शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2024 15:38 IST

1 Lakh Tirumala Tirupati Laddu Offered Ram Lalla Ram Mandir Ayodhya: ठरलेलेच प्रमाण आणि तंतोतंत वजन करूनच प्रसाद तयार केला जातो. रामलला प्राणप्रतिष्ठापनावेळी १ लाख तिरुपती लाडू अर्पण करण्यात आले होते, असे सांगितले जात आहे.

1 Lakh Tirumala Tirupati Laddu Offered Ram Lalla Ram Mandir Ayodhya: दक्षिण भारतातील तिरुमला तिरुपती बालाजी व्यंकटेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. दररोज लाखो भाविक या मंदिरात येऊन दर्शन घेतात. तर वर्षभरात भाविकांची संख्या अनेक कोटींपर्यंत पोहोचते. या मंदिरात दान देण्यात येणारी रक्कमही कोट्यवधी रुपयांच्या घरात जाते. तिरुमला तिरुपती मंदिरात देण्यात येणारा लाडू प्रसाद अतिशय पवित्र आणि शुभ मानला जातो. 

तिरुमला तिरुपती बालाजी मंदिरात लाडू प्रसादाचे महत्त्व अनन्य साधारण मानले गेले आहे. महाप्रसादाचे हे लाडू बनवण्याच्या प्रक्रियेला 'दित्तम' असे म्हटले जाते. यात सर्व गोष्टी विशिष्ट प्रमाणातच घेतल्या जातात. गेल्या ३०० वर्षांत केवळ सहा वेळा हा लाडू करण्याची पद्धत बदलण्यात आली आहे. भारतीय समाजात लाडू शुभ आणि पवित्रतेचे प्रतीक आहे. तुपात भाजलेले छोटे तुकडे किंवा पिठी एकत्र करून लाडू बनवले जातात. एकता आणि संघटनेचे ते प्रतीक मानले जाते. तिरुपती लाडू खूप शुभ आणि पवित्र मानले जातात. 

तिरुमला तिरुपती लाडू प्रसाद ठरलेलेच प्रमाण आणि तंतोतंत वजन

असे मानले जाते की, या प्रसादाचे सेवन केल्याने भगवान व्यंकटेश्वराचा आशीर्वाद प्राप्त होतो. तिरुमला तिरुपती लाडू हा व्यंकटेश्वर बालाजी देवाच्या आशीर्वादाचे प्रतीक आहे. तिरुपती लाडू हा केवळ स्वादिष्ट प्रसादच नाही तर त्यामागे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वही आहे. बालाजीकडून प्रसाद म्हणून ग्रहण केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी स्वीकारण्यामागील श्रद्धा आहे. काजूगर, साखर आणि वेलचीचे ठरलेले प्रमाणच हवे आणि वजन तंतोतंत हवे. लाडू बनविण्यासाठी बेसन, साखरेचा पाक, मनुके आदींचाही वापर होतो. ६०, १७५ आणि ७५० ग्रॅम अशा तीन प्रकारच्या वजनांमध्ये लाडू मिळतो. प्रोक्तम् प्रकारातील लाडू साधारणतः ६० ग्रॅमचे असतात. बहुतांश भाविकांना हेच लाडू दिले जातात. तसेच आस्थानम् प्रकारचे लाडू सणासुदीला तयार होतात, तर कल्याणमहोत्सवम् मध्ये मिळणारा लाडू हा कल्याणमहोत्सवम् मध्ये सहभागी होणाऱ्या भाविकांसाठीच तयार केला जातो. 

६०० ब्राह्मणांची टीम अखंडपणे अविरतपणे दिवस-रात्र तयार करतात लाडू प्रसाद

तिरुमला तिरुपती देवस्थानम स्वयंपाकघराला स्थानिक भाषेत पोट्टू म्हणतात. प्रसादाचे लाडू फक्त तिरुमला तिरुपती देवस्थानच्या स्वयंपाकघरात बनवले जातात. यासाठी ६०० ब्राह्मणांची टीम रात्रंदिवस शिफ्टमध्ये काम करते. प्रसादाचे लाडू तयार करण्याचे काम अखंडपणे, अविरतपणे सुरू असते. लाडू बनवण्याचा प्रत्येक घटक घेताना अतिशय काळजी घेतली जाते. काश्मीरमधून केशर येते. सुका मेवा राजस्थान आणि केरळमधून घेतला जातो. वेलची केवळ केरळमधून येते. ३ ते ५ लाखांपेक्षा जास्त लाडू दररोज बनविण्यात येतात. ५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल लाडू विक्रीतून देवस्थानला मिळतो. १५ दिवस हे लाडू टिकतात. ५० रुपयांत मध्यम आकाराचा एक लाडू मिळतो. २०० रुपयांत मोठ्या आकाराचा एक लाडू मिळतो. सन १७१५ पासून तिरुपती येथे प्रसाद म्हणून लाडू देण्यात येत आहे. सन २०१४ मध्ये लाडूला जीआय टॅग मिळाला होता. 

रामलला चरणी १ लाख लाडू केले होते अर्पण

हे लाडू तयार करण्यासाठी १० टन बेसन, १० टन साखर, ७०० किलो काजूगर, १५० किलो वेलची, ३००-४०० लीटर तूप, ५०० किलो पाक, ५४० किलो मनुके याचे ठरलेले वजन आणि प्रमाण घेतले जोते. जानेवारी २०२४ मध्ये अयोध्येतील भव्य राम मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करण्यात होती. यावेळी तिरुमला तिरुपती बालाजी व्यंकटेश्वर मंदिर देवस्थानकडून सुमारे १ लाख लाडू अर्पण करण्यासाठी आले होते, असे अयोध्या रामजन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दासजी महाराज यांनी म्हटले आहे. 

 

टॅग्स :tirupati balaji mandirतिरुपती बालाजी मंदिर, राजूरघाटRam Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याspiritualअध्यात्मिक