शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2024 15:38 IST

1 Lakh Tirumala Tirupati Laddu Offered Ram Lalla Ram Mandir Ayodhya: ठरलेलेच प्रमाण आणि तंतोतंत वजन करूनच प्रसाद तयार केला जातो. रामलला प्राणप्रतिष्ठापनावेळी १ लाख तिरुपती लाडू अर्पण करण्यात आले होते, असे सांगितले जात आहे.

1 Lakh Tirumala Tirupati Laddu Offered Ram Lalla Ram Mandir Ayodhya: दक्षिण भारतातील तिरुमला तिरुपती बालाजी व्यंकटेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. दररोज लाखो भाविक या मंदिरात येऊन दर्शन घेतात. तर वर्षभरात भाविकांची संख्या अनेक कोटींपर्यंत पोहोचते. या मंदिरात दान देण्यात येणारी रक्कमही कोट्यवधी रुपयांच्या घरात जाते. तिरुमला तिरुपती मंदिरात देण्यात येणारा लाडू प्रसाद अतिशय पवित्र आणि शुभ मानला जातो. 

तिरुमला तिरुपती बालाजी मंदिरात लाडू प्रसादाचे महत्त्व अनन्य साधारण मानले गेले आहे. महाप्रसादाचे हे लाडू बनवण्याच्या प्रक्रियेला 'दित्तम' असे म्हटले जाते. यात सर्व गोष्टी विशिष्ट प्रमाणातच घेतल्या जातात. गेल्या ३०० वर्षांत केवळ सहा वेळा हा लाडू करण्याची पद्धत बदलण्यात आली आहे. भारतीय समाजात लाडू शुभ आणि पवित्रतेचे प्रतीक आहे. तुपात भाजलेले छोटे तुकडे किंवा पिठी एकत्र करून लाडू बनवले जातात. एकता आणि संघटनेचे ते प्रतीक मानले जाते. तिरुपती लाडू खूप शुभ आणि पवित्र मानले जातात. 

तिरुमला तिरुपती लाडू प्रसाद ठरलेलेच प्रमाण आणि तंतोतंत वजन

असे मानले जाते की, या प्रसादाचे सेवन केल्याने भगवान व्यंकटेश्वराचा आशीर्वाद प्राप्त होतो. तिरुमला तिरुपती लाडू हा व्यंकटेश्वर बालाजी देवाच्या आशीर्वादाचे प्रतीक आहे. तिरुपती लाडू हा केवळ स्वादिष्ट प्रसादच नाही तर त्यामागे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वही आहे. बालाजीकडून प्रसाद म्हणून ग्रहण केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी स्वीकारण्यामागील श्रद्धा आहे. काजूगर, साखर आणि वेलचीचे ठरलेले प्रमाणच हवे आणि वजन तंतोतंत हवे. लाडू बनविण्यासाठी बेसन, साखरेचा पाक, मनुके आदींचाही वापर होतो. ६०, १७५ आणि ७५० ग्रॅम अशा तीन प्रकारच्या वजनांमध्ये लाडू मिळतो. प्रोक्तम् प्रकारातील लाडू साधारणतः ६० ग्रॅमचे असतात. बहुतांश भाविकांना हेच लाडू दिले जातात. तसेच आस्थानम् प्रकारचे लाडू सणासुदीला तयार होतात, तर कल्याणमहोत्सवम् मध्ये मिळणारा लाडू हा कल्याणमहोत्सवम् मध्ये सहभागी होणाऱ्या भाविकांसाठीच तयार केला जातो. 

६०० ब्राह्मणांची टीम अखंडपणे अविरतपणे दिवस-रात्र तयार करतात लाडू प्रसाद

तिरुमला तिरुपती देवस्थानम स्वयंपाकघराला स्थानिक भाषेत पोट्टू म्हणतात. प्रसादाचे लाडू फक्त तिरुमला तिरुपती देवस्थानच्या स्वयंपाकघरात बनवले जातात. यासाठी ६०० ब्राह्मणांची टीम रात्रंदिवस शिफ्टमध्ये काम करते. प्रसादाचे लाडू तयार करण्याचे काम अखंडपणे, अविरतपणे सुरू असते. लाडू बनवण्याचा प्रत्येक घटक घेताना अतिशय काळजी घेतली जाते. काश्मीरमधून केशर येते. सुका मेवा राजस्थान आणि केरळमधून घेतला जातो. वेलची केवळ केरळमधून येते. ३ ते ५ लाखांपेक्षा जास्त लाडू दररोज बनविण्यात येतात. ५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल लाडू विक्रीतून देवस्थानला मिळतो. १५ दिवस हे लाडू टिकतात. ५० रुपयांत मध्यम आकाराचा एक लाडू मिळतो. २०० रुपयांत मोठ्या आकाराचा एक लाडू मिळतो. सन १७१५ पासून तिरुपती येथे प्रसाद म्हणून लाडू देण्यात येत आहे. सन २०१४ मध्ये लाडूला जीआय टॅग मिळाला होता. 

रामलला चरणी १ लाख लाडू केले होते अर्पण

हे लाडू तयार करण्यासाठी १० टन बेसन, १० टन साखर, ७०० किलो काजूगर, १५० किलो वेलची, ३००-४०० लीटर तूप, ५०० किलो पाक, ५४० किलो मनुके याचे ठरलेले वजन आणि प्रमाण घेतले जोते. जानेवारी २०२४ मध्ये अयोध्येतील भव्य राम मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करण्यात होती. यावेळी तिरुमला तिरुपती बालाजी व्यंकटेश्वर मंदिर देवस्थानकडून सुमारे १ लाख लाडू अर्पण करण्यासाठी आले होते, असे अयोध्या रामजन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दासजी महाराज यांनी म्हटले आहे. 

 

टॅग्स :tirupati balaji mandirतिरुपती बालाजी मंदिर, राजूरघाटRam Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याspiritualअध्यात्मिक