेल्या वस्तूचा शस्त्रासारखा वापर करण्याची मी मनाची तयारी केली पाहिजे. अन्यथा शस्त्र हाती असूनही ते चालवण्याचे बळ अंगात नसेल तर उपयोग नाही. काळाची गरज पाहता आपण स्वतःला आणि पुढच्या पिढीला कणखर बनवले पाहिजे. त्यासाठी हिंदू देवदेवतांकडून प्रेरणा घ्यायला हवी.